शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

रोजगार हमी योजनेची कामे पडली बंद

By admin | Updated: June 7, 2016 07:40 IST

तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतपैकी अनेक ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे बंद

सुकडी (डाकराम) : तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतपैकी अनेक ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत. शंभर दिवसांचे मजुरांना काम देण्याचे शासनाचे निकष असतानासुद्धा अनेक ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेची कामे मार्च महिन्यापासून बंद केली. ती कामे अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगाव ग्रामपंचायतने मार्च महिन्यापासून रोहयोची कामे बंद केलेली आहेत. ही कामे अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे सरपंच, सचिव व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप माजी सरपंच हितेंद्र बावणे यांनी केला आहे.मार्च महिन्यापूर्वी एक महिना ग्रामपंचायतने गावातील मजुरांना कामे दिली. मात्र मार्च महिना लागताच काम बंद झाले. तेव्हापासून एप्रिल, मे व जून महिना लागला तरी गावातील गरीब, गरजू, शेतमजूर व शेतकऱ्यांच्या हातांना कामे नाहीत. त्यामुळे गावातील तरूण वर्गाने शहराकडे मजुरीसाठी पलायन केले आहे. ग्रामपंचायतचे पदाधिकारी व सचिव यांच्या निष्काळजीपणामुळे गावातील मजुरांना १०० दिवससुद्धा कामे मिळू शकले नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी राहूनही गावाचा विकास कसा करावा, हेच त्यांंना माहीत नाही. केवळ आपला विकास व्हावा, हाच दृष्टिकोण या पदाधिकाऱ्यांचा आहे, असा आरोपही सरपंच हितेंद्र बावणे यांनी केला आहे. मजुरांना १०० दिवस कामे, शासनाचा हा मूलमंत्र आता फोल ठरला आहे. याकडे तिरोड्याचे तहसीलदार, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा खडकी-डोंगरगावकडे दुर्लक्ष केले आहे. येथील मजुरांना काम नसल्यामुळे गावातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.या प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देवून संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करावी. तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच हितेंद्र बावणे यांनी केली आहे. (वार्ताहर)