शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: April 12, 2015 01:40 IST

राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे, अर्थात समाजकल्याण सहायक आयुक्तपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते.

देवानंद शहारे गोंदियाराज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे, अर्थात समाजकल्याण सहायक आयुक्तपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे अनेक महत्वपूर्ण कामे रेंगाळली. कारभारही काहीसा विस्कळीत झाला होता. आता पूर्णवेळ अधिकारी म्हणून सुनील जाधव रुजू झाले आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात काम करताना ते या विभागाला कसा न्याय देणार याबद्दल त्यांनी ‘लोकमत’शी साधलेला हा संवाद. प्रश्न- राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा हा जिल्हा आहे. अशात आपल्या विभागासमोर व आपल्यासमोर कोणकोणती आव्हाने आहेत?उत्तर- आव्हाने तर प्रत्येक विभागातच असतात. सामाजिक न्यायमंत्र्यांचा हा जिल्हा असल्याने निश्चितच त्यांचे अधिक लक्ष येथे असणार. आम्ही वरून आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार येणारी आव्हाने सांभाळण्याचा प्रयत्न करू. मला केवळ चारच दिवस येथे झालेली आहेत. आता हळूहळू काय समस्या आहेत, त्याकडे लक्ष देवून त्या निश्चितपणे मार्गी लावल्या जातील.प्रश्न- जिल्ह्यात अनेक महाविद्यालयात बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटली जाते, त्यावर आपण कसे नियंत्रण आणाल?उत्तर- बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटण्याचा प्रकार इथे होत असल्यास त्याबद्दल मला कल्पना नाही. शाळा-महाविद्यालयातून शिष्यवृत्तीच्या अर्जांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच समाजकल्याण विभागात ते अर्ज पाठविले जातात. येथूनसुद्धा संपूर्ण चौकशी करूनच व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. मात्र बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटण्याचे प्रकार घडत असतील तर आम्ही अधिक काटेकोरपणे छाननी करू व कामात पारदर्शकता यावी यासाठी जे अनिवार्य असेल ते करू.प्रश्न- ओबीसी शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्री बडोले प्रयत्नशील असताना अनेक प्रकरणे प्रलंबित का?उत्तर- निधी उपलब्ध असला तर काही प्रकरणे प्रलंबित असू शकतात. मात्र सहसा विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. समाजकल्याण विभागाच्या कोट्यवधी रूपयांच्या योजना आहेत. त्याद्वारे आजचा विद्यार्थी उद्या अधिकारी बनतो. मात्र हे समाजकल्याण विभागाच्या योजनांमुळेच शक्य झाल्याची जाणिव त्यांना नसते, ही शोकांतिका आहे. ही जाणिव त्यांच्यात निर्माण करून देण्यात आपणच अपयशी ठरतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.प्रश्न- जि.प. समाजकल्याण विभागात घरकुलांच्या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळते. मात्र विशेष समाजकल्याण विभागात हे प्रस्ताव प्रलंबित असतात, यामागील कारण काय?उत्तर- विशेष समाजकल्याण विभाग कोणतेही प्रस्ताव प्रलंबित ठेवत नाही. सर्व शहानिशा करून मंजुरी मिळवून देते. मात्र निधी जर उपलब्ध झाला नसेल तर ते प्रलंबित असू शकतात, हेच त्यामागील मुख्य कारण असते.प्रश्न- मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आपल्या मनात कोणत्या कल्पना आहेत. विभागाचा कारभार पारदर्शी व्हावा, यासाठी आपण काय करणार?उत्तर- विभागाच्या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी एक अधिकारी म्हणून जे जे करणे आवश्यक ठरेल, ते करणारच आणि मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना समाजकल्याण विभागात राबविण्यात येतात. याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर ते योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील. त्यामुळे विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे.