शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

पिकांवर ओल्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: September 30, 2016 01:55 IST

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येणारा पाऊस हा परतीचा पाऊस म्हणून ओळखला जातो.

शेतकरी चिंतेत : जास्त पावसामुळे उत्पादनावर परिणाम सालेकसा : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येणारा पाऊस हा परतीचा पाऊस म्हणून ओळखला जातो. थोडाफार येणे आणि गायब होणे या स्वरूपाचा तो असतो. परंतु यंदा सालेकसा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात पावसाची दररोज हजेरी असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचा फटका बसण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. हलक्या प्रजातीचे धान ९० दिवसांपासून तर ११५ ते १२० दिवसांच्या कालावधीचे असतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी झालेल्या हलक्या धानाची मुदत संपली असून अनेक ठिकाणी हलका धान १०-१५ दिवसात कापणीसाठी सज्ज झालेला असेल. परंतु धान कापणी करण्यासाठी वातावरण अनुकूल असणे आवश्यक असते. जमिनीत ओलावा नसावा तसेच ऊन निघणे आवश्यक आहे. परंतु सतत येत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलेले आहे. तसेच सतत ढगाळ वातावरण असते. याचा वाईट परिणाम धान पिकावर पडू शकतो. धानपीक पूर्ण पिकल्यावर लोंब्याचे वजन वाढते आणि पाऊस वारा आला की उभे धानपीक खाली लोंबकळते. बांध्यात पाणी असल्यास सर्व पकलेले धान नष्ट होतात. सद्याची परिस्थिती बघता असे होण्याची दाट चिन्हे दिसून येत आहे. त्याचबरोबर रोज पाऊस पडत असल्याने पकलेल्या पिकांमध्ये वजनदार दाणा (तांदूळ) बनण्यावरही वाईट परिणाम घेऊ शकतो. धानपीक कापणीच्या अवस्थेत आले तर त्याला कापून घेणे आवश्यक असते. जर कापणी केली नाही तर पकलेला धानाचा दाणा आपोआप झडून खाली पडण्याची शक्यता असते. भर पावसात धान कापणी शक्य नसून कशीबशी कापणी केली तर मळणीचा प्रश्न उभा होणार आहे. मळणीसाठी योग्य जागा मिळणार नाही तसेच स्वच्छ आणि निरभ्र आभाळ नसल्यास मळणीची कामे होऊ शकत नाही. दुसरा धोका असा की, ओलसर धानाचे कडप सडून त्याचे पुंजने ही बनवून ठेवता येत नाही. ठेवल्यास धानही खराब होतील आणि तणीस सुध्दा बनणार नाही. एकंदरीत हलक्या धानासाठी संकटाचा काळ सुरू झालेला दिसत आहे. मागील काही वर्षानंतर यंदा हलक्या धानाचे समाधानकारक पीक आलेले आहे. यंदा रोगाचा प्रभावसुध्दा दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे उत्पादन चांगले होणार असे वाटत असताना आता सतत पडत असलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस हलक्या सरींचा असून तो जास्त काळ पडत राहात नाही, परंतु यंदा या महिन्याभर पडत असून एक-दोन वेळा अतिवृष्टीचा फटका देणारा सुध्दा ठरला. त्यात काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आणखी किती पाऊस पडेल आणि किती नुकसान होईल याची चिंता लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)