शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
2
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
3
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
4
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
5
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
6
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
7
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
8
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
9
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
10
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
11
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
12
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
13
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
14
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
15
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
16
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकावरील रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकरी विवंचनेत

By admin | Updated: September 2, 2014 23:52 IST

कधी संततधार तर कधी महिनाभऱ्याचा खंड अशा पडणाऱ्या पावसामुळे धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. महागडी रासायनिक खते व औषधे, मजुरांचा अभाव या समस्यांचे निवारण

गोंदिया : कधी संततधार तर कधी महिनाभऱ्याचा खंड अशा पडणाऱ्या पावसामुळे धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. महागडी रासायनिक खते व औषधे, मजुरांचा अभाव या समस्यांचे निवारण करताच आता धानपिकांवर करपा, गाद, मावा, तुडतुडा, खोडकिडा आदी रोगांनी धानपिकावर आक्रमण केले आहे. यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा विवंचनेत सापडला आहे.यापूर्वी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने अतिरेक केला. परंतु शेतकरी मागे न हटता मोठ्या कष्टाने रोणीचे काम पूर्ण केले. आता धानाच्या शेताकडे पाहिल्यास काही ठिकाणी हिरवी कंच शेत तर उंच भागावर असलेले धानपिक पिवळे दिसतात. आतल्या आत या धानपिकांना अनेक रोगांनी ग्रासले आहे. त्यामुळे यावर्षीचे पीक किती प्रमाणात हातामध्ये येईल या विवंचनेने बळीराजाला ग्रासले आहे.करपा या रोगामध्ये बारीक किडे धानातील अन्न शोषण करतात. त्यामुळे धानाला योग्य प्रमाणात अन्न मिळत नसल्याने त्याची पाने तांबुस होतात. याच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम पडत असतो. गाद या रोगामध्ये तांदळापेक्षाही बारीक आकाराचा किडा धानाच्या देठामध्ये असतो. तो आपल्या आत त्या देठाला कुरतडतो. अशा रोपट्यातून धानाच्या लोंबीऐवजी गादशेंगा बाहेर निघते व तो वांझोटा ठरतो. यामुळे मात्र उत्पादनामध्ये फार मोठी घट होत असते.यावर्षी धानावर खोडकिडा फार मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे सर्वसाधारणपणे उत्पन्न निम्यावर येत असल्याचे जानकारांचे मत आहे. तुरतुडा हा रोग धान निसवल्यापासून तर तोडणीपर्यंत असतो. तुडतुडा हा धानाच्या बुंध्याशेजारी अंडी घालतो. हे किडे धानाच्या अन्नरस शोषून घेतात व पर्यायाने धानाचे उत्पादन कमी होत असते.या रोगापासून आपल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. विविध कंपन्यांची औषधे बाजारात उपलब्ध आहेत. जाहिरातीमध्ये या कंपन्या मोठमोठी आश्वासने देतात. पण तुलनेने मात्र औषधांचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढलेली आहे. महागड्या औषधांची फवारणी करुन सुद्धा सकारात्मक परिणाम दिसत नसल्याकारणाने औषध कंपन्या देखील आपल्याला फसविण्याचेच काम करत आहेत, असा आरोप देखील अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक शक्तीशाली औषधांची धानपिकांवर फवारणी होत असल्याकारणाने रोगकिड्यांची देखील प्रतिकारशक्ती वाढत आहे. या औषधांच्या फवारणीमुळे अन्नातील पोषक घटक देखील नाहीसे होतात, असेही काही जाणकारांचे मत आहे.पूर्वी देशी प्रजातींच्या धानावर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव नव्हता. परंतु आता उत्पन्न वाढविणाऱ्या संशोधीत व संकरीत धानावर अधिक प्रमाणात रोगांची लागण होत असताना दिसते. असे असले तरी प्रत्यक्षात नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच होत आहे. यावर्षी तर रोगांचा प्रादुर्भाव अधिक असल्याकारणाने शेतकरी अधिकच संकटात सापडलेला आहे. शेती हा व्यवसायच बेभरवश्याचा झाला आहे. यासाठी शासनाने जर ठोस उपाययोजना केली नाही तर भावी पिढी मात्र शेती या व्यवसायाकडे ढुकुंही बघणार नाही, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)