शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बागेत पडणार ‘कोरड’

By admin | Updated: February 27, 2016 02:03 IST

येथील सुभाष बागेतील एक विहीर व एकमात्र बोअरवेल बंद पडल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे.

कपिल केकत गोंदियायेथील सुभाष बागेतील एक विहीर व एकमात्र बोअरवेल बंद पडल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. आता दुसऱ्या विहीरीने काम कसे-बसे निघत असले तरी उन्हाळ््यात ती विहीरही आटते. अशात मात्र बागेत ‘कोरड’ पडणार व झाडांना पाणी देणे संभव होणार नाही. करिता प्रभारी बगिचा निरीक्षकांनी एका बोअरवेलची मागणी केली आहे. मागील वर्षापासून ते यासाठी पत्र देत असून आतापर्यंत बोअरवेल मिळालेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा बागेसाठी भारी जाणार असल्याचे दिसते. शहरात आज फक्त सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हेच एकमेव बाग उरले आहे. दिवसभर कामाच्या थकव्यानंतर झाडांच्या सावलीत बसून निवांत वेळ घालविण्यासाठी वृद्धांपासून तरूण मंडळीही बागेत येते. हिरव्यागार झाडांच्या सावलीत बसून आपला काही वेळ घालविण्यासाठी शहरवासीयांची बागेत गर्दी होते. शहरातील एकच बाग असल्याने चिमुकल्यांचीही येथील खेळणे व हिरवळीवर खेळण्यासाठी गर्दी असते. अवघ्या शहरातील नागरिकांची बागेकडेच धाव असते. त्यातही आता उन्हाळ््यात शाळांच्या सुट्या लागल्यानंतर चिमुकल्यांसह पालकही बागेत येतात व बागेत पाय ठेवायला जागा उरत नाही. या बागेतील हिरवळीसाठी बागेत दोन विहिरी व एक बोअरवेल आहे. यातील एक विहीर पूर्णपणे आटलेली असून दुसऱ्या विहिरीवरूनच सध्या झाडांना पाणी दिले जात आहे. मात्र उन्हाळ््यात ही विहीरही आटते. शिवाय बोअरवेल बंद पडले असून पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार बोअरवेल बुजले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात झाडांना पाणी द्यावे कसे अशा प्रश्न सध्या बगिचा प्रशासनापुढे उभा आहे. पाण्याची ही समस्या सुटावी यासाठी प्रभारी बगिचा निरीक्षक प्रवीण मिश्रा यांनी नगर परिषदेकडे एका बोअरवेलची मागणी केली आहे. दुसरी विहीरही आटल्यास बोअरवेलद्वारे पाणी देता येईल असा त्यांचा या मागचा हेतू आहे. मात्र त्यांच्या मागणीवर अद्याप तरी काहीच निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. एक बोअरवेल मिळाल्यास बागेतील पाण्याची समस्या सुटणार. मात्र अशा या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. झाडांना पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकली बागेतील झाडांना पाणी पुरवठा करता यावा यासाठी बागेत पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. हे झाले असले तरीही बोअरवेल नसल्यास पाणी देणार कोठून, असा प्रश्न बागिचा प्रशासनापुढे उभा आहे. यंदा कसे करूनही बोअरवेल गरजेची झाली आहे. अन्यथा झाडांना पाणी पुरवठा करता येणार नाही. अशात पाईपलाईनसाठी करण्यात आलेला लाखो रूपयांचा खर्च मात्र व्यर्थ जाणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मागील वर्षापासून देताहेत पत्रप्रभारी बगिचा निरीक्षक मिश्रा यांनी या गंभीर बाबीला लक्षात घेत मागील वर्षीही नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून बोअरवेलच्या विषयावर निर्णय घेण्यात आलेला नाही. बागेला बोअरवेल मंजूर झाल्यास उन्हाळ््यात बागेत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या सुटणार. तसेच झाडांना पाणी देण्याची व्यवस्था होणार. करिता त्यांची या बोअरवेलसाठी धडपड सुरू आहे. आता कधी पदाधिकारी व अधिकरी मेहरबान होतात हे बघायचे आहे.