शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

तणनाशकाच्या वापराने हिरवा चारा संपुष्टात

By admin | Updated: December 21, 2015 01:55 IST

कडब्याचा पत्ताच नाही : यंदा सोयाबीनचे उत्पादन घसरल्याने कुटारही महागणार$$्निेगोंदिया : जिल्ह्यात ज्वारीचे पीक हे बोटावर मोजण्याइतपत घेतले जाते.

कडब्याचा पत्ताच नाही : यंदा सोयाबीनचे उत्पादन घसरल्याने कुटारही महागणार$$्निेगोंदिया : जिल्ह्यात ज्वारीचे पीक हे बोटावर मोजण्याइतपत घेतले जाते. ज्वारीपासून मिळणारा हिरवा चारा आणि वाळल्यावर मिळणारा कडबा दोन्ही जनावरांसाठी पौष्टिक असते. पण लागवडच नसल्याने कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. रोख पिकाच्या हव्यासापोटी ज्वारीच्या पेरण्यात कमालीची घट झाली आहे. सोयाबीनचे कुटारही नाही.यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन झाले. सोयाबीनचा उपयोग हिरवा चारा म्हणून होत नसला तरी कुटार म्हणून वाळलेल्या सोयाबीनचा उपयोग होतो. मात्र शेतकऱ्यांनी उत्पन्न होत नसल्याच्या कारणाने त्यावर ट्रॅक्टर चालविल्याने यंदा तेही मिळीणे कठीण झाले आहे. येत्या उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. जमिनीचा दर्जा घसरण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे. रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे जमिनीचा दर्जा घसरण्याची भीती आहे. शिवाय त्याचा जनावरांसोबत मानवी जीवनावरही त्याचे दुरगामी परिणाम दिसू लागले आहेत. ही औषधे काही प्रमाणात मानवांच्याही पोटात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. ग्रामीण भागात अलिकडे शेतीच्या कामासाठी मजुरच मिळत नसल्याची ओरड होत आहे. मजुरीचे दर वधारल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे मजुरांना कामी न लावता सरळ एक रोजदार सांगून तणनाशकाची फवारणी केली जात आहे. या कारणाने हिरवे गवत संपुष्ठात येत असल्याने चाराप्रश्न गंभीर बनत चालला आहे. शेताच्या धुऱ्यावर तसेच पिकांच्या मध्यभागी उगविलेल गवत निंदण करून कापले जात होते. ते कापलेले गवत कधी चारा म्हणून वापरले जात होते. मात्र मजुरी वाढल्याने निंदणाचा खर्च परवडणारा नाही. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तणनाशकाचा वापर करणे सुरू केले आहे. यामुळे ही हिरवळ मोठी होण्याअगोदरच करपून जाते. यामुळे जनावरांना हिरव्या चाऱ्यापासून वंचित रहावे लागत आहे. जिल्ह्यात जनावरांचा हिरवा चारा हिरावला जात आहे. तणनाशकाच्या अतिरिक्त वापरावर वेळीच निर्बंध घालून हिरवळ जोपासने गरजेचे झाले आहे. शेत-शिवारात धुऱ्या बांधावर व मोकळ्या जागेत पिकासोबत तण वाढते. परिणामी रोपे रोगग्रस्त होवून उत्पादनात घट होते. त्यामुळे त्याचे निंदन करणे गरजेचे असते. मजुराद्वारे शेतातील तण निंदन करून काढल्यास धुऱ्या बांधावरील व मोकळ्या जागेतील गवत जनावराकरिता पौष्टिक वैरण म्हणून वापरले जाणे शक्य होते. परंतु सध्या मजुरांचे दर वाढले आहे. तसेच प्रत्येकाकडे जनावरे नाहीत. त्यामुळे हिरव्या चाऱ्याची गरज नसल्याने, तसेच हे हिरवे कुरण दुसऱ्यास उपयोगी पडेल ही भावना लोप पावत चालल्याने शेतकरी सरसकट तणनाशकाची फवारणी करतात. त्यामुळे तणासहीत हिरवे गवतही जळून जाते. (प्रतिनिधी)तणनाशकांनी इतर वनस्पतीही जळून खाकसध्याची तणनाशके ही महागडी असून प्रभावी व जहाल आहे. फवारणीनंतर काही तासातच याचा प्रभाव दिसून येतो. फवारणीच्या जागेशिवाय आजुबाजुच्या जागेवरील गवत व इतर वनस्पतीही जळून खाक होताना दिसते. यामुळे पावसाळा आणि हिवाळा असा सात ते आठ मिहने जनावरांना पुरेल असा हिरवा आणि दुधाळ जनावरांसाठी पौष्टिक चारा अल्पावधीतच संपुष्टात येत आहे. जनावरांच्या हक्काचे वैरण अल्पावधीतच नाहीसे होत असल्याने पशुपालकासमोर गुराच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे जिल्ह्यात पशुधन विक्र ी वाढत आहे.वैरण टंचाईमुळे शेतकऱ्याचा जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय डबघाईस आला असून दुधाची टंचाई जाणवत आहे.