शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

जिल्ह्यात ५,८९२ हेक्टर बाधित क्षेत्राला २.६९ कोटींचा निधी अपेक्षित

By admin | Updated: March 23, 2015 01:37 IST

जिल्ह्यात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ पर्यंत आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जबर फटका बसला.

गोंदिया : जिल्ह्यात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ पर्यंत आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जबर फटका बसला. यात फळपिकांसह जिरायती रबीचे पीक काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी पूर्णत: नष्ट झाले. अवकाळी पावसाने ५० टक्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ व रबी पिकांचे बाधित क्षेत्र ५,८९२.८१ हेक्टर असून नुकसान भरपाईसाठी दोन कोटी ६९ लाख ३० हजार ५९५ अपेक्षित निधी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.सदर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील जवस, लाखोळी, हरभरा, गहू व भाजीपाला या जिरायती रबी पिकाचे क्षेत्र बाधित झाले. गोंदिया तालुक्यात या पिकांचे एक हजार ९९३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १२ हजार १०० आहे. चार हजार ५०० रूपये प्रति हेक्टरप्रमाणे गोंदिया तालुक्याला ८९ लाख ६८ हजार ५०० रूपयांच्या अपेक्षित निधीची गरज आहे. गोरेगाव तालुक्यातील ६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी २५१ आहेत. त्यासाठी साडेचार हजार रूपये प्रति हेक्टरप्रमाणे दोन लाख ७० हजार रूपयांची आवश्यकता आहे. तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी होवून जवस, लाखोळी, हरभरा, गहू व भाजीपाला पिकांचे सर्वाधिक तीन हजार ७८४.७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात सहा हजार १९६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश असून नुकसान भरपाईसाठी एक कोटी ७० लाख ३१ हजार ३७५ रूपयांची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आले आहे.गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीनच तालुक्यांत सदर रबी पिकांचे नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यानुसार एकूण बाधित क्षेत्र ५८३७.७५ हेक्टर व नुकसानग्रस्त १८ हजार ५४७ शेतकरी संख्या दाखविण्यात आले असून नुकसान भरपाईसाठी २ कोटी ६२ लाख ६९ हजार ८७५ एवढ्या अपेक्षित निधीची आवश्यकता आहे. याशिवाय अवकाळी पावसाचा फटका फळपिकांनाही बसला आहे. आंबा सर्वाधिक बाधित झालेला पीक आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक फळपिकाखालील बाधित झालेला गोंदिया तालुक्यातील क्षेत्र १८ हेक्टर आहे. यात नुकसानग्रस्त शेतकरी २० असून साडेचार हजार रूपये प्रति हेक्टरप्रमाणे दोन लाख १६ हजार रूपये अपेक्षित निधी ठरविण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील १९.८० हेक्टर फळपिकांचे क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्तांमध्ये ३७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यासाठी दोन लाख ३७ हजार ६०० रूपयांची गरज आहे. सालेकसा तालुक्यात १७.२६ हेक्टरे क्षेत्र बाधित असून नुकसानग्रस्तांमध्ये २४ शेतकऱ्यांचा समावेश आहे व नुकसान भरपाईसाठी दोन लाख सात हजार १२० रूपयांची गरज भासणार आहे. गोंदिया, आमगाव व सालेकसा या तीनच तालुक्यांत फळपिकांचे नुकसान दाखविण्यात आले असून एकूण बाधित क्षेत्र ५५.०६ हेक्टरे, बाधित शेतकरी संख्या ८१ व नुकसान भरपाईसाठी सहा लाख ६० हजार ७२० रूपयांचा अपेक्षित निधी नमूद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)नुकसानग्रस्त तीनच तालुक्यांचा समावेश२८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्हाच न्हावून निघाला होता. मात्र कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणात जवस, लाखोळी, हरभरा, गहू व भाजीपाला या रबी पिकाचे बाधित क्षेत्र केवळ गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीनच तालुक्यात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित अर्जुनी-मोरगाव, देवरी, आमगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी या पाच तालुक्यातील रबी पिकांना नुकसान झाले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच गोंदिया, आमगाव व सालेकसा या तीनच तालुक्यांत फळ पिकांचे नुकसान दाखविण्यात येत आहे. तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, देवरी व अर्जुनी-मोरगाव या पाच तालुक्यांत फळपिकांचे कसलेही नुकसान दाखविण्यात आले नाही. तिरोडा तालुक्यात तर अतिवृष्टी झाल्याने आंब्याचे मोहोर पूर्णत: गळाले होते. मात्र तिरोडा तालुक्यात फळपिकांचे नुकसान शून्य दाखविण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.