शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2015 01:22 IST

ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे.

मागणीकडे दुर्लक्ष : ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचा प्रतापआमगाव : ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. कालव्याला पाणी सोडण्याची कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांच्यामार्फत १० डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.माजी पंचायत समिती सदस्य जियालाल पंधरे, किशोर रहांगडाले वळद व अनेक शेतकऱ्यांनी १० डिसेंबर २०१४ ला कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी लघु पाटबंधारे विभाग देवरी यांच्या मार्फत लेखी निवेदन देऊन कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली. या कालव्याद्वारे वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा येथील शेतकऱ्यांना रबीसाठी पाण्याची मागणी करण्यात आली. मात्र धरणात साठा कमी असल्याच्या सबबीवर पाणी देण्यात आले नाही. उन्हाळ्यात कालव्याला आठ दिवसातून एकदा पाणी सोडले असते तर पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली नसती. उलट ओवारा प्रकल्पाचे पाणी तेलीटोला, कारुटोला, हेटी, कवडी, हरदोली, सातगाव या गावांना रबी करिता पाणी सोडण्यात आले, अशी अधिकारी भेदभावपूर्ण वागणूक करीत आहे. धरणात पाणी नाही म्हणून वेळकाढू धोरण अंगिकारुन कामचुकारपणा करीत आहेत. सध्या धरणात ३३५.४०० लेव्हल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. कमीत कमी दीड मिटर पाणी काढला तरी धरणात पाणी राहू शकतो. ओवारा प्रकल्पाचे पाणी सोडले तर पाण्याची पातळी वर येईल व विहिर, बोअरवेलच्या माध्यमातून पाणी समस्या दूर होईल. तसेच कालव्याच्या पाण्यामुळे जी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती आहे ती थांबेल. सगळ्याच पक्षांचे आमदार या क्षेत्रातून निवडून गेले. मात्र पाणी समस्येवर कोणी ठोस तोडगा कोणी काढला नाही, अशी प्रतिक्रिया जियालाल पंधरे यांनी व्यक्त करुन कार्यकारी अभियंता गोंदिया, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता सूर्यवंशी, मध्यम प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. जर समस्या लक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर ओवारा धरणावर ठिय्या आंदोलनाचा इशारा जियालाल पंधरे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)