शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धरणे तहानलेलीच

By admin | Updated: July 31, 2014 00:06 IST

जिल्ह्याला चार मोठी धरणे वरदान स्वरूपात लाभली आहेत. त्यांच्या भरवश्यावरच जिल्ह्यात वर्षभर पाणी पुरवठा व शेतीचे सिंचन केले जाते. यंदा मात्र पाहिजे त्या प्रमाणाता पावसाअभावी जिल्ह्यातील

गोंदिया : जिल्ह्याला चार मोठी धरणे वरदान स्वरूपात लाभली आहेत. त्यांच्या भरवश्यावरच जिल्ह्यात वर्षभर पाणी पुरवठा व शेतीचे सिंचन केले जाते. यंदा मात्र पाहिजे त्या प्रमाणाता पावसाअभावी जिल्ह्यातील ही धरणे अद्याप तहानलेलीच आहेत. पावसाळा मधोमध असतानाही ही धरणे अर्धीच भरल्याची नोंद आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर यावर्षी रबी हंगामात पाण्याला पुरेशा पाण्यासाठी वंचित राहावे लागणार आहे. जिल्ह्यात चार मोठ्या धरणांसह, १० मध्यम प्रकल्प, २० लघु प्रकल्प व ३८ जुने मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्याला या पाणी पुरवठा व शेतीसाठी सर्वांचाच आधार घ्यावा लागतो. यात प्रमुख सहभाग अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह, देवरी तालुक्यातील सिरपूर, आमगाव तालुक्यातील पुजारीलोटा व कालीसराड यांचा आहे. जिल्ह्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी या चार धरणांत पुरेपूर पाणीसाठा असणे आवश्यक आहे. मात्र यंदा पावसाळा अर्धा लोटून गेला असून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नसल्याने ही धरणे अर्धीच भरलेली आहेत. आकडेवारीनुसार बघितल्यास, इटियाडोह धरणात आज ४७.६५ टक्के पाणीसाठा असून मागील याच धरणात ६५.२३ टक्के पाणीसाठा होता. सिरपूर धरणात ५७.२९ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ७०.४४ टक्के पाणीसाठी होता. पूजारीटोला धरणात ५६.०२ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ५३.५८ टक्के तर कालीसराड धरणात ५१.४२ टक्के पाणीसाठी मागील वर्षी ५७.५१ टक्के पाणीसाठी होता. वरील आकडेवारी बघता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांतील पाणीसाठी कमीच आहे. मागील वर्षी धरणांमध्ये असलेल्या भरपूर पाणीसाठ्यामुळे याच प्रकल्पांमधून जिल्हाला पाणी पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे रबीच्या हंगामातही पाटबंधारे विभागाने शेतीला सिंचनासाठी पुरेपूर पाणी दिले होते. शिवाय मध्यम प्रकल्पांची स्थिती बघितल्यास, बोदलकसा मध्यम प्रकल्पात ८०.१२ टक्के, चोरखमारा ५१.०३ टक्के, चुलबंद ८६.८९ टक्के, खैरबंधा ४४.३७ टक्के, मानागड ८१.९८ टक्के, रेंगेपार ७४.४५ टक्के, संग्रामपूर ६६.८६ टक्के पाणीसाठी असून उमरझरी, कटंगी व कलपाथरी मध्यम प्रकल्पांत पुरेपुर पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात बरसलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती सुधारली असून यातील मोजकेच पाण्याने तुडूंब भरले आहेत. तर उर्वरीत अद्याप अर्ध्यावरच अडकले असून त्यांची तहान भागलेली नसल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)