शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

वातावरणातील बदलामुळे धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: April 5, 2017 01:02 IST

वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे उन्हाळी धान पिकांवर मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे.

केशोरी : वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे उन्हाळी धान पिकांवर मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे. अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी उन्हाळी धानपीक लागवडीपासूनच दर १५ दिवसांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत असून त्यामुळे तापमानात सतत चढ-उतार होत आहे. यामुळे उन्हाळी धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिसरात दरवर्षीपेक्षा यंदा खासगी बोअरवेल्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी इटियाडोहापासून निघणाऱ्या गाढवी नदीच्या काठावरील उन्हाळी धानपीक लावले. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची मुबलकता लक्षात घेऊन मक्याची (कडधान्य) लागवड केली. परंतु यावर्षी रोगांचा एवढा प्रादुर्भाव वाढला असून कीटनाशकाची फवारणी करूनही रोग नाहिसे होताना दिसत नाही. खरीप हंगामापेक्षा रबी हंगामात धानपीक दोन पटीने जास्त निघतात. याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीत पुरेशा प्रमाणात पाणी व सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे धान पिकास पोषक वातावरण मिळते व धानाला मोठ्या प्रमाणात फुटवे निघतात. त्यामुळे उन्हाळी धानपीक पावसाळी धान पिकापेक्षा जास्त असते. वातावरणात बदलामुळे धानपिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. एवढेच नव्हे तर ढगाळ वातावरणामुळे अनेक रोग धानपिकांवर उद्भवतात. यामुळे यावर्षी उन्हाळी धानपिकांवर परिणाम होवून उत्पन्नात घट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)