शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
2
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
3
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
4
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
5
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
6
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
7
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
8
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
9
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
10
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
11
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
12
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
13
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
14
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
15
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
16
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
17
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
18
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
19
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
20
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा

वर्ध्यात पाणी आटवून केली कोजागिरी

By admin | Updated: October 15, 2016 16:34 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचा आरोप करीत वर्ध्यात शेती उत्पादक आंदोलन समितीने पाणी आटवून कोजागिरी साजरी केली.

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. १५ -  कोजागिरीला सायंकाळी दूध आटवून ते ग्रहण करण्याची प्रथा आहे. शेडनेट पॉलीहाऊस संदर्भात शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचा आरोप करीत वर्धेत शेडनेट, पॉलीहाऊस शेती उत्पादक आंदोलन समितीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूधाऐवजी पाणी आटवून कोजागिरी साजरी करीत शासनाचे लक्ष वेधले. 
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातील शेडनेट, पॉलीहाऊस शेती उत्पादक चांगलेच आर्थिक कोंडीत सापडले आहे. या प्रकल्पाकरिता घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. शासनाने भरघोस उत्पन्न घेण्याकरिता ही योजना कार्यान्वित केल्याचे म्हणत शेतकºयांना आकर्षित केले. यात शेतकरीही आकर्षित झाला. मात्र शेडनेट, पॉलीहाऊस प्रकल्प विदर्भातील वातवारणाला साथ देण्यात अपयशी ठरले. परिणामी या प्रकल्पातून मोठे उत्पादन घेण्याची आशा बाळगणारे शेतकरी कर्जबाजारी झाले. त्यांना शासनाच्यावतीने कोणतीही मदत देण्याचे नियोजन नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. 
या संदर्भात जिल्ह्यातील अशा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेडनेट, पॉलीहाऊस शेती उत्पादक आंदोलन समिती तयार केली. या समितीच्या माध्यमातून त्यांनी मदतीची मागणी राज्याच्या कृषी विभागाकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मात्र त्यांना मदत मिळण्याचे कुठलेही संकेत नाही. परिणामी त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता आज याच समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाणी आटवून कोजागिरी साजरी केली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या सुपूर्द केले. 
यावेळी किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, शेडनेट पॉलीहाऊस आंदोलन समितीचे सचिन शेंंडे, विठ्ठल बानोडे, त्र्यंबक माहुरे, गोपाळ वंघळ, राजेश थोरात यांच्याह शेतकरी व त्यांच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. 
सन २००९ पासून योजना कार्यान्वीत 
शासनाच्या आदेशानुसार सन २००९ पासून योजना राबविण्याचा निर्णय झाला. यात जिल्ह्याच्या कृषी विभागाच्यावतीने शेतकºयांना आमिष देत बँकांचे कर्ज उपलब्ध करून दिले.  विदर्भातील वातवारणात शेडनेट, पॉलीहाऊस योजना कुचकी ठरली. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाले. आता हे कर्ज कसे फेडावे अशी चिंता त्यांना पडली आहे. यामुळे त्यांच्याकडून मदतीची मागणी होत आहे. मात्र शासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.