शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

दुष्काळसदृश परिस्थिती कायम

By admin | Updated: September 17, 2015 02:14 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील पंधरवड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकरी चिंताग्रस्त : पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणारशेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील पंधरवड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. या परिसरात शेंडा, मसरामटोला, आबकारीटोला, मोहघाटा, उशिखेडा, पाटीलटोला, कन्हारपायली, सालईटोला, पांढरवानी, कोयलारी, प्रधानटोला, कोहळीपार असे अनेक खेडेगाव आहेत. हा परिसर धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवस्थाय असून शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. परंतु मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे धानपीक वाळून रोगाने ग्रासले आहे.पावसाअभावी तलाव, बोड्यात पाणी साचले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी १४ ते २० फूट खोलात गेली. विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. सध्या हलक्या प्रतिचे धान निसण्याच्या मार्गावर असताना पावसाने दगा दिला. बांध्याना भेगा पडल्या. बळीराजावर दुष्काळाची गडद छाया पडत आहे. धानाची शेती करुन आपला प्रपंच चालवणारा शेतकरी कर्जापायी आधीच हवालदिल झाला आहे. कधी बँकेकडून तर कधी स्थानिक संस्थाकडून कर्ज घेऊन शेती पिकासाठी झोकून देतो. आपला देश कृषिप्रधान आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे, असे संबोधले जाते. सव्वाशे कोटी जनतेचा पोशिंदा हलाखीचे जीवन जगत आहे. तरीही त्याच्या मदतीला शासन स्तरावर कोणतीच दखल घेतली जात नाही. या परिसरात काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय म्हणून शेतात विहिरीवर मोटार पंप आहेत. परंतु मोटारींना पुरेसा विद्युत प्रवाह मिळत नाही. त्यामुळे विहिरीतील पाणी बाहेर पडत नाही. वारंवार तक्रार करुनही या समस्येला विद्युत विभाग गांभीर्याने घेत नाही. या देशात ब्रिटिशकाळपासून आणेवारीची पद्धत अमलात आहे. ती एकदम चुकीची असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. ज्या शेतकऱ्याला दुष्काळी परिस्थितीत २५ टक्के उत्पन्न येत नाही, अशा शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांहून अधिक उत्पन्न दाखवून अन्याय केला जातो. या चुकीच्या आणेवारी पद्धतीने अनेक शेतकरी वंचित राहतात. त्याच सुधारणा होणे गरजेचे आहे.सध्या या परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. शासनाकडून काही आर्थिक मदत मिळेल अशी आशा आहे. त्यासाठी शासनाचे पावले उचलणे गरजेचे आहे, असे शेंडा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)