शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

प्रत्येक रस्त्यावर पळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 21:30 IST

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा वनांचा जिल्हा म्हणून नावाजलेला असलेला असला तरी पशू-पक्ष्यांचे जीवन ज्या झाडांवर अवलंबून आहे त्या झाडांची लागवड करण्यात गोंदिया जिल्हा सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो पक्ष्यांचे जीवन फुलविणाऱ्या पळसाने निसर्गाचे सौंदर्य फुलविले. २५ वर्षापूर्वी लावलेला पळस आज घडीला गोंदिया जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्यात भर टाकत आहे. सन ...

ठळक मुद्देपळसाने रंगविले रस्ते : परदेशी झाडे लावण्याचा ट्रेंड बदलवा

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा वनांचा जिल्हा म्हणून नावाजलेला असलेला असला तरी पशू-पक्ष्यांचे जीवन ज्या झाडांवर अवलंबून आहे त्या झाडांची लागवड करण्यात गोंदिया जिल्हा सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो पक्ष्यांचे जीवन फुलविणाऱ्या पळसाने निसर्गाचे सौंदर्य फुलविले. २५ वर्षापूर्वी लावलेला पळस आज घडीला गोंदिया जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्यात भर टाकत आहे. सन २०१८ च्या पावसाळ्यात गोंदिया जिल्ह्यात निसर्ग सौंदर्य फुलविणाऱ्या पळसाच्या रोपट्यांचीच प्रत्येक रस्त्यावर लागवड करण्याचा आग्रह जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा आहे. सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावरून भ्रमण केल्यास प्रत्येकक रस्त्यांवर पळसाची झाडे फुलांनी बहलेली दिसतात. ह्या निसर्ग सृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या शहरातील लोक जिल्ह्यात येतात. गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सकाळी ६ वाजता पासून सायंकाळी ६ वाजता पर्यनत तब्बल १२ तास भ्रमंती करून ४० ते ५० ठिकाणचे फोटो काढलेत. एकाच ठिकाणातून ५ ते १० फोटो काढून गोंदिया जिल्ह्यातील निसर्गाचे सौंदर्य पळस कसे फुलवितो याची पाहणी केली. हे वातावरण १५ मार्च पर्यंत असेच असेल. पण जो पळस मानवी डोळ्यांना लोभदायी रंगाचा आनंद देतो, तोच पळस इथल्या लाखो पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे जीव वाचवतो आहे. फुललेल्या एकेका पळसाच्या झाडावर शेकडोच्या संख्येने पक्षी बसलेले दिसतात. १५ ते २० माकडांची टोळी महिनाभर आरामात पळसावर गुजराण करते.२५ वर्षात पळसाची लागवड नाहीमागील २५ वर्षात गोंदिया जिल्ह्यात नव्याने पळस लावलेला नाही. उलट पळसाची झाडे तोडून परदेशी वृक्ष लागवड झाल्याचे गोंदियात ठायीठायी दिसत आहे. सर्व निसर्गप्रेमींनी हा ट्रेंड बदलविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पळसाचे निमित्ताने ही जीवसृष्ट ीमहाराष्ट्र भरभरून वाढीला लागेल यासाठी पळसाची लागवड २०१८ च्या पावसाळ्यात लावण्याचा माणस जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा आहे.६८४७ वृक्षांचे संरक्षणजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पुरातन वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समितीने नाविण्यपूर्ण योजनेतून सन २०१६-१७ या वर्षापासून २५० सेमी गोलाईच्या ६ हजार ८४७ वृक्षांचे संरक्षण करण्यात आले. यापैकी २ हजार ४० वृक्षांना २० लाख ४० हजार रुपये पेन्शन शेतकऱ्यांना देण्यात आली. सन २०१७-१८ या वर्षात १०० से.मी. ते १५० से.मी., १५० से.मी. २०० से.मी., २०० से.मी. ते २५० से.मी. व २५० से.मी. ते ३०० से.मी. गोलाई असलेल्या वृक्षांचे सर्वेक्षण करुन या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.