शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: April 12, 2015 01:40 IST

राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे, अर्थात समाजकल्याण सहायक आयुक्तपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते.

देवानंद शहारे गोंदियाराज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे, अर्थात समाजकल्याण सहायक आयुक्तपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे अनेक महत्वपूर्ण कामे रेंगाळली. कारभारही काहीसा विस्कळीत झाला होता. आता पूर्णवेळ अधिकारी म्हणून सुनील जाधव रुजू झाले आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात काम करताना ते या विभागाला कसा न्याय देणार याबद्दल त्यांनी ‘लोकमत’शी साधलेला हा संवाद. प्रश्न- राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा हा जिल्हा आहे. अशात आपल्या विभागासमोर व आपल्यासमोर कोणकोणती आव्हाने आहेत?उत्तर- आव्हाने तर प्रत्येक विभागातच असतात. सामाजिक न्यायमंत्र्यांचा हा जिल्हा असल्याने निश्चितच त्यांचे अधिक लक्ष येथे असणार. आम्ही वरून आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार येणारी आव्हाने सांभाळण्याचा प्रयत्न करू. मला केवळ चारच दिवस येथे झालेली आहेत. आता हळूहळू काय समस्या आहेत, त्याकडे लक्ष देवून त्या निश्चितपणे मार्गी लावल्या जातील.प्रश्न- जिल्ह्यात अनेक महाविद्यालयात बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटली जाते, त्यावर आपण कसे नियंत्रण आणाल?उत्तर- बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटण्याचा प्रकार इथे होत असल्यास त्याबद्दल मला कल्पना नाही. शाळा-महाविद्यालयातून शिष्यवृत्तीच्या अर्जांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच समाजकल्याण विभागात ते अर्ज पाठविले जातात. येथूनसुद्धा संपूर्ण चौकशी करूनच व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. मात्र बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटण्याचे प्रकार घडत असतील तर आम्ही अधिक काटेकोरपणे छाननी करू व कामात पारदर्शकता यावी यासाठी जे अनिवार्य असेल ते करू.प्रश्न- ओबीसी शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्री बडोले प्रयत्नशील असताना अनेक प्रकरणे प्रलंबित का?उत्तर- निधी उपलब्ध असला तर काही प्रकरणे प्रलंबित असू शकतात. मात्र सहसा विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. समाजकल्याण विभागाच्या कोट्यवधी रूपयांच्या योजना आहेत. त्याद्वारे आजचा विद्यार्थी उद्या अधिकारी बनतो. मात्र हे समाजकल्याण विभागाच्या योजनांमुळेच शक्य झाल्याची जाणिव त्यांना नसते, ही शोकांतिका आहे. ही जाणिव त्यांच्यात निर्माण करून देण्यात आपणच अपयशी ठरतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.प्रश्न- जि.प. समाजकल्याण विभागात घरकुलांच्या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळते. मात्र विशेष समाजकल्याण विभागात हे प्रस्ताव प्रलंबित असतात, यामागील कारण काय?उत्तर- विशेष समाजकल्याण विभाग कोणतेही प्रस्ताव प्रलंबित ठेवत नाही. सर्व शहानिशा करून मंजुरी मिळवून देते. मात्र निधी जर उपलब्ध झाला नसेल तर ते प्रलंबित असू शकतात, हेच त्यामागील मुख्य कारण असते.प्रश्न- मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आपल्या मनात कोणत्या कल्पना आहेत. विभागाचा कारभार पारदर्शी व्हावा, यासाठी आपण काय करणार?उत्तर- विभागाच्या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी एक अधिकारी म्हणून जे जे करणे आवश्यक ठरेल, ते करणारच आणि मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना समाजकल्याण विभागात राबविण्यात येतात. याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर ते योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील. त्यामुळे विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे.