शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

बागेत पडणार ‘कोरड’

By admin | Updated: February 27, 2016 02:03 IST

येथील सुभाष बागेतील एक विहीर व एकमात्र बोअरवेल बंद पडल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे.

कपिल केकत गोंदियायेथील सुभाष बागेतील एक विहीर व एकमात्र बोअरवेल बंद पडल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. आता दुसऱ्या विहीरीने काम कसे-बसे निघत असले तरी उन्हाळ््यात ती विहीरही आटते. अशात मात्र बागेत ‘कोरड’ पडणार व झाडांना पाणी देणे संभव होणार नाही. करिता प्रभारी बगिचा निरीक्षकांनी एका बोअरवेलची मागणी केली आहे. मागील वर्षापासून ते यासाठी पत्र देत असून आतापर्यंत बोअरवेल मिळालेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा बागेसाठी भारी जाणार असल्याचे दिसते. शहरात आज फक्त सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हेच एकमेव बाग उरले आहे. दिवसभर कामाच्या थकव्यानंतर झाडांच्या सावलीत बसून निवांत वेळ घालविण्यासाठी वृद्धांपासून तरूण मंडळीही बागेत येते. हिरव्यागार झाडांच्या सावलीत बसून आपला काही वेळ घालविण्यासाठी शहरवासीयांची बागेत गर्दी होते. शहरातील एकच बाग असल्याने चिमुकल्यांचीही येथील खेळणे व हिरवळीवर खेळण्यासाठी गर्दी असते. अवघ्या शहरातील नागरिकांची बागेकडेच धाव असते. त्यातही आता उन्हाळ््यात शाळांच्या सुट्या लागल्यानंतर चिमुकल्यांसह पालकही बागेत येतात व बागेत पाय ठेवायला जागा उरत नाही. या बागेतील हिरवळीसाठी बागेत दोन विहिरी व एक बोअरवेल आहे. यातील एक विहीर पूर्णपणे आटलेली असून दुसऱ्या विहिरीवरूनच सध्या झाडांना पाणी दिले जात आहे. मात्र उन्हाळ््यात ही विहीरही आटते. शिवाय बोअरवेल बंद पडले असून पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार बोअरवेल बुजले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात झाडांना पाणी द्यावे कसे अशा प्रश्न सध्या बगिचा प्रशासनापुढे उभा आहे. पाण्याची ही समस्या सुटावी यासाठी प्रभारी बगिचा निरीक्षक प्रवीण मिश्रा यांनी नगर परिषदेकडे एका बोअरवेलची मागणी केली आहे. दुसरी विहीरही आटल्यास बोअरवेलद्वारे पाणी देता येईल असा त्यांचा या मागचा हेतू आहे. मात्र त्यांच्या मागणीवर अद्याप तरी काहीच निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. एक बोअरवेल मिळाल्यास बागेतील पाण्याची समस्या सुटणार. मात्र अशा या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. झाडांना पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकली बागेतील झाडांना पाणी पुरवठा करता यावा यासाठी बागेत पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. हे झाले असले तरीही बोअरवेल नसल्यास पाणी देणार कोठून, असा प्रश्न बागिचा प्रशासनापुढे उभा आहे. यंदा कसे करूनही बोअरवेल गरजेची झाली आहे. अन्यथा झाडांना पाणी पुरवठा करता येणार नाही. अशात पाईपलाईनसाठी करण्यात आलेला लाखो रूपयांचा खर्च मात्र व्यर्थ जाणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मागील वर्षापासून देताहेत पत्रप्रभारी बगिचा निरीक्षक मिश्रा यांनी या गंभीर बाबीला लक्षात घेत मागील वर्षीही नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून बोअरवेलच्या विषयावर निर्णय घेण्यात आलेला नाही. बागेला बोअरवेल मंजूर झाल्यास उन्हाळ््यात बागेत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या सुटणार. तसेच झाडांना पाणी देण्याची व्यवस्था होणार. करिता त्यांची या बोअरवेलसाठी धडपड सुरू आहे. आता कधी पदाधिकारी व अधिकरी मेहरबान होतात हे बघायचे आहे.