शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रासेयोेतून वाढतो आत्मविश्वास

By admin | Updated: January 15, 2017 00:18 IST

महाविद्यालयीन जिवनात रममान होताना विद्यार्थ्यानी उद्याच्या उज्वल भविष्याचे स्वप्न मनाशी बाळगावे, पदवीचा काळ

डीवायएसपी मंदार जवळे : राज्यस्तरीय रासेयो शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन बोंडगावदेवी : महाविद्यालयीन जिवनात रममान होताना विद्यार्थ्यानी उद्याच्या उज्वल भविष्याचे स्वप्न मनाशी बाळगावे, पदवीचा काळ जीवन घडविणारा काळ असतो. रासेयोच्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकी निर्माण होते. आत्मविश्वास वाढतो. जिज्ञासा ध्येय निश्चित करण्याची क्षमता निर्माण होते. शिस्तप्रिय जीवन जगण्याची संधी मिळते यातून व्यक्ती निर्भिड होतो, असे उद्गार देवरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अर्जुनी-मोरगाव येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय रासेयो शिबिराच्या ५ व्या दिवशी बौध्दीक सत्रात ते शिबिरार्थ्याना मार्गदर्शन करीत होते. सार्वजनिक समाज मंदिरात रासेयो शिबिराच्या व्याख्यान मालेच्या अध्यक्षस्थानी एस. एस. जे. महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डा.पी.एस.डांगे होते. यावेळी सरपंच राधेश्याम झोळे उपस्थित होते. मंदार जवळे पुढे म्हणाले, रासेयोच्या शिबिरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याना आयुष्य घडविण्याची जिज्ञासा निर्माण होते. यशाचे शिखर गाठण्याची क्षमता निर्माण होते. आपल्या जीवनाच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी, जीवनात उद्दिष्ट धाडस येण्यासाठी तसेच इतरांशी संबध प्रस्थापित करून सामाजिक बांधीलकी जपावी. विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या गुणांना वाट मोकळी करुन शिस्तीने व जबाबदार नागरिक घडण्याची संधी रासेयो शिबिराच्या माध्यमातून मिळवता येते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यानी आपल्यापुढे कोणत्या क्षेत्रामध्ये जावून आपल्याला पुढील यशस्वी आयुष्य घडवायचे आहे याचा निर्धार करणे आवश्यक आहे. उज्वल ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. इतरांशी तुलना न करता, स्वत:चा जीवन सार्थक करण्यासाठी सतत धडपडण्याचा मार्ग अवलंबवावा. कठीण प्रसंगाला घाबरून न जाता धैर्याने, चिकाटीने आलेल्या समस्यावर मात करून जो यश मिळतो त्याचा आनंद हा अविस्मरणीय राहून चिरकाल टिकणारा असतो. अवांतर वाचन, वर्तमानपत्र चाळणे, अनेक विचारवंताचे आत्मचरित्र वाचन हे स्पर्धा परिक्षांचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यानी भ्रमणध्वनीचा वापर सवयी म्हणून करू नये. जन्मदात्या मायबापाच्या त्यागाचे स्मरण करून विद्यार्थ्यानी ईतर वाईट सवयींना तिलांजली देऊन आपला हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश पदरी पडेल. सोसल मिडीयावरील पोस्टमुळे इतरांच्या भावना दु:खावणार नाही, असे कृत्य झाल्यास सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा नोंदविला जातो असे सांगीतले. याप्रसंगी शिबिरार्थ्यानी केलेल्या प्रश्नांचे निराकरण उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी केले. आभार शिबिराचे संयोजक प्रा.डॉ. शरद मेश्राम यांनी मानले. (वार्ताहर)