शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार १०० ‘ग्राम वन’

By admin | Updated: February 29, 2016 01:13 IST

जंगलांचे संरक्षण व संवर्धन करून वणव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने ग्राम वन योजना लागू केली.

‘पेसा’त एकही गाव नाही : कुंभारटोली व धाबेटेकडी झाले ग्राम वननरेश रहिले  गोंदियाजंगलांचे संरक्षण व संवर्धन करून वणव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने ग्राम वन योजना लागू केली. यात गावातील वनसंपत्तीतून मिळणारे उत्पन्न त्याच गावाला दिले जाणार आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील १०० गावांनी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी २०१६) ठराव घेऊन आपल्या गावाला ग्राम वन करण्याचा निर्धार केला आहे.ग्रामवन नियम लागू करण्याचा ठराव ग्रामसभेत घेऊन तो उपवनसंरक्षक यांच्याकडे देण्यात येतो. त्यानुसार संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वनक्षेत्रात अतिक्रमणावर प्रतिबंध लावण्याकरिता काय उपाययोजना केल्या त्याची पाहणी वनाधिकाऱ्यांकडून केली जाते. त्या गावात वणव्याचे प्रमाण किती, वणवा नियंत्रणासाठी समितीने सहभाग दिला आहे का, त्या क्षेत्रात वणव्याचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा कमी ठेवण्यात यश आले का, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी परिणामकारक राबविली आहे का? त्या गावाला संत तुकाराम वनग्राम योजनेकरीता जिल्हास्तरीय अथवा राज्यस्तरीय बक्षीस मिळाले का? आदी मुद्द्यांची तपासणी करून गावांना ग्रामवन योजनेत समाविष्ठ केले जाते.ग्रामवनासाठी निवड झालेल्या गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला अर्थसंकल्पित अनुदानातून १ हजार रूपये प्रतिहेक्टर प्रतिवर्ष याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. वनांना हाणी पोचविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे किंवा त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्याचा अधिकारही त्या समितीला राहणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी ही दोन गावे ग्रामवन म्हणून उदयास आली आहेत. एकेकाळी माळरान असलेल्या कुंभारटोली परिसराला नैसर्गिक सौंदर्याने नटविण्याचे काम तेथील वनाधिकारी एल.एस. भुते यांनी केले आहे. ही दोन गावे सप्टेंबर २०१४ मध्ये ग्रामवन झाली आहेत.पाच गावांच्या प्रस्तावात त्रुटीसन १९९२ पासून लोसहभागातून वनव्यवस्थापन करण्यात येते. संयुक्त वन व्यवस्थापनाचा पुढचा टप्पा म्हणून ग्राम वन ही संकल्पना पुढे आली. ग्रामवनसाठी ११ जून २०१४ रोजी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तिडका, नवेगाव येथील डोंगरगाव, गोंदिया तालुक्यातील फत्तेपूर, २१ जून २०१४ रोजी किडंगीपार, २५ जुलै २०१४ रोजी सालेकसा तालुक्यातील हलबीटोला या गावांचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांकडे पाठविण्यात आला होता. परंतु या प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे ही गावे ग्रामवन होऊ शकली नाहीत. ुकुंभारटोलीला मिळणार ६ ते ७ लाखग्राम वन असलेल्या कुंभाटोलीने वनाधिकारी एल.एस. भुते यांच्यापासून प्रेरणा घेऊन राबविलेल्या उपक्रमामुळे हे गाव ग्रामवन म्हणून पुढे आले. या गावातील तोडलेल्या बांबूपासून त्या गावाला ६ ते ७ लाख रूपये मिळणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक रामगावकर यांनी दिली.पेसा हा कायदा गोंदिया जिल्ह्यात एकाही गावाला लागू होत नाही. कोणते गाव या कायद्यात येईल हे केंद्र सरकार ठरवित असते. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील एकही गाव पेसा कायद्यात येत नसल्याने संपूर्ण जिल्हा ग्रामवन करण्यात काहीही अडचण नाही. नागरिकांनी वनांच्या संरक्षणासाठी पुढे यावे.- जितेंद्र रामगावकरउपवनसंरक्षक, वनविभाग गोंदिया