शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

फराळाच्या मेनूवर डाळींचा प्रभाव

By admin | Updated: October 26, 2015 01:50 IST

‘दाल-रोटी खाओ, प्रभु के गुन गाओ’ जुन्या चित्रपटातील हे गाने गरीबांच्या जीवनाचे वास्तव्य दर्शवीत होते.

डाळ झाली आवाक्याबाहेर : मागील तीन महिन्यांत आली तेजी कपिल केकत गोंदिया‘दाल-रोटी खाओ, प्रभु के गुन गाओ’ जुन्या चित्रपटातील हे गाने गरीबांच्या जीवनाचे वास्तव्य दर्शवीत होते. आज मात्र गरीबच काय तर चांगल्या धनाढ्यांनाही डाळींनी घाम फोडला आहे. यामुळेच दाल-रोटीतील ‘दाल’ आता ताटातून हद्दपार झाली आहे. २० हजाराचा दर ओलांडणारी डाळ आज थोडीफार उतरून १६ हजार ५०० रूपयांवर आली असली तरी तिची खरेदी करणारा ग्राहक उरलेला नाही. अन्य धान्य साधारण असले तरी डाळींनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडवून टाकले आहे. यामुळेच दिवाळीतील फराळाच्या मेनुतून डाळींचे पदार्थ यंदा आऊट होणार यात शंका नाही. झपाट्याने बदलत चाललेल्या या जगात सर्वांची धडपड सुरू आहे चांगले खाने व चांगले राहणे यासाठी. मात्र आजची स्थिती बघता वाढत्या महागाईने भल्याभल्यांचे कंबरडे मोडले असून चैनीच्या वस्तू आवाक्यात असल्या तरी दोन वेळचे जेवण मात्र हाताबाहेर जाऊ लागले आहे. पूर्वी कांदा-पोळी किंवा वरण-पोळी खाऊन जीवन जगू असे म्हटले जात होते. मात्र मध्यंतरी कांद्याने रडवून सोडले. त्यामुळे कांदा-पोळीची जोडी तुटली. त्यानंतर वरण-पोळीची जोडी जमली असतानाच आता डाळींचे दर चढल्याने वरण-पोळीचीही जोडी तुटली आहे. त्यात भाज्यांचे दरसुद्धा चढलेले असल्याने पोळीसोबत खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला आहे. मागील तीन महिन्यांत डाळींचे हे दर अचानक वाढले असून यामुळे फक्त २५ टक्क्यांवर डाळींचा व्यापार आला आहे. परिणामी पूर्वी बोलाविण्यात येत असलेल्या माला पेक्षा कितीतरी कमी प्रमाणात आम्ही डाळी बोलावित असल्याचे येथील धान्यांचे थोक व्यापारी महालक्ष्मी अनाज भंडारचे संचालक रितेश अग्रवाल सांगतात. नवीन पीक आल्यावर डाळींचे दर काही प्रमाणात पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवीत यंदाच्या दिवाळीवर याचा प्रभाव पडणार असल्याचेही अग्रवाल म्हणाले.