शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

अतिक्रमणामुळे गावाच्या विकासात अडथळा

By admin | Updated: May 15, 2015 00:50 IST

लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील लोकसंख्या जवळपास ३५०० आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे.

बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील लोकसंख्या जवळपास ३५०० आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. सध्या बारव्हा गावात काही नागरिकांनी ये जा करण्याच्या मार्गावर अतिक्रमण करून रस्ते पूर्णत: गडप केले आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतचे पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांच्या निगडीत गरजा पूर्ण करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकाची नेमणूक केली आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व विकासकामे आदी समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतला प्राधान्य आहे. मात्र या अधिकाराची जाणीव ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना नसल्यामुळे या सोयी पासून गावकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. बारव्हा येथील वॉर्ड क्र. ३ मध्ये ग्रामपंचायतच्या आबादी जागेत गरजू लोकांना मोफत घरकुल निर्माण करून देण्यात आले. त्यामध्ये १५ फुटाचे रस्ते सोडून बेघर वस्तीचे घरकुल तयार करण्यात आले. मात्र काही लोकांनी शासकीय जागेचा दुरुपयोग केला आणि या १५ फुटाचे रस्ते अतिक्रमणामुळे ५ फुटाचे शिल्लक आहेत. या सर्वसाधारण रस्त्याची रुंदी १५ फुट इतकी असते. मात्र अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी फक्त ३ ते ५ फुटापर्यंत राहिली आहे.अतिक्रमण होत असताना काही नागरिकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आणि वेळोवेळी लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. मात्र रस्ते अरुंद झाल्यामुळे बैलबंडी, ट्रॅक्टर सारखे वाहन घरापर्यंत नेता येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विशेषत: शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य नेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना लेखी पत्र देवून होत असलेल्या आणि झालेल्या अतिक्रमणाची माहिती दिली आणि कारवाईची मागणी केली. त्यानुसार खंडविकास अधिकारी, पंचायत समिती लाखांदूर आणि ग्रामसेवक बारव्हा यांना संबंधित अतिक्रमणाची चौकशी करून अतिक्रमण काढणे या संबंधाने ठराव देऊन कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. परंतु त्यांच्या आदेशाची दखल न घेता त्यांच्या आदेशाची खिल्ली उडविली जात आहे. गावात काही रस्त्यावर सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले. सदर रस्ता हा ३ मिटर रुंद (म्हणजे १० फुट) इतका तयार करणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या माध्यमातून रस्त्यावरील अतिक्रमण काढता येत होते. परंतु प्रशासनाला गावातीलच कोणते रस्ते किती फुट रुंद आहेत हे सुद्धा माहित नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या गावाच्या विकास खुंटत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्ते अतिक्रमणमुक्त करून द्यावे अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)