शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बागेत पडणार ‘कोरड’

By admin | Updated: February 27, 2016 02:03 IST

येथील सुभाष बागेतील एक विहीर व एकमात्र बोअरवेल बंद पडल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे.

कपिल केकत गोंदियायेथील सुभाष बागेतील एक विहीर व एकमात्र बोअरवेल बंद पडल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. आता दुसऱ्या विहीरीने काम कसे-बसे निघत असले तरी उन्हाळ््यात ती विहीरही आटते. अशात मात्र बागेत ‘कोरड’ पडणार व झाडांना पाणी देणे संभव होणार नाही. करिता प्रभारी बगिचा निरीक्षकांनी एका बोअरवेलची मागणी केली आहे. मागील वर्षापासून ते यासाठी पत्र देत असून आतापर्यंत बोअरवेल मिळालेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा बागेसाठी भारी जाणार असल्याचे दिसते. शहरात आज फक्त सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हेच एकमेव बाग उरले आहे. दिवसभर कामाच्या थकव्यानंतर झाडांच्या सावलीत बसून निवांत वेळ घालविण्यासाठी वृद्धांपासून तरूण मंडळीही बागेत येते. हिरव्यागार झाडांच्या सावलीत बसून आपला काही वेळ घालविण्यासाठी शहरवासीयांची बागेत गर्दी होते. शहरातील एकच बाग असल्याने चिमुकल्यांचीही येथील खेळणे व हिरवळीवर खेळण्यासाठी गर्दी असते. अवघ्या शहरातील नागरिकांची बागेकडेच धाव असते. त्यातही आता उन्हाळ््यात शाळांच्या सुट्या लागल्यानंतर चिमुकल्यांसह पालकही बागेत येतात व बागेत पाय ठेवायला जागा उरत नाही. या बागेतील हिरवळीसाठी बागेत दोन विहिरी व एक बोअरवेल आहे. यातील एक विहीर पूर्णपणे आटलेली असून दुसऱ्या विहिरीवरूनच सध्या झाडांना पाणी दिले जात आहे. मात्र उन्हाळ््यात ही विहीरही आटते. शिवाय बोअरवेल बंद पडले असून पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार बोअरवेल बुजले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात झाडांना पाणी द्यावे कसे अशा प्रश्न सध्या बगिचा प्रशासनापुढे उभा आहे. पाण्याची ही समस्या सुटावी यासाठी प्रभारी बगिचा निरीक्षक प्रवीण मिश्रा यांनी नगर परिषदेकडे एका बोअरवेलची मागणी केली आहे. दुसरी विहीरही आटल्यास बोअरवेलद्वारे पाणी देता येईल असा त्यांचा या मागचा हेतू आहे. मात्र त्यांच्या मागणीवर अद्याप तरी काहीच निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. एक बोअरवेल मिळाल्यास बागेतील पाण्याची समस्या सुटणार. मात्र अशा या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. झाडांना पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकली बागेतील झाडांना पाणी पुरवठा करता यावा यासाठी बागेत पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. हे झाले असले तरीही बोअरवेल नसल्यास पाणी देणार कोठून, असा प्रश्न बागिचा प्रशासनापुढे उभा आहे. यंदा कसे करूनही बोअरवेल गरजेची झाली आहे. अन्यथा झाडांना पाणी पुरवठा करता येणार नाही. अशात पाईपलाईनसाठी करण्यात आलेला लाखो रूपयांचा खर्च मात्र व्यर्थ जाणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मागील वर्षापासून देताहेत पत्रप्रभारी बगिचा निरीक्षक मिश्रा यांनी या गंभीर बाबीला लक्षात घेत मागील वर्षीही नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून बोअरवेलच्या विषयावर निर्णय घेण्यात आलेला नाही. बागेला बोअरवेल मंजूर झाल्यास उन्हाळ््यात बागेत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या सुटणार. तसेच झाडांना पाणी देण्याची व्यवस्था होणार. करिता त्यांची या बोअरवेलसाठी धडपड सुरू आहे. आता कधी पदाधिकारी व अधिकरी मेहरबान होतात हे बघायचे आहे.