शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

सणासुदीच्या काळातही पथदिवे बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

केशोरी : गावातील पथदिव्यांची जोडणी खंडित केल्याने मागील २ महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. जिल्हा परिषदेने आपली जबाबदारी टाळून, पथदिव्यांचे ...

केशोरी : गावातील पथदिव्यांची जोडणी खंडित केल्याने मागील २ महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. जिल्हा परिषदेने आपली जबाबदारी टाळून, पथदिव्यांचे वीज बिल संबंधीत ग्रामपंचायतीने भरावे, म्हणून फतवा काढला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह येथील पथदिवे सणासुदीच्या काळातही बंदच आहेत. परिणामी गावकऱ्यांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा पोळा नुकताच गेला. लगेच गावा-गावात गणपती उत्सवाची सुरुवात झाली आहे. परंतु अजूनही येथील पथदिवे बंदच आहेत. यावर ग्रामपंचायत सरपंच संघटना काय निर्णय घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषद भरत होती. परंतु अलीकडे वीज वितरण कंपनीने सार्वजनिक पथदिव्यांच्या बिलाची नोटीस ग्रामपंचायतीला बजावून बिलाची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे येथील ग्रामपंचायत चांगलीच अडचणीत आली आहे.

वीज वितरण कंपनीने पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याची नोटीस देऊन २ महिन्यांपूर्वी वीज जोडणी कापली. १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांचे बिल ग्रामपंचायतीने भरावे, असे शासनाने आदेश काढले आहेत. परंतु हा निधी ग्रामपंचायतीने इतर विकास कामात खर्ची घालण्याचे नियोजन केल्यामुळे पथदिव्यांचे बिल कसे भरावे? अशा विवंचनेत ग्रामपंचायत सापडली आहे. पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषदेने भरावे, या मागणीला घेऊन तालुका सरपंच संघटनेने पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे कैफियत मांडली. परंतु अजूनही पथदिव्यांच्या बिलाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळातही केशोरीवासीयांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

-------------------------

कोट

कोरोना संक्रमण काळात ग्रामपंचायती अधिकच अडचणीत आल्या आहेत. करवसुलीचे प्रमाण सुद्धा घटले आहे. नियोजित गाव विकासाच्या योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी द्यावा.

- नंदू पाटील गहाणे

सरपंच, केशोरी