शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी करणार ट्विटर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन नाकारून नवीन पारिभाषिक अंशदायी पेन्शन योजना ...

गोंदिया : शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन नाकारून नवीन पारिभाषिक अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजनाही अन्यायकारक आहे. ती योजना बेभरवशाची असल्याने शेअर बाजारावर अवलंबून आहे. या योजनेमुळे कर्मचाऱ्यांचा वृद्धापकाळ अंधारमय असल्यामुळे या नवीन योजनेस सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रखर विरोध आहे. याचाच विरोध करण्यासाठी ५ जुलै रोजी ट्विटर आंदोलन करण्यात येणार आहे.

मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली आहेत. आक्रोश मोर्चा, महाआक्रोश मुंडन मोर्चा, अर्धनग्न आंदोलन, जलसमर्पण आंदोलन, पेन्शन दिंडी, जवाब दो आंदोलन, घंटानाद आंदोलन, कँडल मार्च, साखळी उपोषण, तीन दिवशीय संप आदी आंदोलने करूनही शासनाने कर्मचाऱ्यांना समान काम, समान पेन्शन या आधारावर हक्काची जुनी पेन्शन लागू केली नाही. आजवर महाराष्ट्रात ३ हजारांच्या घरात कर्मचारी मृत पावले आहेत. जे कर्मचारी मृत झाले आहेत. त्यांना जुनी पेन्शन नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना भीक मागण्याची वेळ आली आहे. निदान मृत कर्मचाऱ्यांच्या परिवाराला तरी शासनाने जुनी पेन्शन लागू करावी. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाविरोधात फ्रंट लाइन वर्कर म्हणून लढताना अनेक कर्मचारी कोरोनाने मृत पावले आहेत. शहीद हा शब्द कर्मचाऱ्यांना तंतोतंत लागू होतो. कोरोना राष्ट्रीय संकट असून, देश संकटात असताना कर्मचारी देशवासीयांच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. कोरोनाच्या काळात संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नाही.

........

अधिवेशन काळात वेधणार लक्ष

येत्या ५ व ६ जुलै रोजी मुंबई येथे दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन आहे. सध्या मृत कर्मचाऱ्यांच्या परिवाराला जुनी पेन्शन लागू करून कुटुंबनिवृत्तीवेतन व ग्रॅच्युईटीचा लाभ द्यावा म्हणून संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी ट्विटर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून जुनी पेन्शन मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले जावे म्हणून हे आंदोलन केले जाणार आहे. ६ जुलै रोजी ई-मेल आंदोलन केले जाणार आहे. या माध्यमातून राज्यातील प्रमुख मंत्री, नेत्यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले जाणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार कडव, सचिव सचिन राठोड यांनी कळविले आहे.