शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मालगुजारी तलावांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: November 1, 2015 02:10 IST

जलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या नियंत्रणात ..

देवानंद शहारे ल्ल गोंदियाजलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या नियंत्रणात असलेल्या काही जुन्या तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कधीकाळी बाराही महिने भरून राहणारे तलाव आता केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अनेक तलाव गायब झाले आहेत. केवळ दोन मालगुजारी तलावांना सोडले तर कोणत्याही तलावांत ०.५ दलघमीपेक्षा जास्त पाणी नाही. जिल्ह्यात १०० वर्षे जुने मालगुजारी तलाव आहेत. त्यामुळेच हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलाव मातीने भरण्यासोबतच अतिक्रमणाच्या समस्येमुळे या प्राचीन वारस्याचे अस्तित्व संकटात दिसून येत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या कायम वादग्रस्त राहिलेल्या या विभागाकडून त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.जिल्ह्यात सहा हजार ९०५ तलाव, बांध आहेत. एकूण जलक्षेत्र २१ हजार ५०९ हेक्टर आहे. सिंचन विभागाच्या ६८ तलावांचे जलक्षेत्र ११ हजार हेक्टरच्या जवळपास आहे, तर जिल्हा परिषदेच्या एक हजार ०८७ तलावांचे जलक्षेत्र चार हजार ६५४ हेक्टर आहे. याशिवाय ८८ खासगी व पाच बचत गटांचे तलाव आहेत. जिल्हा परिषदेकडून लक्ष देण्यात न आल्यामुळे तलावांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बांध तसेच तलाव एकतर मातीने भरण्यात आले किंवा अतिक्रमण करण्यात आले किंवा वाळलेले आहेत. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमधील बोडी व तलाव मातीने बुजवून सपाट करण्यात आले. यानंतर तेथे प्लॉट पाडून त्यांची विक्रीसुद्धा करण्यात आली. त्यावर आता अनेक मानवी वसाहती तयार झाल्या असून मोठमोठ्या इमारती मोठ्या दिमाखात उभ्या आहेत. मागील २० वर्षांपूर्वी तिरोडा शहरात असणारे दोन तलाव असेच गायब झाले. त्यावर आता मोठ्या इमारती उभ्या असून नागरी वसाहती आहेत. तलाव लुप्त होण्यामागील हेसुद्धा एक प्रमुख कारण आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.तलावांवर वाढतेय अतिक्रमणप्राचीन मालगुजारी तलावांकडे लक्ष न दिल्यामुळे तलावांची जलक्षमता कमी झालेली आहे. मातीने भरल्यामुळे खोली कमी झाली आहे. जिल्ह्यात जवळपास ६० टक्के तलाव असे आहेत, जे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर विसंबून आहेत. अनेक तलाव तर पूर्णत: बुजून गेले व त्यांच्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही वर्षांत मालगुजारी तलावांचे अस्तित्वच नष्ट होईल. कालीसरारमध्ये केवळ १.६७ टक्के पाणीजिल्ह्यातील मोठ्या तलावांपैकी (बांध) कालीसरारमध्ये केवळ ०.४६ दलघमी (१.६७ टक्के) उपयुक्त पाणी आहे. पुजारीटोला बांधाची स्थिती चांगली समजली जावू शकते. त्यात २६.७४ दलघमी (६१.४३ टक्के) पाणी आहे. शिरपूर जलाशयात ७३.१२ दलघमी (४५.७६ टक्के) व इटियाडोह जलाशयात ६३.७१ दलघमी (१९.९८ टक्के) पाणी आहे.कृषी व मत्स्य व्यवसाय होणार प्रभावितघटणारे बांध व कमी होणारा जलस्तर यांचा प्रभाव मत्स्यपालन व शेतीवरसुद्धा होईल. मात्र मत्स्यपालन विभागाने मत्स्य उत्पादनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होण्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लहान तलावांतून होणाऱ्या मत्स्य व्यवसायाची भरपाई मोठ्या जलाशयांतून करता येऊ शकते. तसेच कृषी विभागाद्वारे यावर्षी रबी पिकांसाठी ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु बांधांमध्ये जेव्हा अपेक्षित पाणी नसेल तर पिकांना भरपूर पाणी मिळणे शक्य नाही. अशात यावर्षी रबी पिकांच्या उत्पादनातही घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.