शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा नाकाबंदीचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST

आमगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाने कडक निर्बंध घातले. सकाळी ११ वाजतानंतर विनाकारण फिरायला बंदी घातली. ...

आमगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाने कडक निर्बंध घातले. सकाळी ११ वाजतानंतर विनाकारण फिरायला बंदी घातली. मात्र, तरीही आमगावकरांनी घराबाहेर पडणे न थांबविल्याने पोलिसांनी नाकाबंदीचा डाेस देण्यास सुरुवात केली आहे. सोबतच कोरोना चाचणीही केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांसह पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सायंकाळी तळ ठोकला. प्रत्येक वाहन चालकांची कसून चौकशी करीत विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. सोबतच कोरोनाची रॅपिड तपासणी करण्यात आली. या नाकाबंदीत होणाऱ्या चौकशीमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची व वाहनांची चांगलीच कोंडी झाल्याचेही दिले. राज्यासह शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू असली, तरी आमगाववासी बिनधास्त शहरात फिरताना दिसतात. सुरुवातीला पोलिसांनी सौम्य भूमिका घेत केवळ चौकशी करून नागरिकांना सोडले. पण,कारवाईतून मोकळीक मिळाल्याचा गैरफायदा घेणाऱ्या नागरिकांना आता चाप लावण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे क्षुल्लक कारणांसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. ज्या ठिकाणी एका व्यक्तीचे काम आहे, त्या ठिकाणी दोघे-चौघे जात आहेत. हा मुक्त संचार रोखण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदीत वाढ केली आहे. शहरातल्या प्रमुख चौकात पोलिसांचा फौजफाटा जमला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण व पोलीस कर्मचाऱ्यांनी ये-जा करणाऱ्या प्रत्येकांची चौकशी केली. पोलीस विभाग आणि आरोग्य विभागाच्या या प्रयत्नांमुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल हे नक्कीच.