शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीला वेग

By admin | Updated: May 29, 2015 01:25 IST

गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे तलावांचे माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत.

गोंदिया : गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे तलावांचे माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. मालगुजार लोकांनी श्रमदान, लोकवर्गणी व लोकसहभागातून सुमारे सहा हजार तलावांचे बांधकाम केले. यात कोहळी जातीचा विशेष सहभाग होता. परंतु कालांतराने त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले. मात्र खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारामुळे या तलावांमधून मागील तीन वर्षांपासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे.माजी मालगुजारी तलावांपासून महसूल मिळत नसल्याने शासन त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देत नव्हते. त्यामुळे या तलावांचे रपटे जीर्ण होवून सिंचन क्षमता कमी होवू लागली. ही बाब प्रफुल्ल पटेल मंत्री असताना तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर तत्कालीन आघाडी सरकारने मामा तलावांच्या विशेष दुरूस्तीसाठी यांत्रिकी विभागातील लिपर शेलरद्वारे या तलावांचे गाळ काढण्याचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू केले आहे. तत्कालीन सरकारने विशेष दुरूस्तीसाठी राज्य शासन १० टक्के व केंद्र शासनाने ९० टक्के निधी देवून काम सुरू केले. काही तलावांचा गाळ काढण्यात आल्याने त्यांची सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांच्या शेताला अधिक पाणी मिळत आहे. यात काही तलावांचे काम सुरू असून काही तलावांच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाल्याने तत्कालीन आघाडी सरकार व खा.प्रफुल्ल पटेल यांचे शेतकऱ्यांनी आभार मानल असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे अध्यक्ष जीवन लंजे यांनी कळविले.कोसबी तलावाचे ५६.४९ लाख रूपयांच्या खर्चातून गाळ काढणे व विशेष दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. चिरचाडी येथे ४२.५३ लाख रूपयांच्या खर्चातून गाळ काढणे व विशेष दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. माहुली व खैरी तलावांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर बोपाबोडी व पळसगाव-राका येथील तलावांच्या विशेष दुरूस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच कोसमतोंडी, खाडीपार, सौंदड, मालीजुंगा, पुतळी व खोडशिवनी येथील तलावांच्या विशेष दुरूस्तीचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. ही कामेसुद्धा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल, मनोहर चंद्रिकापुरे, जीवन लंजे, गजानन परशुरामकर, मुकेश अग्रवाल, अविनाश काशिवार, रूपविलास कुरसुंगे, किरण गावराने, मुन्ना मरस्कोल्हे, नरेश भेंडारकर, मोहन खोटेले, देवराम डोये, भानुदास डोये, मधू हर्षे, चिंतामन ब्राह्मणकर, शिवाजी गहाणे, गंगाधर परशुरामकर, युवराज वालदे, सुभाष कापगते, मिलनदास राऊत, आत्माराम कापगते, कृष्णा ठलाल, चंद्रकांत बहेकार, डॉ. वाढई, भोला कापगते, के.बी. परशुरामकर, अशोक लंजे, उषा मुनेश्वर, ईश्वर लंजे, भागवत कापगते आदी प्रयत्नशील असून कार्यकारी अभियंता सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)