शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भारनियमनाविरूद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सणासुदीच्या काळात अचानक सुरू झालेल्या भारनियमनाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा जात आहे. जिल्हा भरात ...

ठळक मुद्देवीज अभियंत्यांना शेतकऱ्यांचा घेराव : १२ ते १५ तासांचे भारनियमन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सणासुदीच्या काळात अचानक सुरू झालेल्या भारनियमनाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा जात आहे. जिल्हा भरात १२ ते १५ तासाचे सलग भारनियमन होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरूद्ध एल्गार पुकारला आहे. धारगाव विभागातील शेतकऱ्यांनी सोमवारी भंडारा येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांना घेराव घातला.जिल्ह्यात गत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. भाताचे पीक करपत आहे. प्रकल्पाचे पाणी शेतापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्ण मदार वीज मोटरपंपावर आहे. अनेक शेतकरी नदी, नाल्यावर आणि विहिरींवर मोटरपंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र गत १५ दिवसांपासून अचानक भारनियमनात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात १२ ते १५ तासाचे भारनियमन केले जाते. त्यातच अनेक रोहित्रांवर दाब वाढल्याने शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. त्यामुळे ओलीत करणे शक्य होत नाही. त्यातच रात्रीच्यावेळी वीज पुरवठा होत असल्याने ओलीतासाठी मजुरही मिळत नाही. या सर्व प्रकाराने जिल्हाभरातील शेतकरी त्रस्त झाला आहे.भारनियमनाचा अतिक्ति होत असल्याने भंडारा तालुक्यातील धारगाव विभागातील शेतकऱ्यांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. धारगाव विभागात अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. धारगाव फिडरवर सकाळी ७ ते सायंकाळी ४ आणि सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत भारनियमन केले जाते. याचा फटका शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. अन्यायकारक भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी शेतकरी वीज वितरण कंपनीत धडकले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश हुमणे, उपसरपंच शिवाजी रेहपाडे, गुंथाराचे उपसरपंच दिलीप कायते, प्रशांत गजभिये, जनार्धन निंबार्ते, मुरलीधर वंजारी, रामप्रसाद ईळपाते, उमेश सार्वे, राजू सुर्यवंशी आदींसह शेतकरी उपस्थित होते.कमी दाबाच्या विजेचा फटकाभारनियमनासोबत शेतकऱ्यांना कमी दाबाचा विजेचा फटका सहन करावा लागतो. भंडारा जिल्ह्यातील अनेक रोहित्र ओव्हरलोड झाले आहे. क्षमतेपेक्षा अधिक जोडण्या एका रोहित्रावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाब आणि वीज मिळत नाही. कमी दामामुळे मोटारपंप सुरू होत नाही तर अनेक शेतकºयांचे मोटरपंप जळत असल्याच्या तक्रारी आहेत.डिझेल पंपाचा आवाज घुमू लागलाधान पीक वाचविण्यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करीत आहे. नदी, नाले आणि तलावावर डिझेल पंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतशिवारात सध्या डिझेलपंपाचा आवाज घुमू लागला आहे.