शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अखेर रब्बीतील धानखरेदीला झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारपासून (दि.२०) जिल्ह्यातील देवरी आणि गोरेगाव तालुक्यातील एकूण चार धानखरेदी केंद्रावरून रब्बी हंगामातील धानखरेदीला ...

गोंदिया : जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारपासून (दि.२०) जिल्ह्यातील देवरी आणि गोरेगाव तालुक्यातील एकूण चार धानखरेदी केंद्रावरून रब्बी हंगामातील धानखरेदीला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी चार केंद्रांवरून खरेदीला सुरुवात झाल्याने रब्बी धान उत्पादक हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी देवरी तालुक्यातील सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितींअंर्तगत पांढरी, जय दुर्गा माँ महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या पांढरी संस्थाअर्तंगत केंद्र धानोरी, गोरेगाव तालुक्यातील विकास अभिनव सहकारी संस्था मोहाडी, मांडोदेवी शेती उद्योग साधनसामग्री पुरवठा व खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्या. दवडीपार संस्थेअंर्तगत केंद्र दवडीपार या केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ करण्यात आला. रब्बी हंगामातील धानखरेदी सुरू करण्यासंदर्भात मंगळवारी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई येथे चर्चा केली होती. या बैठकीत या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत धानखरेदी सुरू करण्याचे आश्वासन खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिले होते. गुरुवारपासून धानखरेदीला प्रारंभ झाल्याने त्याची पूर्तत: झाली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत रब्बीसाठी एकूण ११४ शासकीय धानखरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जसेजसे गोदाम उपलब्ध होतील तसेतसे धानखरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक अतुल नेरकर यांनी सांगितले. दरम्यान, रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले.

.........

३१ मेपर्यंत करता येणार नोंदणी

रब्बी हंगामातील धानाची शासकीय धानखरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी सातबाराची ऑनलाइन नोंदणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या संकेतस्थळावर करावी लागणार आहे. यासाठी आधी ३० एप्रिलपर्यंतच मुदत होती. मात्र आता याला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सर्वच रब्बी धान उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय धानखरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येणार आहे.

............

धानखरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवा

शासकीय धानखरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाने मर्यादा आखून दिली आहे. यानुसार हेक्टरी ४३ क्विंटल धान शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे. मात्र खरिपापेक्षा रब्बी धानाची उतारी अधिक असून, एका हेक्टरमध्ये ६० क्विंटलहून अधिक धान होत आहे. त्यामुळे उर्वरित धानाची विक्री कुठे करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे धानखरेदीची हेक्टरी मर्यादा ६० क्विंटल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.