शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण गावकरीच शुक्रवारी हटविणार

By admin | Updated: June 7, 2015 01:43 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी (विहिरगाव) येथील मामा तलावातील अतिक्रम काढण्याबाबत ठराव घेण्यात आला.

अतिक्रमण हटविण्यास दिरंगाई : ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपलीबोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी (विहिरगाव) येथील मामा तलावातील अतिक्रम काढण्याबाबत ठराव घेण्यात आला. मात्र अतिक्रमण हटविण्यात दिरंगाई होत असल्याने येत्या शुक्रवारी (दि.१२) अतिक्रमण हटविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे. येरंडी (देव) येथे १९६२ मध्ये मामा तलावाची निर्मिती करण्यात आली. तलावामध्ये गावातील १०-१२ लोकांनी अतिक्रमण करुन २० एकर शेतजमीन काढल्याचे सांगण्यात येते. गावातील मोजक्या लोकांनी काढलेल्या अतिक्रमीत शेतजमिनीमुळे तलाव पूर्ण भरल्यानंतर अतिक्रमण धारकांच्या शेतांमध्ये पाणी शिरुन पिकांचे नुकसान होते. यावर अतिक्रमण धारक शेतकरी स्वत:च्या मनमर्जीने वेळी-अवेळी तलावाचे गेट उघडून पाणी सोडतात. त्यामुळे खऱ्या जमिनीच्या मालकांना पाण्या अभावी धान उत्पादनापासून वंचित राहावे लागते.यावर येरंडी (विहिरगाव) येथील १०१ शेतकऱ्यांनी तालुक्याचे तहसीलदार, अर्जुनी-मोरगाचे पोलीस निरीक्षक, वन परिक्षेत्राधिकारी नवेगावबांध यांना लेखी निवेदन देऊन तलावातील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. परंतु अजून पर्यंत या प्रकरणात कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर गावातील शेकडो शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून विहिरगाव (येरंडी) ग्रामपंचायतच्या वतीने अतिक्रमण हटविण्याबाबतच्या विषयावर चर्चा करण्यासंबंधी १९ नोव्हेंबर २०१४ रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेला गावातील ३२८ महिला-पुरुष उपस्थित होते. सभेत विषयाच्या अनुषंगाने एकमत न झाल्याने हात वर उंचावून मतदान करण्यात आले. तलावातील अतिक्रमण हटविण्यात येऊ नये या बाजूने ७० ग्रामस्थांनी सहमती दर्शविली. तर अतिक्रमण हटविण्यात यावे या बाजूने २५८ ग्रामस्थांनी हात वर उंचावून कौल दिला. सदर विषयावर बहुमत झाल्याने तलावातील अतिक्रमण हटविण्यावर विशेष ग्रामसभेत अखेर शिक्कामोर्तब झाले होते. ग्रामसभेत बहुमताने ठराव पारित होवून सात महिन्यांचा कालावधी होऊन सुद्धा त्या ठरावाची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा ग्रामसभेच्या त्या ठरावाला केराची टोपली दाखवून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी न लावता गावात असंतोष माजविण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. वेळोवेळी निवेदन देवून, ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्याचा ठराव मंजूर होऊन सुद्धा मामा तलावातील त्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. अखेर गावातील तक्रारकर्त्या १०१ शेतकऱ्यांनी मामा तलावातील अतिक्रमण हटविण्याचा निर्धार करून येत्या शुक्रवारी (दि.१२) तलावातील अतिक्रमण गावकरीच हटविणार असे गावकऱ्यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांना लेखी निवेदनातून कळविले आहे. गावकऱ्यांच्या या निर्धाराने गावात अराजकता माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)