शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

रासेयोेतून वाढतो आत्मविश्वास

By admin | Updated: January 15, 2017 00:18 IST

महाविद्यालयीन जिवनात रममान होताना विद्यार्थ्यानी उद्याच्या उज्वल भविष्याचे स्वप्न मनाशी बाळगावे, पदवीचा काळ

डीवायएसपी मंदार जवळे : राज्यस्तरीय रासेयो शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन बोंडगावदेवी : महाविद्यालयीन जिवनात रममान होताना विद्यार्थ्यानी उद्याच्या उज्वल भविष्याचे स्वप्न मनाशी बाळगावे, पदवीचा काळ जीवन घडविणारा काळ असतो. रासेयोच्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकी निर्माण होते. आत्मविश्वास वाढतो. जिज्ञासा ध्येय निश्चित करण्याची क्षमता निर्माण होते. शिस्तप्रिय जीवन जगण्याची संधी मिळते यातून व्यक्ती निर्भिड होतो, असे उद्गार देवरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अर्जुनी-मोरगाव येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय रासेयो शिबिराच्या ५ व्या दिवशी बौध्दीक सत्रात ते शिबिरार्थ्याना मार्गदर्शन करीत होते. सार्वजनिक समाज मंदिरात रासेयो शिबिराच्या व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी एस. एस. जे. महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डा.पी.एस.डांगे होते. यावेळी सरपंच राधेश्याम झोळे उपस्थित होते. मंदार जवळे पुढे म्हणाले, रासेयोच्या शिबिरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याना आयुष्य घडविण्याची जिज्ञासा निर्माण होते. यशाचे शिखर गाठण्याची क्षमता निर्माण होते. आपल्या जीवनाच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी, जीवनात उद्दिष्ट धाडस येण्यासाठी तसेच इतरांशी संबध प्रस्थापित करून सामाजिक बांधीलकी जपावी. विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या गुणांना वाट मोकळी करुन शिस्तीने व जबाबदार नागरिक घडण्याची संधी रासेयो शिबिराच्या माध्यमातून मिळवता येते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यानी आपल्यापुढे कोणत्या क्षेत्रामध्ये जावून आपल्याला पुढील यशस्वी आयुष्य घडवायचे आहे याचा निर्धार करणे आवश्यक आहे. उज्वल ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. इतरांशी तुलना न करता, स्वत:चा जीवन सार्थक करण्यासाठी सतत धडपडण्याचा मार्ग अवलंबवावा. कठीण प्रसंगाला घाबरून न जाता धैर्याने, चिकाटीने आलेल्या समस्यावर मात करून जो यश मिळतो त्याचा आनंद हा अविस्मरणीय राहून चिरकाल टिकणारा असतो. अवांतर वाचन, वर्तमानपत्र चाळणे, अनेक विचारवंताचे आत्मचरित्र वाचन हे स्पर्धा परिक्षांचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यानी भ्रमणध्वनीचा वापर सवयी म्हणून करू नये. जन्मदात्या मायबापाच्या त्यागाचे स्मरण करून विद्यार्थ्यानी ईतर वाईट सवयींना तिलांजली देऊन आपला हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश पदरी पडेल. सोसल मिडीयावरील पोस्टमुळे इतरांच्या भावना दु:खावणार नाही, असे कृत्य झाल्यास सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा नोंदविला जातो असे सांगीतले. याप्रसंगी शिबिरार्थ्यानी केलेल्या प्रश्नांचे निराकरण उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी केले. आभार शिबिराचे संयोजक प्रा.डॉ. शरद मेश्राम यांनी मानले. (वार्ताहर)