शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

गाव कामगारांच्या विम्याची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST

गोंदिया : कोरोना विषाणू प्रादुर्भावाने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आणि महामारी रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना ...

गोंदिया : कोरोना विषाणू प्रादुर्भावाने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आणि महामारी रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण पातळीवर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामसेवक, संगणक परिचालक यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती आदी कामे अहोरात्र मेहनत घेऊन केली जातात. त्या ग्रा.पं.कर्मचाऱ्यांंना असलेल्या विमा कवचाची मुदत वाढविण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने केली आहे.

भारत सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अपघात विमा योजने अंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ९० दिवसांसाठी ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याबाबतचा निर्णय ३१ मार्च २०२० रोजी ग्रामविकास विभागाच्या वतीने शासन स्तरावर घेण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये वेळोवेळी सुधारणा करुन मुदतवाढ सुध्दा देण्यात आली होती. या शासन निर्णयामुळे मागील एक वर्षात कोरोनाच्या आजाराने मृत्यू झालेल्या राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे. ५० लाख कोरोना विमा कवच योजनेची मुदत २४ मार्च २०२१ ही होती. या कालावधीतील प्रस्तावाची अंतिम मुदत २४ एप्रिल २०२१ ही होती ती सुद्धा संपलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या २८ एप्रिलच्या पत्रानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेत काम करणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांच्या यापूर्वीच्या विमा कवच योजनेची मुदत २४ मार्च २०२१ नंतर पुढील १८० दिवसासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी जिवाची पर्वा न करता महामारीच्या काळात गेल्या एक वर्षापासून अहोरात्र मेहनत करीत आहे. २४ मार्च २०२१ नंतर कोरोना आजाराने जर कर्मचाऱ्याचा अचानकपणे मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ देण्यासाठी विमा कवच योजनेची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य संघटक मिलिंद गणवीर, राज्य सचिव निलकंठ ढोके यांनी केली आहे.