शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्यतेमुळे विद्यार्जन धोक्यात

By admin | Updated: July 30, 2015 01:32 IST

सडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या.

वर्गखोल्यांमध्ये गळती : संगणक झाले उंदरांचे घर, शालेय गुणवत्तेबाबत शिक्षकांसह अधिकारीही उदासीनवाताहत शिक्षणाचीराजेश मुनिश्वर सडक अर्जुनीसडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या. मात्र पंचायत समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे तालुक्यातील कनेरी/राम, धानोरी, सौंदड, डुग्गीपार आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी टपकत आहे. त्यामुळे वर्गात चांगले बसणेच शक्य नाही तर विद्यार्जन कसे करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.चार वर्षापूर्वी सर्वशिक्षा अभियानांतर्गत कनेरी येथे षटकोणी वर्गखोली बांधण्यात आली. ती वर्गखोली पावसाळ्यात नेहमीच गळत असते. त्यामुळे टपकणाऱ्या पाण्यापासून बचावासाठी विद्यार्थ्यांना बेंच सरकवून बसावे लागते. टपकलेल्या पाण्याचे डबके वर्गखोलीतून साचून त्याचे लोट वाहताना दिसत आहेत. ओल्याचिंब वर्गखोलीत बसून विद्याग्रहण करताना मुलांची तारेवरची कसरत होत आहे. यातूनच अनेक जण आजारी पडत आहेत.काही शाळेत नवीन वर्गखोल्या नसल्यामुळे धोकादायक असलेल्या शाळा इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत घेवून बसत आहेत. कवेलूची इमारत आहे. त्याचा लोखंडी खांब सडल्याने छताला मोठे भगदाड पडले आहे. त्याच जुन्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेल्या आहेत. त्या भेगांमधून पावसाळ्यात सापासारखे विषारी सरपटणारे प्राणी कधीही आत येऊ शकतात. यातून एखादी अप्रिय घटना घडली तर जबबादार कोण? असा प्रश्न निर्माण होतो.पोषण आहाराचे गौडबंगालसडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ११७ आहेत. जिल्हा परिषद हायस्कुल सौंदड, सडक अर्जुनी या ठिकाणी आहेत. शासकीय आश्रमशाळा शेंडा येथे आहे. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. पण आहारात महिन्यातून एकदा तरी अंडी दिली पाहिजे असे नियमावरील नमूद असताना ती प्रत्यक्षात दिलीच जात नाही. बिलात मात्र अंडी दिल्याचे नमूद करून बोगस बिले जोडली जातात. पंचायत समितीचा एक जबाबदार अधिकारी तर केवळ बांधकाम सुरू असलेल्या शाळांनाच भेटी देत आहे. मात्र शालेय गुणवत्तेविषयी साधी विचारपूसही करीत नसल्याची खमंग चर्चा सुरू आहे. ‘जिथे बांधकाम तिथेच भेटी’ असे समीकरण सुरू आहे.शौचालयांची दुरवस्थातालुक्यातील बहुतेक सर्वच शाळांमध्ये शौचालयाची सुविधा केली आहे. पण शिक्षकांचे नियोजन नसल्यामुळे बहुतेक शौचालय निकामी पडल्याचे दिसत आहे. शौचालयाकडे जाण्याच्या मार्गावर गवताचे कुरण वाढल्याने मुलांना तिथे जाताच येत नाही. काही ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे मुले बाहेरच जाणे जास्त पसंत करतात. या गंभीर बाबीकडे मुख्याध्यापकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील संगणक वाऱ्यावरतालुक्यातील २८ ते ३० शाळांमध्ये शासनाच्या माध्यमातून संगणकाचा पुरवठा करण्यात आला. पण मुख्याध्यापक व शिक्षकांच्या ढिसाळ नियोजनामुळे बहुतेक संच आता उंदरांचे घर बनले आहे. योजना चांगल्या असतात, पण राबविणारी यंत्रणा बरोबर नसली म्हणजे त्या योजनेचे कसे तीनतेरा वाजतात याचे उत्कृष्ट उदाहरण येथे पहायला मिळते. अनेक ठिकाणी तर शासनाने संगणक दिले पण विजेची सोय केली नाही. संगणक दिलेल्या सर्वच शाळांना मोफत वीज पुरवठा करणे तितकेच महत्वाचे आहे.शैक्षणिक गुणवत्तेची फिकीर कोणाला?तालुक्याच्या शिक्षण विभागात आता चांगलाच खेडखंडोबा होत आहे. दुपारच्या शाळेला चक्क ११.३० वाजता शाळेत जाणारे आणि ४ वाजता परत गावाकडे निघून जाणारे शिक्षक कमी नाहीत. बहुतेक शिक्षक तर भंडारा, लाखणी, साकोली, गोंदिया, देवरी, अर्जुनी मोरगाववरुन ये-जा करताना दिसतात. सायंकाळी ४ वाजेपासून कोहमारा या बस स्थानकावर शिक्षक प्रवाशांची गर्र्दी वाढताना दिसते. या अप-डाऊनमुळे खरेच मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.