शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मृगाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

केशोरी : कोरोना विषाणूचे संकट डोक्यावर असतानाही बळीराजाने खरीप पूर्व शेतीची मशागत करुन ठेवली होती. गेल्या पंधरा दिवसापासून दररोज ...

केशोरी : कोरोना विषाणूचे संकट डोक्यावर असतानाही बळीराजाने खरीप पूर्व शेतीची मशागत करुन ठेवली होती. गेल्या पंधरा दिवसापासून दररोज ढगाळ वातावरण पाहता सिंचन व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी धान पेरणी आटोपून टाकली. तर उर्वरित शेतकरी मृग पहिल्याच दिवशी बरसल्याने धान पेरणीसाठी धावपळ करुन बियाणांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

या परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील शेतीची मशागत मे महिन्यातच उरकत असतात. उन्हाळी रब्बी धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. रब्बी धान पिकाची कापणी व मळणी संपताच पुढील खरिपाच्या हंगामासाठी शेती सज्ज ठेवली होती. रोहिणी नक्षत्रात एक दोनदा या भागात पाऊस येऊन गेला त्यामुळे शेतीची मशागत चांगल्या प्रकारे करता आली. पाण्यामुळे वापरलेला कचरा नाहीसा करण्यात आल्याने पुढील पिकासाठी कचऱ्याचा धोका टळला आहे. जमिनीची नांगरणी करुन धानाचे पऱ्हे फेकण्यासाठी योग्य करण्यात आली. कोरोना विषाणू संकट डोक्यावर असतानाही शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत होते. उन्हाळ्यात अवकाळी पावसाने गारपीट वाऱ्यासह कहर केल्याने शेतकरी काही प्रमाणात धास्तावला होता. रब्बी धान पीक घरी येणार एवढ्यात काही शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले. तरीही नव्या दमाने व हिमतीने पुन्हा शेतकरी खरिपाच्या हंगामातील पेरणीसाठी सज्ज होऊन मृग पहिल्याच दिवशी बरसताच बरोबर बियाणांची जुळवाजुळव करुन धान पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे दिसून येत आहे.