शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळातही पथदिवे बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

केशोरी : गावातील पथदिव्यांची जोडणी खंडित केल्याने मागील २ महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. जिल्हा परिषदेने आपली जबाबदारी टाळून, पथदिव्यांचे ...

केशोरी : गावातील पथदिव्यांची जोडणी खंडित केल्याने मागील २ महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. जिल्हा परिषदेने आपली जबाबदारी टाळून, पथदिव्यांचे वीज बिल संबंधीत ग्रामपंचायतीने भरावे, म्हणून फतवा काढला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह येथील पथदिवे सणासुदीच्या काळातही बंदच आहेत. परिणामी गावकऱ्यांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा पोळा नुकताच गेला. लगेच गावा-गावात गणपती उत्सवाची सुरुवात झाली आहे. परंतु अजूनही येथील पथदिवे बंदच आहेत. यावर ग्रामपंचायत सरपंच संघटना काय निर्णय घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषद भरत होती. परंतु अलीकडे वीज वितरण कंपनीने सार्वजनिक पथदिव्यांच्या बिलाची नोटीस ग्रामपंचायतीला बजावून बिलाची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे येथील ग्रामपंचायत चांगलीच अडचणीत आली आहे.

वीज वितरण कंपनीने पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याची नोटीस देऊन २ महिन्यांपूर्वी वीज जोडणी कापली. १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांचे बिल ग्रामपंचायतीने भरावे, असे शासनाने आदेश काढले आहेत. परंतु हा निधी ग्रामपंचायतीने इतर विकास कामात खर्ची घालण्याचे नियोजन केल्यामुळे पथदिव्यांचे बिल कसे भरावे? अशा विवंचनेत ग्रामपंचायत सापडली आहे. पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषदेने भरावे, या मागणीला घेऊन तालुका सरपंच संघटनेने पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे कैफियत मांडली. परंतु अजूनही पथदिव्यांच्या बिलाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळातही केशोरीवासीयांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

-------------------------

कोट

कोरोना संक्रमण काळात ग्रामपंचायती अधिकच अडचणीत आल्या आहेत. करवसुलीचे प्रमाण सुद्धा घटले आहे. नियोजित गाव विकासाच्या योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी द्यावा.

- नंदू पाटील गहाणे

सरपंच, केशोरी