शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

पाणी पिताय ना : मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कुठल्याही आजाराचे मूळ हे दूषित पाणी असू शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना विशेष काळजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कुठल्याही आजाराचे मूळ हे दूषित पाणी असू शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे काविळ, अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो हे आजार होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे या दिवसात नागरिकांनी उकळलेले पाणी प्यावे तसेच बाहेरील व उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे. अन्यथा आपण साथीच्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने उकळलेले पाणी पिणे सर्वाधिक चांगले असते. यामुळे साथीच्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. पावसाळ्यात आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर पाणी पिताना काळजी घेतलेली बरी.

..............

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

- उलटी, टायफाईड

कॉलरा, गॅस्ट्रो

व्हायरल, वायरल इन्फेक्शन

काविळ, अतिसार

..........................

आजाराची लक्षणे

१) गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी पिल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणे दिसू लागतात.

२) टायफाईड दूषित पाण्यामुळे होतो. पोटात दुखते, रुग्णाला ताप येतो, उपचार न केल्यास जंतू रक्तात मिसळतात.

३) उलट्या, ताप, लघवी पिवळी हाेणे, भूक न लागणे ही काविळची लक्षणे आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना या आजाराची लक्षणे कायम राहतात.

..............

ही घ्या काळजी, पाणी उकळून प्या

- पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुवून त्यात पाणी भरावे.

- पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून आणि उकळून प्यावे.

- पाण्यामध्ये मेडिक्लोरचे काही थेंब टाकावे.

- बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

- पावसाळ्यात एवढी खबरदारी घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते.

........

गाेंदियाकर पितात दररोज ३५ हजार लीटर पाणी

गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत तालुक्यातील डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. प्रतिव्यक्ती ३५ लीटर याप्रमाणे दोनवेळा पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शहरात दोन ठिकाणी पाणी जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यातून पाणी शुध्द होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो.

..............