शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

पाणी पिताय ना : मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कुठल्याही आजाराचे मूळ हे दूषित पाणी असू शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना विशेष काळजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कुठल्याही आजाराचे मूळ हे दूषित पाणी असू शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे काविळ, अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो हे आजार होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे या दिवसात नागरिकांनी उकळलेले पाणी प्यावे तसेच बाहेरील व उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे. अन्यथा आपण साथीच्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने उकळलेले पाणी पिणे सर्वाधिक चांगले असते. यामुळे साथीच्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. पावसाळ्यात आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर पाणी पिताना काळजी घेतलेली बरी.

..............

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

- उलटी, टायफाईड

कॉलरा, गॅस्ट्रो

व्हायरल, वायरल इन्फेक्शन

काविळ, अतिसार

..........................

आजाराची लक्षणे

१) गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी पिल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणे दिसू लागतात.

२) टायफाईड दूषित पाण्यामुळे होतो. पोटात दुखते, रुग्णाला ताप येतो, उपचार न केल्यास जंतू रक्तात मिसळतात.

३) उलट्या, ताप, लघवी पिवळी हाेणे, भूक न लागणे ही काविळची लक्षणे आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना या आजाराची लक्षणे कायम राहतात.

..............

ही घ्या काळजी, पाणी उकळून प्या

- पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुवून त्यात पाणी भरावे.

- पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून आणि उकळून प्यावे.

- पाण्यामध्ये मेडिक्लोरचे काही थेंब टाकावे.

- बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

- पावसाळ्यात एवढी खबरदारी घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते.

........

गाेंदियाकर पितात दररोज ३५ हजार लीटर पाणी

गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत तालुक्यातील डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. प्रतिव्यक्ती ३५ लीटर याप्रमाणे दोनवेळा पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शहरात दोन ठिकाणी पाणी जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यातून पाणी शुध्द होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो.

..............