शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

धानपिकावरील रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकरी विवंचनेत

By admin | Updated: September 2, 2014 23:52 IST

कधी संततधार तर कधी महिनाभऱ्याचा खंड अशा पडणाऱ्या पावसामुळे धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. महागडी रासायनिक खते व औषधे, मजुरांचा अभाव या समस्यांचे निवारण

गोंदिया : कधी संततधार तर कधी महिनाभऱ्याचा खंड अशा पडणाऱ्या पावसामुळे धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. महागडी रासायनिक खते व औषधे, मजुरांचा अभाव या समस्यांचे निवारण करताच आता धानपिकांवर करपा, गाद, मावा, तुडतुडा, खोडकिडा आदी रोगांनी धानपिकावर आक्रमण केले आहे. यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा विवंचनेत सापडला आहे.यापूर्वी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने अतिरेक केला. परंतु शेतकरी मागे न हटता मोठ्या कष्टाने रोणीचे काम पूर्ण केले. आता धानाच्या शेताकडे पाहिल्यास काही ठिकाणी हिरवी कंच शेत तर उंच भागावर असलेले धानपिक पिवळे दिसतात. आतल्या आत या धानपिकांना अनेक रोगांनी ग्रासले आहे. त्यामुळे यावर्षीचे पीक किती प्रमाणात हातामध्ये येईल या विवंचनेने बळीराजाला ग्रासले आहे.करपा या रोगामध्ये बारीक किडे धानातील अन्न शोषण करतात. त्यामुळे धानाला योग्य प्रमाणात अन्न मिळत नसल्याने त्याची पाने तांबुस होतात. याच्या उत्पादनावर प्रतिकुल परिणाम पडत असतो. गाद या रोगामध्ये तांदळापेक्षाही बारीक आकाराचा किडा धानाच्या देठामध्ये असतो. तो आपल्या आत त्या देठाला कुरतडतो. अशा रोपट्यातून धानाच्या लोंबीऐवजी गादशेंगा बाहेर निघते व तो वांझोटा ठरतो. यामुळे मात्र उत्पादनामध्ये फार मोठी घट होत असते.यावर्षी धानावर खोडकिडा फार मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे सर्वसाधारणपणे उत्पन्न निम्यावर येत असल्याचे जानकारांचे मत आहे. तुरतुडा हा रोग धान निसवल्यापासून तर तोडणीपर्यंत असतो. तुडतुडा हा धानाच्या बुंध्याशेजारी अंडी घालतो. हे किडे धानाच्या अन्नरस शोषून घेतात व पर्यायाने धानाचे उत्पादन कमी होत असते.या रोगापासून आपल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. विविध कंपन्यांची औषधे बाजारात उपलब्ध आहेत. जाहिरातीमध्ये या कंपन्या मोठमोठी आश्वासने देतात. पण तुलनेने मात्र औषधांचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढलेली आहे. महागड्या औषधांची फवारणी करुन सुद्धा सकारात्मक परिणाम दिसत नसल्याकारणाने औषध कंपन्या देखील आपल्याला फसविण्याचेच काम करत आहेत, असा आरोप देखील अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक शक्तीशाली औषधांची धानपिकांवर फवारणी होत असल्याकारणाने रोगकिड्यांची देखील प्रतिकारशक्ती वाढत आहे. या औषधांच्या फवारणीमुळे अन्नातील पोषक घटक देखील नाहीसे होतात, असेही काही जाणकारांचे मत आहे.पूर्वी देशी प्रजातींच्या धानावर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव नव्हता. परंतु आता उत्पन्न वाढविणाऱ्या संशोधीत व संकरीत धानावर अधिक प्रमाणात रोगांची लागण होत असताना दिसते. असे असले तरी प्रत्यक्षात नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच होत आहे. यावर्षी तर रोगांचा प्रादुर्भाव अधिक असल्याकारणाने शेतकरी अधिकच संकटात सापडलेला आहे. शेती हा व्यवसायच बेभरवश्याचा झाला आहे. यासाठी शासनाने जर ठोस उपाययोजना केली नाही तर भावी पिढी मात्र शेती या व्यवसायाकडे ढुकुंही बघणार नाही, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)