शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

निकालानंतर सर्वच पक्षांचे वर्चस्वाचे दावे - प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:31 IST

गोंदिया : ग्रामीण भागातील राजकारण आणि विकासासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. १८) जाहीर झाले. निकालानंतर ...

गोंदिया : ग्रामीण भागातील राजकारण आणि विकासासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. १८) जाहीर झाले. निकालानंतर स्थानिक सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या पक्षाची सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचे दावे केले आहेत.

एकूण १८१ ग्रामपंचायतींपैकी ६९ ग्रामपंचायतींवर भाजपने, ८१ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने आपले उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे, तर ३१ ग्रामपंचायतींवर अपक्षांची सत्ता आली आहे.

जिल्ह्यातील एकूण १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, यापैकी ८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने प्रत्यक्षात १८१ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर सोमवारी मतमोजणी करण्यात आली. यात भाजपने ६९, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ८१ ग्रामपंचायतीत वर्चस्व स्थापन करण्यात यश आल्याचे दावे - प्रतिदावे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी केले आहेत. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार गोंदिया तालुक्यात भाजप १४, काँग्रेस - राष्ट्रवादी ६, अपक्ष १७, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजपला फिफ्टी फिफ्टी जागा मिळाल्या असून, एका ग्रामपंचायतीवर अपक्षांचे वर्चस्व आहे. सालेकसा तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतींवर भाजप आणि ३ ग्रामपंचायतींवर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत उमेदवार निवडून आल्याचा दावा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. देवरी आणि गाेरेगाव तालुक्यात सर्वच पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाची सत्ता आल्याचे दावे - प्रतिदावे केले आहेत. मात्र, याचे नेमके चित्र हे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर हाेऊन ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

......

निकालानंतर सर्वांचाच तो आपलाच नारा

ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नाही. या निवडणुका स्थानिक पातळीवर लढविल्या जात असल्याने सर्वच पक्ष हे बाहेरून पाठिंबा देतात. मात्र, सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे - प्रतिदावे केले. तसेच निवडून आल्यानंतर तो आपलाच हाच नारा दिसून आला.

.....................

आजी - माजी आमदारांनी राखला गड

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांच्या आजी - माजी आमदारांनी आपल्या क्षेत्रात वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. गोंदिया विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांनी १४, तर माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सुध्दा १४ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केले. त्यामुळे आजी - माजी आमदारांनी गड कायम ठेवल्याचे चित्र होते. सडक अर्जुनी, आमगाव, सालेकसा, देवरी तालुक्यातसुध्दा हेच चित्र होते.

.................

चाचणी झाली आता मुख्य परीक्षेकडे लक्ष

जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचासुध्दा कार्यकाळ पूर्ण झाला असून, त्यासाठीही लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याने याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून, चाचणी परीक्षा झाली आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...

निकालानंतर एकच जल्लोष

ग्रामपंचायतीची मतमोजणी तालुकास्तरावर घेण्यात आली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी मतमोजणी केंद्राबाहेर विजयाचा जल्लोष साजरा केला, तर मतमोजणी केंद्राला शुक्रवारी जत्रेचे स्वरूप आले होते.

...........

जातांना प्रफुल्लित मात्र परततांना हिरमुसले

मतमोजणी केंद्राच्या आत केवळ उमेदवारांनाच प्रवेश दिला जात होता. ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या नावाची घाेषणा झाल्यानंतर ते मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जात होते. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर कुणाचा विजय, तर कुणाचा पराजय हे निश्चित आहे. त्यामुळे निकालानंतर काही जण प्रफुल्लित काही जण परतताना हिरमुसले दिसून येत होते.