शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

जिल्हावासीय गंभीर अन् प्रशासन बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

बाहेरुन आलेल्या आणि कोरोना संसर्गाची अनुषंगाने लक्षणे दिसणाऱ्यांना क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. मात्र क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. बुधवारी तिरोडा तालुक्यातील बापलेकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील अनागोंदी कारभार पुढे आला.या क्वारंटाईन सेंटरमध्ये येथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांची साधी विचारपूस सुध्दा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली जात नाही.

ठळक मुद्देकोरोनाचा वाढतोय विळाखा : उपाययोजनाचा बोजवारा, क्वारंटाईन सेंटर झाले समस्या केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील बारा दिवसांच्या कालावधीत ४०० कोरोना बाधितांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिक गंभीर आहेत. मात्र कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दररोज आरोग्य विभाग व प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुढे येत आहे. त्यामुळे जिल्हावासीय कोरोनाने गंभीर मात्र प्रशासन पूर्णपणे बिनधास्त असल्याची ओरड होवू लागली आहे.बाहेरुन आलेल्या आणि कोरोना संसर्गाची अनुषंगाने लक्षणे दिसणाऱ्यांना क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. मात्र क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. बुधवारी तिरोडा तालुक्यातील बापलेकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील अनागोंदी कारभार पुढे आला.या क्वारंटाईन सेंटरमध्ये येथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांची साधी विचारपूस सुध्दा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली जात नाही. तर साधी सर्दी, खोकल्याची आणि डोकेदुखीची गोळी सुध्दा मिळत नसल्याची ओरड येथे दाखल असलेल्या नागरिकांची आहे. गरम पाणी नाही, नास्ता नाही, लहान मुलांना बिस्किटे नाही, दूध नाही व चहा नाही जेवण सुध्दा बरोबर मिळत नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच याच सेंटरमधील नागरिकांनी याची तक्रार थेट जिल्हाधिकाºयांकडे केली होती. मात्र यात अद्यापही कुठलीही सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे हे सेंटर केवळ नावापुरतेच ठरत असल्याचा आरोप येथे दाखल रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली. ही अवस्था केवळ सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरची नव्हे तर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्वच केंद्राची आहे.क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमधील असुविधांमुळे तिथे राहण्यास कुणीही नाही. त्यामुळे बरेच जण बाहेरुन आल्यानंतर याची माहिती प्रशासनाला न देता थेट घरी जात आहे. यामुळे मागील बारा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. तर जिल्हा प्रशासन केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या नावावर बैठका घेण्यात व्यस्त आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन मात्र अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र आहे. यासर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाप्रती जिल्हावासीयांमध्ये रोष वाढत आहे.शहरात वाढतोय प्रादुर्भावमागील आठ दिवसांपासून गोंदिया आणि तिरोडा शहरात सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र अद्यापही स्थानिक नगर परिषद, आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने हात पूर्णपणे हातवर केले असून नागरिकांना तुम्हीच काळजी तुम्हीच घ्या असा अप्रत्यक्षपणे सल्ला दिला जात आहे.जिल्हाधिकारी घेणार का दखलकोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालय जिल्ह्यातील इतरही आरोग्य केंद्रामध्ये योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. तर क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटर संदर्भातील तक्रारीत दररोज वाढ होत असाहे. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोग्य विभाग आणि प्रमुख विभागाचे अधिकारी फोन उचलत नाही. त्यांना फोन उचलण्याची जणू अ‍ॅलर्जी झाली आहे. तर अर्धे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्यस्त असल्याचे सांगतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. या सर्व गोष्टींची दखल जिल्हाधिकारी घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या