शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५,८९२ हेक्टर बाधित क्षेत्राला २.६९ कोटींचा निधी अपेक्षित

By admin | Updated: March 23, 2015 01:37 IST

जिल्ह्यात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ पर्यंत आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जबर फटका बसला.

गोंदिया : जिल्ह्यात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ पर्यंत आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जबर फटका बसला. यात फळपिकांसह जिरायती रबीचे पीक काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी पूर्णत: नष्ट झाले. अवकाळी पावसाने ५० टक्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ व रबी पिकांचे बाधित क्षेत्र ५,८९२.८१ हेक्टर असून नुकसान भरपाईसाठी दोन कोटी ६९ लाख ३० हजार ५९५ अपेक्षित निधी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.सदर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील जवस, लाखोळी, हरभरा, गहू व भाजीपाला या जिरायती रबी पिकाचे क्षेत्र बाधित झाले. गोंदिया तालुक्यात या पिकांचे एक हजार ९९३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १२ हजार १०० आहे. चार हजार ५०० रूपये प्रति हेक्टरप्रमाणे गोंदिया तालुक्याला ८९ लाख ६८ हजार ५०० रूपयांच्या अपेक्षित निधीची गरज आहे. गोरेगाव तालुक्यातील ६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी २५१ आहेत. त्यासाठी साडेचार हजार रूपये प्रति हेक्टरप्रमाणे दोन लाख ७० हजार रूपयांची आवश्यकता आहे. तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी होवून जवस, लाखोळी, हरभरा, गहू व भाजीपाला पिकांचे सर्वाधिक तीन हजार ७८४.७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात सहा हजार १९६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश असून नुकसान भरपाईसाठी एक कोटी ७० लाख ३१ हजार ३७५ रूपयांची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आले आहे.गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीनच तालुक्यांत सदर रबी पिकांचे नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यानुसार एकूण बाधित क्षेत्र ५८३७.७५ हेक्टर व नुकसानग्रस्त १८ हजार ५४७ शेतकरी संख्या दाखविण्यात आले असून नुकसान भरपाईसाठी २ कोटी ६२ लाख ६९ हजार ८७५ एवढ्या अपेक्षित निधीची आवश्यकता आहे. याशिवाय अवकाळी पावसाचा फटका फळपिकांनाही बसला आहे. आंबा सर्वाधिक बाधित झालेला पीक आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक फळपिकाखालील बाधित झालेला गोंदिया तालुक्यातील क्षेत्र १८ हेक्टर आहे. यात नुकसानग्रस्त शेतकरी २० असून साडेचार हजार रूपये प्रति हेक्टरप्रमाणे दोन लाख १६ हजार रूपये अपेक्षित निधी ठरविण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील १९.८० हेक्टर फळपिकांचे क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्तांमध्ये ३७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यासाठी दोन लाख ३७ हजार ६०० रूपयांची गरज आहे. सालेकसा तालुक्यात १७.२६ हेक्टरे क्षेत्र बाधित असून नुकसानग्रस्तांमध्ये २४ शेतकऱ्यांचा समावेश आहे व नुकसान भरपाईसाठी दोन लाख सात हजार १२० रूपयांची गरज भासणार आहे. गोंदिया, आमगाव व सालेकसा या तीनच तालुक्यांत फळपिकांचे नुकसान दाखविण्यात आले असून एकूण बाधित क्षेत्र ५५.०६ हेक्टरे, बाधित शेतकरी संख्या ८१ व नुकसान भरपाईसाठी सहा लाख ६० हजार ७२० रूपयांचा अपेक्षित निधी नमूद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)नुकसानग्रस्त तीनच तालुक्यांचा समावेश२८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्हाच न्हावून निघाला होता. मात्र कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणात जवस, लाखोळी, हरभरा, गहू व भाजीपाला या रबी पिकाचे बाधित क्षेत्र केवळ गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीनच तालुक्यात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित अर्जुनी-मोरगाव, देवरी, आमगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी या पाच तालुक्यातील रबी पिकांना नुकसान झाले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच गोंदिया, आमगाव व सालेकसा या तीनच तालुक्यांत फळ पिकांचे नुकसान दाखविण्यात येत आहे. तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, देवरी व अर्जुनी-मोरगाव या पाच तालुक्यांत फळपिकांचे कसलेही नुकसान दाखविण्यात आले नाही. तिरोडा तालुक्यात तर अतिवृष्टी झाल्याने आंब्याचे मोहोर पूर्णत: गळाले होते. मात्र तिरोडा तालुक्यात फळपिकांचे नुकसान शून्य दाखविण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.