शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

पर्यावरणाबाबत जागरूकता काळाची गरज

By admin | Updated: June 5, 2015 01:56 IST

वृक्ष लागवड व त्यांची जोपासना करण्याचे गांभीर्य आज कमी झाले आहे. भविष्यात पर्यावरणाच्या असंतुलनामुळे प्राणवायुसुध्दा विकत घेण्याची वेळ येणार आहे.

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : अत्री येथे पर्यावरण सप्ताह शुभारंभ गोंदिया : वृक्ष लागवड व त्यांची जोपासना करण्याचे गांभीर्य आज कमी झाले आहे. भविष्यात पर्यावरणाच्या असंतुलनामुळे प्राणवायुसुध्दा विकत घेण्याची वेळ येणार आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता पर्यावरण संतुलनाबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. तिरोडा तालुक्यातील अत्री येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवार (दि.३) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ३ ते ९ जून या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. अतिथी म्हणून आ. विजय रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. योगेंद्र भगत, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे उपस्थित होते. डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळात जंगल असतानासुध्दा त्यांनी वृक्षांची लागवड करून जोपासणा केली. महाराजांनी एक फतवा काढून वृक्ष कटाईसाठी परवानगी घेण्याची सूचना केली होती. शालेय जीवनापासून वृक्ष लागवड व जोपासण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देणे आवश्यक आहे. चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अत्री येथील शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १० झाडे लावावी व त्यांची जोपासना करावी, असे आवाहनही त्यांनी केले. येणाऱ्या काळात एक आदर्श काम अत्री ग्रामस्थांनी पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रात करून इतरांसाठी आदर्श निर्माण करावा असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, या गावातील प्रत्येक व्यक्तीने नऊ वृक्षांची लागवड व जोपासना करून प्राणवायुचा ताळेबंद पाण्याच्या ताळेबंदाप्रमाणे करावा. वृक्ष लागवडीचे नियोजन करून पक्षांनासुध्दा निवाऱ्यासाठी कसा उपयोग होईल, असे वृक्ष लावावे. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती शेतकऱ्यांनी सहायक निबंधकांना द्यावी. शासनाने सन २०१४-१५ या वर्षात खरेदी करण्यात येणाऱ्या धानाला २५० रूपये प्रती क्विंटल बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोनस शेतकऱ्यांना हमखास मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी संभ्रमात राहू नये, असेही ते म्हणाले. डॉ. भगत म्हणाले, ग्रामीण विकासाकडे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी विशेष लक्ष दिले. आज शुध्द हवा व स्वच्छ पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे आवश्यक आहे. लोकांच्या सहभागाशिवाय अभियान, सप्ताह व योजना यशस्वी होत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने काम करावे, असे ते म्हणाले.अत्रीचे सरपंच धनपाल माहुरे यांनीही मनोगतातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावात करण्यात येत असलेल्या कामाची माहिती देऊन पाण्याच्या ताळेबंदाबाबत माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व आ. विजय रहांगडाले यांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण केले. या वेळी पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच अत्री ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक गटविकास अधिकारी नारायण जमईवार, संचालन व आभार विस्तार अधिकारी सुरेश निमजे यांनी मानले. (प्रतिनिधी)