शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

तणनाशकाच्या वापराने हिरवा चारा संपुष्टात

By admin | Updated: December 21, 2015 01:55 IST

कडब्याचा पत्ताच नाही : यंदा सोयाबीनचे उत्पादन घसरल्याने कुटारही महागणार$$्निेगोंदिया : जिल्ह्यात ज्वारीचे पीक हे बोटावर मोजण्याइतपत घेतले जाते.

कडब्याचा पत्ताच नाही : यंदा सोयाबीनचे उत्पादन घसरल्याने कुटारही महागणार$$्निेगोंदिया : जिल्ह्यात ज्वारीचे पीक हे बोटावर मोजण्याइतपत घेतले जाते. ज्वारीपासून मिळणारा हिरवा चारा आणि वाळल्यावर मिळणारा कडबा दोन्ही जनावरांसाठी पौष्टिक असते. पण लागवडच नसल्याने कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. रोख पिकाच्या हव्यासापोटी ज्वारीच्या पेरण्यात कमालीची घट झाली आहे. सोयाबीनचे कुटारही नाही.यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन झाले. सोयाबीनचा उपयोग हिरवा चारा म्हणून होत नसला तरी कुटार म्हणून वाळलेल्या सोयाबीनचा उपयोग होतो. मात्र शेतकऱ्यांनी उत्पन्न होत नसल्याच्या कारणाने त्यावर ट्रॅक्टर चालविल्याने यंदा तेही मिळीणे कठीण झाले आहे. येत्या उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. जमिनीचा दर्जा घसरण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे. रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे जमिनीचा दर्जा घसरण्याची भीती आहे. शिवाय त्याचा जनावरांसोबत मानवी जीवनावरही त्याचे दुरगामी परिणाम दिसू लागले आहेत. ही औषधे काही प्रमाणात मानवांच्याही पोटात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. ग्रामीण भागात अलिकडे शेतीच्या कामासाठी मजुरच मिळत नसल्याची ओरड होत आहे. मजुरीचे दर वधारल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे मजुरांना कामी न लावता सरळ एक रोजदार सांगून तणनाशकाची फवारणी केली जात आहे. या कारणाने हिरवे गवत संपुष्ठात येत असल्याने चाराप्रश्न गंभीर बनत चालला आहे. शेताच्या धुऱ्यावर तसेच पिकांच्या मध्यभागी उगविलेल गवत निंदण करून कापले जात होते. ते कापलेले गवत कधी चारा म्हणून वापरले जात होते. मात्र मजुरी वाढल्याने निंदणाचा खर्च परवडणारा नाही. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तणनाशकाचा वापर करणे सुरू केले आहे. यामुळे ही हिरवळ मोठी होण्याअगोदरच करपून जाते. यामुळे जनावरांना हिरव्या चाऱ्यापासून वंचित रहावे लागत आहे. जिल्ह्यात जनावरांचा हिरवा चारा हिरावला जात आहे. तणनाशकाच्या अतिरिक्त वापरावर वेळीच निर्बंध घालून हिरवळ जोपासने गरजेचे झाले आहे. शेत-शिवारात धुऱ्या बांधावर व मोकळ्या जागेत पिकासोबत तण वाढते. परिणामी रोपे रोगग्रस्त होवून उत्पादनात घट होते. त्यामुळे त्याचे निंदन करणे गरजेचे असते. मजुराद्वारे शेतातील तण निंदन करून काढल्यास धुऱ्या बांधावरील व मोकळ्या जागेतील गवत जनावराकरिता पौष्टिक वैरण म्हणून वापरले जाणे शक्य होते. परंतु सध्या मजुरांचे दर वाढले आहे. तसेच प्रत्येकाकडे जनावरे नाहीत. त्यामुळे हिरव्या चाऱ्याची गरज नसल्याने, तसेच हे हिरवे कुरण दुसऱ्यास उपयोगी पडेल ही भावना लोप पावत चालल्याने शेतकरी सरसकट तणनाशकाची फवारणी करतात. त्यामुळे तणासहीत हिरवे गवतही जळून जाते. (प्रतिनिधी)तणनाशकांनी इतर वनस्पतीही जळून खाकसध्याची तणनाशके ही महागडी असून प्रभावी व जहाल आहे. फवारणीनंतर काही तासातच याचा प्रभाव दिसून येतो. फवारणीच्या जागेशिवाय आजुबाजुच्या जागेवरील गवत व इतर वनस्पतीही जळून खाक होताना दिसते. यामुळे पावसाळा आणि हिवाळा असा सात ते आठ मिहने जनावरांना पुरेल असा हिरवा आणि दुधाळ जनावरांसाठी पौष्टिक चारा अल्पावधीतच संपुष्टात येत आहे. जनावरांच्या हक्काचे वैरण अल्पावधीतच नाहीसे होत असल्याने पशुपालकासमोर गुराच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे जिल्ह्यात पशुधन विक्र ी वाढत आहे.वैरण टंचाईमुळे शेतकऱ्याचा जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय डबघाईस आला असून दुधाची टंचाई जाणवत आहे.