शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रब्बीतील धानखरेदीला झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारपासून (दि.२०) जिल्ह्यातील देवरी आणि गोरेगाव तालुक्यातील एकूण चार धानखरेदी केंद्रावरून रब्बी हंगामातील धानखरेदीला ...

गोंदिया : जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारपासून (दि.२०) जिल्ह्यातील देवरी आणि गोरेगाव तालुक्यातील एकूण चार धानखरेदी केंद्रावरून रब्बी हंगामातील धानखरेदीला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी चार केंद्रांवरून खरेदीला सुरुवात झाल्याने रब्बी धान उत्पादक हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी देवरी तालुक्यातील सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितींअंर्तगत पांढरी, जय दुर्गा माँ महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या पांढरी संस्थाअर्तंगत केंद्र धानोरी, गोरेगाव तालुक्यातील विकास अभिनव सहकारी संस्था मोहाडी, मांडोदेवी शेती उद्योग साधनसामग्री पुरवठा व खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्या. दवडीपार संस्थेअंर्तगत केंद्र दवडीपार या केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ करण्यात आला. रब्बी हंगामातील धानखरेदी सुरू करण्यासंदर्भात मंगळवारी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई येथे चर्चा केली होती. या बैठकीत या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत धानखरेदी सुरू करण्याचे आश्वासन खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिले होते. गुरुवारपासून धानखरेदीला प्रारंभ झाल्याने त्याची पूर्तत: झाली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत रब्बीसाठी एकूण ११४ शासकीय धानखरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जसेजसे गोदाम उपलब्ध होतील तसेतसे धानखरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक अतुल नेरकर यांनी सांगितले. दरम्यान, रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले.

.........

३१ मेपर्यंत करता येणार नोंदणी

रब्बी हंगामातील धानाची शासकीय धानखरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी सातबाराची ऑनलाइन नोंदणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या संकेतस्थळावर करावी लागणार आहे. यासाठी आधी ३० एप्रिलपर्यंतच मुदत होती. मात्र आता याला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सर्वच रब्बी धान उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय धानखरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येणार आहे.

............

धानखरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवा

शासकीय धानखरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाने मर्यादा आखून दिली आहे. यानुसार हेक्टरी ४३ क्विंटल धान शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे. मात्र खरिपापेक्षा रब्बी धानाची उतारी अधिक असून, एका हेक्टरमध्ये ६० क्विंटलहून अधिक धान होत आहे. त्यामुळे उर्वरित धानाची विक्री कुठे करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे धानखरेदीची हेक्टरी मर्यादा ६० क्विंटल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.