शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अवकाळी पावसाने जलस्तर कायम

By admin | Updated: August 23, 2015 00:08 IST

मागील पाच वर्षाच्या तुलनेत सन २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाण्याच्या पातळीला तारण्यात आले.

गोंदिया : मागील पाच वर्षाच्या तुलनेत सन २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाण्याच्या पातळीला तारण्यात आले. मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पाण्याची पातळी सरासरीच्या तुलनेत कमी झालेली नाही. मागील पाच वर्षाच्या तुलनेत ०.१ मीटरने पाण्याची पातळी वर आली आहे.पाण्याचा वापर वाढल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी दरवर्षीपेक्षा एक मीटरने खोल जाणे अपेक्षित होते. परंतु सन २०१४ च्या जून ते सप्टेंबरदरम्यानही वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पाऊस पडला. त्यानंतर सन २०१५ च्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पाण्याची पातळी जमिनीच्या खोल गेली नाही. मागील पाच वर्षात जमिनीच्या पृष्ठभागापासून ८.५५ मीटर खोल पाण्याची पातळी होती. यावर्षी ती पातळी ८.५४ असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिली आहे. शेतीचे सिंचन करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतीतही जवाहर विहीरींचा लाभ घेऊन त्या ठिकाणी बोअर करून आपल्या शेतीला सिंचन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे निश्चितच पाण्याची पातळी खोल जात आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाण्याची पातळी खोल गेली नाही. अकाली पावसामुळे पाण्याचा वापरही कमी झाला. तसेच गोळा झालेले पाणी जमिनीत मुरले. जिल्ह्याची मागील पाच वर्षाची भूजलपातळी ८.५५ होती. यावर्षी ८.५४ मीटर आहे. (तालुका प्रतिनिधी)विहिरी, बोअरमधील पाण्याची पातळी खालावलीजमिनीतील पाण्याची कायम असल्याचे भूवैज्ञानिक सांगत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, बोअरला पाहीजे तसे पाणीच नाही. सध्या पावसाअभावी काही शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. बोअरमधील पाण्याने पाणी देण्याचा प्रयोग शेतकरी करीत असले तरी त्यांना पाणी मिळेनासे झाले आहे. भर पावसाळ्यात ही स्थिती आहे. तरीही सरकारी यंत्रणा जमिनीतील पाण्याची पातळी कायम असल्याचे सांगत असल्यामुळे ही बाब आश्चर्यकारक ठरत आहे. यावर्षी अजून सरासरीच्या तुलनेत बराच कमी पाऊस बरसला आहे. आता पावसाचा जेमतेम एक महिना शिल्लक आहे. या दिवसात पाऊस न झाल्यास रबी हंगामात शेतकऱ्यांना पिक घेणे कठीण होणार आहे.जलस्तर वाढविण्यासाठी विविध योजनाजमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शासनाचे जुने धोरण पाणी अडवा, पाणी जिरवा कायम आहे. त्याचबरोबर पाण्याच्या पुनर्भरणाच्या पध्दती, रेन वॉटर हार्वेस्टींग, जलयुक्त शिवार अभियान, सिमेंट बंधारे, तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, साठवण बंधारे तयार करण्यात येतात. यामुळे जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविण्यास हे घटक महत्वाचे ठरत आहेत.