शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पिकांवर ओल्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: September 30, 2016 01:55 IST

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येणारा पाऊस हा परतीचा पाऊस म्हणून ओळखला जातो.

शेतकरी चिंतेत : जास्त पावसामुळे उत्पादनावर परिणाम सालेकसा : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येणारा पाऊस हा परतीचा पाऊस म्हणून ओळखला जातो. थोडाफार येणे आणि गायब होणे या स्वरूपाचा तो असतो. परंतु यंदा सालेकसा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात पावसाची दररोज हजेरी असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचा फटका बसण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. हलक्या प्रजातीचे धान ९० दिवसांपासून तर ११५ ते १२० दिवसांच्या कालावधीचे असतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी झालेल्या हलक्या धानाची मुदत संपली असून अनेक ठिकाणी हलका धान १०-१५ दिवसात कापणीसाठी सज्ज झालेला असेल. परंतु धान कापणी करण्यासाठी वातावरण अनुकूल असणे आवश्यक असते. जमिनीत ओलावा नसावा तसेच ऊन निघणे आवश्यक आहे. परंतु सतत येत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलेले आहे. तसेच सतत ढगाळ वातावरण असते. याचा वाईट परिणाम धान पिकावर पडू शकतो. धानपीक पूर्ण पिकल्यावर लोंब्याचे वजन वाढते आणि पाऊस वारा आला की उभे धानपीक खाली लोंबकळते. बांध्यात पाणी असल्यास सर्व पकलेले धान नष्ट होतात. सद्याची परिस्थिती बघता असे होण्याची दाट चिन्हे दिसून येत आहे. त्याचबरोबर रोज पाऊस पडत असल्याने पकलेल्या पिकांमध्ये वजनदार दाणा (तांदूळ) बनण्यावरही वाईट परिणाम घेऊ शकतो. धानपीक कापणीच्या अवस्थेत आले तर त्याला कापून घेणे आवश्यक असते. जर कापणी केली नाही तर पकलेला धानाचा दाणा आपोआप झडून खाली पडण्याची शक्यता असते. भर पावसात धान कापणी शक्य नसून कशीबशी कापणी केली तर मळणीचा प्रश्न उभा होणार आहे. मळणीसाठी योग्य जागा मिळणार नाही तसेच स्वच्छ आणि निरभ्र आभाळ नसल्यास मळणीची कामे होऊ शकत नाही. दुसरा धोका असा की, ओलसर धानाचे कडप सडून त्याचे पुंजने ही बनवून ठेवता येत नाही. ठेवल्यास धानही खराब होतील आणि तणीस सुध्दा बनणार नाही. एकंदरीत हलक्या धानासाठी संकटाचा काळ सुरू झालेला दिसत आहे. मागील काही वर्षानंतर यंदा हलक्या धानाचे समाधानकारक पीक आलेले आहे. यंदा रोगाचा प्रभावसुध्दा दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे उत्पादन चांगले होणार असे वाटत असताना आता सतत पडत असलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस हलक्या सरींचा असून तो जास्त काळ पडत राहात नाही, परंतु यंदा या महिन्याभर पडत असून एक-दोन वेळा अतिवृष्टीचा फटका देणारा सुध्दा ठरला. त्यात काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आणखी किती पाऊस पडेल आणि किती नुकसान होईल याची चिंता लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)