शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2015 01:22 IST

ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे.

मागणीकडे दुर्लक्ष : ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचा प्रतापआमगाव : ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. कालव्याला पाणी सोडण्याची कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांच्यामार्फत १० डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.माजी पंचायत समिती सदस्य जियालाल पंधरे, किशोर रहांगडाले वळद व अनेक शेतकऱ्यांनी १० डिसेंबर २०१४ ला कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी लघु पाटबंधारे विभाग देवरी यांच्या मार्फत लेखी निवेदन देऊन कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली. या कालव्याद्वारे वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा येथील शेतकऱ्यांना रबीसाठी पाण्याची मागणी करण्यात आली. मात्र धरणात साठा कमी असल्याच्या सबबीवर पाणी देण्यात आले नाही. उन्हाळ्यात कालव्याला आठ दिवसातून एकदा पाणी सोडले असते तर पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली नसती. उलट ओवारा प्रकल्पाचे पाणी तेलीटोला, कारुटोला, हेटी, कवडी, हरदोली, सातगाव या गावांना रबी करिता पाणी सोडण्यात आले, अशी अधिकारी भेदभावपूर्ण वागणूक करीत आहे. धरणात पाणी नाही म्हणून वेळकाढू धोरण अंगिकारुन कामचुकारपणा करीत आहेत. सध्या धरणात ३३५.४०० लेव्हल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. कमीत कमी दीड मिटर पाणी काढला तरी धरणात पाणी राहू शकतो. ओवारा प्रकल्पाचे पाणी सोडले तर पाण्याची पातळी वर येईल व विहिर, बोअरवेलच्या माध्यमातून पाणी समस्या दूर होईल. तसेच कालव्याच्या पाण्यामुळे जी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती आहे ती थांबेल. सगळ्याच पक्षांचे आमदार या क्षेत्रातून निवडून गेले. मात्र पाणी समस्येवर कोणी ठोस तोडगा कोणी काढला नाही, अशी प्रतिक्रिया जियालाल पंधरे यांनी व्यक्त करुन कार्यकारी अभियंता गोंदिया, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता सूर्यवंशी, मध्यम प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. जर समस्या लक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर ओवारा धरणावर ठिय्या आंदोलनाचा इशारा जियालाल पंधरे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)