शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

दुष्काळसदृश परिस्थिती कायम

By admin | Updated: September 17, 2015 02:14 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील पंधरवड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकरी चिंताग्रस्त : पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणारशेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील पंधरवड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. या परिसरात शेंडा, मसरामटोला, आबकारीटोला, मोहघाटा, उशिखेडा, पाटीलटोला, कन्हारपायली, सालईटोला, पांढरवानी, कोयलारी, प्रधानटोला, कोहळीपार असे अनेक खेडेगाव आहेत. हा परिसर धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवस्थाय असून शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. परंतु मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे धानपीक वाळून रोगाने ग्रासले आहे.पावसाअभावी तलाव, बोड्यात पाणी साचले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी १४ ते २० फूट खोलात गेली. विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. सध्या हलक्या प्रतिचे धान निसण्याच्या मार्गावर असताना पावसाने दगा दिला. बांध्याना भेगा पडल्या. बळीराजावर दुष्काळाची गडद छाया पडत आहे. धानाची शेती करुन आपला प्रपंच चालवणारा शेतकरी कर्जापायी आधीच हवालदिल झाला आहे. कधी बँकेकडून तर कधी स्थानिक संस्थाकडून कर्ज घेऊन शेती पिकासाठी झोकून देतो. आपला देश कृषिप्रधान आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे, असे संबोधले जाते. सव्वाशे कोटी जनतेचा पोशिंदा हलाखीचे जीवन जगत आहे. तरीही त्याच्या मदतीला शासन स्तरावर कोणतीच दखल घेतली जात नाही. या परिसरात काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय म्हणून शेतात विहिरीवर मोटार पंप आहेत. परंतु मोटारींना पुरेसा विद्युत प्रवाह मिळत नाही. त्यामुळे विहिरीतील पाणी बाहेर पडत नाही. वारंवार तक्रार करुनही या समस्येला विद्युत विभाग गांभीर्याने घेत नाही. या देशात ब्रिटिशकाळपासून आणेवारीची पद्धत अमलात आहे. ती एकदम चुकीची असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. ज्या शेतकऱ्याला दुष्काळी परिस्थितीत २५ टक्के उत्पन्न येत नाही, अशा शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांहून अधिक उत्पन्न दाखवून अन्याय केला जातो. या चुकीच्या आणेवारी पद्धतीने अनेक शेतकरी वंचित राहतात. त्याच सुधारणा होणे गरजेचे आहे.सध्या या परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. शासनाकडून काही आर्थिक मदत मिळेल अशी आशा आहे. त्यासाठी शासनाचे पावले उचलणे गरजेचे आहे, असे शेंडा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)