शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी करणार ट्विटर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन नाकारून नवीन पारिभाषिक अंशदायी पेन्शन योजना ...

गोंदिया : शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन नाकारून नवीन पारिभाषिक अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजनाही अन्यायकारक आहे. ती योजना बेभरवशाची असल्याने शेअर बाजारावर अवलंबून आहे. या योजनेमुळे कर्मचाऱ्यांचा वृद्धापकाळ अंधारमय असल्यामुळे या नवीन योजनेस सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रखर विरोध आहे. याचाच विरोध करण्यासाठी ५ जुलै रोजी ट्विटर आंदोलन करण्यात येणार आहे.

मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली आहेत. आक्रोश मोर्चा, महाआक्रोश मुंडन मोर्चा, अर्धनग्न आंदोलन, जलसमर्पण आंदोलन, पेन्शन दिंडी, जवाब दो आंदोलन, घंटानाद आंदोलन, कँडल मार्च, साखळी उपोषण, तीन दिवशीय संप आदी आंदोलने करूनही शासनाने कर्मचाऱ्यांना समान काम, समान पेन्शन या आधारावर हक्काची जुनी पेन्शन लागू केली नाही. आजवर महाराष्ट्रात ३ हजारांच्या घरात कर्मचारी मृत पावले आहेत. जे कर्मचारी मृत झाले आहेत. त्यांना जुनी पेन्शन नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना भीक मागण्याची वेळ आली आहे. निदान मृत कर्मचाऱ्यांच्या परिवाराला तरी शासनाने जुनी पेन्शन लागू करावी. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाविरोधात फ्रंट लाइन वर्कर म्हणून लढताना अनेक कर्मचारी कोरोनाने मृत पावले आहेत. शहीद हा शब्द कर्मचाऱ्यांना तंतोतंत लागू होतो. कोरोना राष्ट्रीय संकट असून, देश संकटात असताना कर्मचारी देशवासीयांच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. कोरोनाच्या काळात संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नाही.

........

अधिवेशन काळात वेधणार लक्ष

येत्या ५ व ६ जुलै रोजी मुंबई येथे दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन आहे. सध्या मृत कर्मचाऱ्यांच्या परिवाराला जुनी पेन्शन लागू करून कुटुंबनिवृत्तीवेतन व ग्रॅच्युईटीचा लाभ द्यावा म्हणून संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी ट्विटर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून जुनी पेन्शन मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले जावे म्हणून हे आंदोलन केले जाणार आहे. ६ जुलै रोजी ई-मेल आंदोलन केले जाणार आहे. या माध्यमातून राज्यातील प्रमुख मंत्री, नेत्यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले जाणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार कडव, सचिव सचिन राठोड यांनी कळविले आहे.