शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

रासेयोेतून वाढतो आत्मविश्वास

By admin | Updated: January 15, 2017 00:18 IST

महाविद्यालयीन जिवनात रममान होताना विद्यार्थ्यानी उद्याच्या उज्वल भविष्याचे स्वप्न मनाशी बाळगावे, पदवीचा काळ

डीवायएसपी मंदार जवळे : राज्यस्तरीय रासेयो शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन बोंडगावदेवी : महाविद्यालयीन जिवनात रममान होताना विद्यार्थ्यानी उद्याच्या उज्वल भविष्याचे स्वप्न मनाशी बाळगावे, पदवीचा काळ जीवन घडविणारा काळ असतो. रासेयोच्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकी निर्माण होते. आत्मविश्वास वाढतो. जिज्ञासा ध्येय निश्चित करण्याची क्षमता निर्माण होते. शिस्तप्रिय जीवन जगण्याची संधी मिळते यातून व्यक्ती निर्भिड होतो, असे उद्गार देवरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अर्जुनी-मोरगाव येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय रासेयो शिबिराच्या ५ व्या दिवशी बौध्दीक सत्रात ते शिबिरार्थ्याना मार्गदर्शन करीत होते. सार्वजनिक समाज मंदिरात रासेयो शिबिराच्या व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी एस. एस. जे. महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डा.पी.एस.डांगे होते. यावेळी सरपंच राधेश्याम झोळे उपस्थित होते. मंदार जवळे पुढे म्हणाले, रासेयोच्या शिबिरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याना आयुष्य घडविण्याची जिज्ञासा निर्माण होते. यशाचे शिखर गाठण्याची क्षमता निर्माण होते. आपल्या जीवनाच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी, जीवनात उद्दिष्ट धाडस येण्यासाठी तसेच इतरांशी संबध प्रस्थापित करून सामाजिक बांधीलकी जपावी. विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या गुणांना वाट मोकळी करुन शिस्तीने व जबाबदार नागरिक घडण्याची संधी रासेयो शिबिराच्या माध्यमातून मिळवता येते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यानी आपल्यापुढे कोणत्या क्षेत्रामध्ये जावून आपल्याला पुढील यशस्वी आयुष्य घडवायचे आहे याचा निर्धार करणे आवश्यक आहे. उज्वल ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. इतरांशी तुलना न करता, स्वत:चा जीवन सार्थक करण्यासाठी सतत धडपडण्याचा मार्ग अवलंबवावा. कठीण प्रसंगाला घाबरून न जाता धैर्याने, चिकाटीने आलेल्या समस्यावर मात करून जो यश मिळतो त्याचा आनंद हा अविस्मरणीय राहून चिरकाल टिकणारा असतो. अवांतर वाचन, वर्तमानपत्र चाळणे, अनेक विचारवंताचे आत्मचरित्र वाचन हे स्पर्धा परिक्षांचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यानी भ्रमणध्वनीचा वापर सवयी म्हणून करू नये. जन्मदात्या मायबापाच्या त्यागाचे स्मरण करून विद्यार्थ्यानी ईतर वाईट सवयींना तिलांजली देऊन आपला हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश पदरी पडेल. सोसल मिडीयावरील पोस्टमुळे इतरांच्या भावना दु:खावणार नाही, असे कृत्य झाल्यास सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा नोंदविला जातो असे सांगीतले. याप्रसंगी शिबिरार्थ्यानी केलेल्या प्रश्नांचे निराकरण उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी केले. आभार शिबिराचे संयोजक प्रा.डॉ. शरद मेश्राम यांनी मानले. (वार्ताहर)