शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

नियोजनशून्यतेमुळे विद्यार्जन धोक्यात

By admin | Updated: July 30, 2015 01:32 IST

सडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या.

वर्गखोल्यांमध्ये गळती : संगणक झाले उंदरांचे घर, शालेय गुणवत्तेबाबत शिक्षकांसह अधिकारीही उदासीनवाताहत शिक्षणाचीराजेश मुनिश्वर सडक अर्जुनीसडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या. मात्र पंचायत समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे तालुक्यातील कनेरी/राम, धानोरी, सौंदड, डुग्गीपार आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी टपकत आहे. त्यामुळे वर्गात चांगले बसणेच शक्य नाही तर विद्यार्जन कसे करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.चार वर्षापूर्वी सर्वशिक्षा अभियानांतर्गत कनेरी येथे षटकोणी वर्गखोली बांधण्यात आली. ती वर्गखोली पावसाळ्यात नेहमीच गळत असते. त्यामुळे टपकणाऱ्या पाण्यापासून बचावासाठी विद्यार्थ्यांना बेंच सरकवून बसावे लागते. टपकलेल्या पाण्याचे डबके वर्गखोलीतून साचून त्याचे लोट वाहताना दिसत आहेत. ओल्याचिंब वर्गखोलीत बसून विद्याग्रहण करताना मुलांची तारेवरची कसरत होत आहे. यातूनच अनेक जण आजारी पडत आहेत.काही शाळेत नवीन वर्गखोल्या नसल्यामुळे धोकादायक असलेल्या शाळा इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत घेवून बसत आहेत. कवेलूची इमारत आहे. त्याचा लोखंडी खांब सडल्याने छताला मोठे भगदाड पडले आहे. त्याच जुन्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेल्या आहेत. त्या भेगांमधून पावसाळ्यात सापासारखे विषारी सरपटणारे प्राणी कधीही आत येऊ शकतात. यातून एखादी अप्रिय घटना घडली तर जबबादार कोण? असा प्रश्न निर्माण होतो.पोषण आहाराचे गौडबंगालसडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ११७ आहेत. जिल्हा परिषद हायस्कुल सौंदड, सडक अर्जुनी या ठिकाणी आहेत. शासकीय आश्रमशाळा शेंडा येथे आहे. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. पण आहारात महिन्यातून एकदा तरी अंडी दिली पाहिजे असे नियमावरील नमूद असताना ती प्रत्यक्षात दिलीच जात नाही. बिलात मात्र अंडी दिल्याचे नमूद करून बोगस बिले जोडली जातात. पंचायत समितीचा एक जबाबदार अधिकारी तर केवळ बांधकाम सुरू असलेल्या शाळांनाच भेटी देत आहे. मात्र शालेय गुणवत्तेविषयी साधी विचारपूसही करीत नसल्याची खमंग चर्चा सुरू आहे. ‘जिथे बांधकाम तिथेच भेटी’ असे समीकरण सुरू आहे.शौचालयांची दुरवस्थातालुक्यातील बहुतेक सर्वच शाळांमध्ये शौचालयाची सुविधा केली आहे. पण शिक्षकांचे नियोजन नसल्यामुळे बहुतेक शौचालय निकामी पडल्याचे दिसत आहे. शौचालयाकडे जाण्याच्या मार्गावर गवताचे कुरण वाढल्याने मुलांना तिथे जाताच येत नाही. काही ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे मुले बाहेरच जाणे जास्त पसंत करतात. या गंभीर बाबीकडे मुख्याध्यापकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील संगणक वाऱ्यावरतालुक्यातील २८ ते ३० शाळांमध्ये शासनाच्या माध्यमातून संगणकाचा पुरवठा करण्यात आला. पण मुख्याध्यापक व शिक्षकांच्या ढिसाळ नियोजनामुळे बहुतेक संच आता उंदरांचे घर बनले आहे. योजना चांगल्या असतात, पण राबविणारी यंत्रणा बरोबर नसली म्हणजे त्या योजनेचे कसे तीनतेरा वाजतात याचे उत्कृष्ट उदाहरण येथे पहायला मिळते. अनेक ठिकाणी तर शासनाने संगणक दिले पण विजेची सोय केली नाही. संगणक दिलेल्या सर्वच शाळांना मोफत वीज पुरवठा करणे तितकेच महत्वाचे आहे.शैक्षणिक गुणवत्तेची फिकीर कोणाला?तालुक्याच्या शिक्षण विभागात आता चांगलाच खेडखंडोबा होत आहे. दुपारच्या शाळेला चक्क ११.३० वाजता शाळेत जाणारे आणि ४ वाजता परत गावाकडे निघून जाणारे शिक्षक कमी नाहीत. बहुतेक शिक्षक तर भंडारा, लाखणी, साकोली, गोंदिया, देवरी, अर्जुनी मोरगाववरुन ये-जा करताना दिसतात. सायंकाळी ४ वाजेपासून कोहमारा या बस स्थानकावर शिक्षक प्रवाशांची गर्र्दी वाढताना दिसते. या अप-डाऊनमुळे खरेच मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.