शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

पावसाअभावी धरणे तहानलेलीच

By admin | Updated: July 31, 2014 00:06 IST

जिल्ह्याला चार मोठी धरणे वरदान स्वरूपात लाभली आहेत. त्यांच्या भरवश्यावरच जिल्ह्यात वर्षभर पाणी पुरवठा व शेतीचे सिंचन केले जाते. यंदा मात्र पाहिजे त्या प्रमाणाता पावसाअभावी जिल्ह्यातील

गोंदिया : जिल्ह्याला चार मोठी धरणे वरदान स्वरूपात लाभली आहेत. त्यांच्या भरवश्यावरच जिल्ह्यात वर्षभर पाणी पुरवठा व शेतीचे सिंचन केले जाते. यंदा मात्र पाहिजे त्या प्रमाणाता पावसाअभावी जिल्ह्यातील ही धरणे अद्याप तहानलेलीच आहेत. पावसाळा मधोमध असतानाही ही धरणे अर्धीच भरल्याची नोंद आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर यावर्षी रबी हंगामात पाण्याला पुरेशा पाण्यासाठी वंचित राहावे लागणार आहे. जिल्ह्यात चार मोठ्या धरणांसह, १० मध्यम प्रकल्प, २० लघु प्रकल्प व ३८ जुने मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्याला या पाणी पुरवठा व शेतीसाठी सर्वांचाच आधार घ्यावा लागतो. यात प्रमुख सहभाग अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह, देवरी तालुक्यातील सिरपूर, आमगाव तालुक्यातील पुजारीलोटा व कालीसराड यांचा आहे. जिल्ह्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी या चार धरणांत पुरेपूर पाणीसाठा असणे आवश्यक आहे. मात्र यंदा पावसाळा अर्धा लोटून गेला असून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नसल्याने ही धरणे अर्धीच भरलेली आहेत. आकडेवारीनुसार बघितल्यास, इटियाडोह धरणात आज ४७.६५ टक्के पाणीसाठा असून मागील याच धरणात ६५.२३ टक्के पाणीसाठा होता. सिरपूर धरणात ५७.२९ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ७०.४४ टक्के पाणीसाठी होता. पूजारीटोला धरणात ५६.०२ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ५३.५८ टक्के तर कालीसराड धरणात ५१.४२ टक्के पाणीसाठी मागील वर्षी ५७.५१ टक्के पाणीसाठी होता. वरील आकडेवारी बघता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांतील पाणीसाठी कमीच आहे. मागील वर्षी धरणांमध्ये असलेल्या भरपूर पाणीसाठ्यामुळे याच प्रकल्पांमधून जिल्हाला पाणी पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे रबीच्या हंगामातही पाटबंधारे विभागाने शेतीला सिंचनासाठी पुरेपूर पाणी दिले होते. शिवाय मध्यम प्रकल्पांची स्थिती बघितल्यास, बोदलकसा मध्यम प्रकल्पात ८०.१२ टक्के, चोरखमारा ५१.०३ टक्के, चुलबंद ८६.८९ टक्के, खैरबंधा ४४.३७ टक्के, मानागड ८१.९८ टक्के, रेंगेपार ७४.४५ टक्के, संग्रामपूर ६६.८६ टक्के पाणीसाठी असून उमरझरी, कटंगी व कलपाथरी मध्यम प्रकल्पांत पुरेपुर पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात बरसलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती सुधारली असून यातील मोजकेच पाण्याने तुडूंब भरले आहेत. तर उर्वरीत अद्याप अर्ध्यावरच अडकले असून त्यांची तहान भागलेली नसल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)