शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्यतेमुळे विद्यार्जन धोक्यात

By admin | Updated: July 30, 2015 01:32 IST

सडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या.

वर्गखोल्यांमध्ये गळती : संगणक झाले उंदरांचे घर, शालेय गुणवत्तेबाबत शिक्षकांसह अधिकारीही उदासीनवाताहत शिक्षणाचीराजेश मुनिश्वर सडक अर्जुनीसडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या. मात्र पंचायत समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे तालुक्यातील कनेरी/राम, धानोरी, सौंदड, डुग्गीपार आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी टपकत आहे. त्यामुळे वर्गात चांगले बसणेच शक्य नाही तर विद्यार्जन कसे करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.चार वर्षापूर्वी सर्वशिक्षा अभियानांतर्गत कनेरी येथे षटकोणी वर्गखोली बांधण्यात आली. ती वर्गखोली पावसाळ्यात नेहमीच गळत असते. त्यामुळे टपकणाऱ्या पाण्यापासून बचावासाठी विद्यार्थ्यांना बेंच सरकवून बसावे लागते. टपकलेल्या पाण्याचे डबके वर्गखोलीतून साचून त्याचे लोट वाहताना दिसत आहेत. ओल्याचिंब वर्गखोलीत बसून विद्याग्रहण करताना मुलांची तारेवरची कसरत होत आहे. यातूनच अनेक जण आजारी पडत आहेत.काही शाळेत नवीन वर्गखोल्या नसल्यामुळे धोकादायक असलेल्या शाळा इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत घेवून बसत आहेत. कवेलूची इमारत आहे. त्याचा लोखंडी खांब सडल्याने छताला मोठे भगदाड पडले आहे. त्याच जुन्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेल्या आहेत. त्या भेगांमधून पावसाळ्यात सापासारखे विषारी सरपटणारे प्राणी कधीही आत येऊ शकतात. यातून एखादी अप्रिय घटना घडली तर जबबादार कोण? असा प्रश्न निर्माण होतो.पोषण आहाराचे गौडबंगालसडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ११७ आहेत. जिल्हा परिषद हायस्कुल सौंदड, सडक अर्जुनी या ठिकाणी आहेत. शासकीय आश्रमशाळा शेंडा येथे आहे. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. पण आहारात महिन्यातून एकदा तरी अंडी दिली पाहिजे असे नियमावरील नमूद असताना ती प्रत्यक्षात दिलीच जात नाही. बिलात मात्र अंडी दिल्याचे नमूद करून बोगस बिले जोडली जातात. पंचायत समितीचा एक जबाबदार अधिकारी तर केवळ बांधकाम सुरू असलेल्या शाळांनाच भेटी देत आहे. मात्र शालेय गुणवत्तेविषयी साधी विचारपूसही करीत नसल्याची खमंग चर्चा सुरू आहे. ‘जिथे बांधकाम तिथेच भेटी’ असे समीकरण सुरू आहे.शौचालयांची दुरवस्थातालुक्यातील बहुतेक सर्वच शाळांमध्ये शौचालयाची सुविधा केली आहे. पण शिक्षकांचे नियोजन नसल्यामुळे बहुतेक शौचालय निकामी पडल्याचे दिसत आहे. शौचालयाकडे जाण्याच्या मार्गावर गवताचे कुरण वाढल्याने मुलांना तिथे जाताच येत नाही. काही ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे मुले बाहेरच जाणे जास्त पसंत करतात. या गंभीर बाबीकडे मुख्याध्यापकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील संगणक वाऱ्यावरतालुक्यातील २८ ते ३० शाळांमध्ये शासनाच्या माध्यमातून संगणकाचा पुरवठा करण्यात आला. पण मुख्याध्यापक व शिक्षकांच्या ढिसाळ नियोजनामुळे बहुतेक संच आता उंदरांचे घर बनले आहे. योजना चांगल्या असतात, पण राबविणारी यंत्रणा बरोबर नसली म्हणजे त्या योजनेचे कसे तीनतेरा वाजतात याचे उत्कृष्ट उदाहरण येथे पहायला मिळते. अनेक ठिकाणी तर शासनाने संगणक दिले पण विजेची सोय केली नाही. संगणक दिलेल्या सर्वच शाळांना मोफत वीज पुरवठा करणे तितकेच महत्वाचे आहे.शैक्षणिक गुणवत्तेची फिकीर कोणाला?तालुक्याच्या शिक्षण विभागात आता चांगलाच खेडखंडोबा होत आहे. दुपारच्या शाळेला चक्क ११.३० वाजता शाळेत जाणारे आणि ४ वाजता परत गावाकडे निघून जाणारे शिक्षक कमी नाहीत. बहुतेक शिक्षक तर भंडारा, लाखणी, साकोली, गोंदिया, देवरी, अर्जुनी मोरगाववरुन ये-जा करताना दिसतात. सायंकाळी ४ वाजेपासून कोहमारा या बस स्थानकावर शिक्षक प्रवाशांची गर्र्दी वाढताना दिसते. या अप-डाऊनमुळे खरेच मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.