शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६९७ मजुरांनाच काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

डॉ. विजय सूर्यवंशी किंवा अभिमन्यू काळे या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरगरीब मजुरांच्या हाताला काम देत गोंदियाचे नाव देशात लौकीक केले होते. परंतु त्याच जिल्ह्यातील लाखो मजुरांना आजघडीला बेरोजगार राहण्याची पाळी मागील दोन वर्षात आली आहे. वर्तमान जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी रोहयोच्या कामाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देरोहयोच्या कामात गोंदिया नापास : लाखो मजूर आहेत बेरोजगार

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत दोन-दोन लाख मजुरांच्या हाताला काम देणारा गोंदिया जिल्हा देशात एकेकाळी अग्रस्थानी होता. परंतु आता या गोंदिया जिल्हा राहेयोचे काम देण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाखाच्या घरात आहे. परंतु या १४ लाखापैकी फक्त ६९७ मजुरांच्याच हाताला आजघडीला काम आहे.बेरोजगारीवर मात करण्यासाठी व प्रत्येक कुटुंबाचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी रोड, रस्ते, नाल्या, पूल, तलाव खोलीकरण, भातखाचर, विहीर, शेततळी, कालवा दुरूस्ती, नाला सरळीकरण, पाटदुरूस्ती, शोषखड्डे, वृक्षलागवड, कंपोस्ट खत, नापेड खत, शेळ्या गाईचा गोठा, जमीन सपाटीकरण, घरकुल व शौचालय ही कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जातात.गोंदिया जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व डॉ.विजय सृूर्यवंशी यांंनी गोंदिया जिल्ह्याचा विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून गोंदिया जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक लोकांना या रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करवून दिला होता. परिणामी रोहयोची उत्तम अंमलबजावणी करणारा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याचे नाव देशात लौकीक झाले होते. परंतु कारभार बदलला आणि रोजगार हिरावल्या गेला. देशातील मोठ्या शहरात असलेल्या नामवंत कंपन्या व लघुउद्योग जसे नोटबंदीमुळे बंद झाले आणि रोजगार हिरावल्या गेला तसाच रोजगार गोंदिया जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे बदलल्यानंतर रोहयोच्या कामावर असलेल्या मजुरांना आता काम मिळेनासे झाले आहे.डॉ. विजय सूर्यवंशी किंवा अभिमन्यू काळे या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरगरीब मजुरांच्या हाताला काम देत गोंदियाचे नाव देशात लौकीक केले होते. परंतु त्याच जिल्ह्यातील लाखो मजुरांना आजघडीला बेरोजगार राहण्याची पाळी मागील दोन वर्षात आली आहे. वर्तमान जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी रोहयोच्या कामाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लाखो मजुरांच्या ऐवजी आता फक्त ६९७ मजूर काम करीत आहेत. आणि ते मजूर फक्त मोजक्या घरकुल व वृक्ष लागवडीच्या कामावर आहेत.गोंदिया जिल्ह्यातील ५४७ ग्राम पंचायतींना रोहयोची ५० टक्के काम करायची असतात परंतु ग्रामपंचायत स्तरावर मजुरांची मागणी असतांना काम नसल्याचे सांगून मजुरांना काम दिले जात नाही.वृक्षलागवड व घरकुलाची १७४ कामे सुरूवृक्षलागवडची ४७ कामे, गोठ्याची ८ कामे व घरकुलाची ११८ कामे जिल्ह्यात सुरू आहेत.वृक्षलागवडीची तिरोड्यातील सात कामांवर ४० मजूर, आमगाव तालुक्यात ४ कामांवर १२ मजूर, गोरेगाव तालुक्यात ३३ कामांवर १०७ मजूर व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३ कामांवर १२ मजूर अश्या ४७ कामांवर १७१ मजूर कार्यरत होते. गोठ्यांची कामे तिरोडा तालुक्यातील ५ कामांवर ३२ मजूर, देवरीच्या एका कामावर ४ मजूर, अर्जुनी-मोरगावातील ४ कामांवर २८ मजूर अश्या ८ कामांवर ६३ मजूर, घरकूलात तिरोडा तालुक्यातील २९ कामांपैकी ८४ मजूर, आमगावातील २६ कामांवर ७७ मजूर, देवरी तालुक्यातील ५९ कामांवर २२५ मजूर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ कामांवर २८ मजूर असे एकूण ११८ कामांवर ४१४ मजूर कार्यरत आहेत.तीन तालुक्यात एकही मजुराला काम नाहीगोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत. त्यापैकी एकही तालुक्यात समाधानकारक एकही काम सुरू नाहीत. परंतु गोंदिया, सालेकसा व सडक-अर्जुनी या तीन तालुक्यात एकही मजुराच्या हाताला काम नाही. कामाअभावी मजुरांचे स्थलातंर होत आहे. कामाच्या शोधात मजूरांचा लोंढा शहराकडे जात आहे. परंतु लोकांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्हा प्रशासन अपयशी ठरला आहे.किती मजुरांना मिळाला कामगारांचा दर्जा?रोहयोच्या कामावर सतत ९० दिवस काम करणाऱ्या मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचे तरतूद सरकारने केली आहे. परंतु डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आपल्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्यातील किती मजुरांना सतत ९० दिवस काम दिले याची आकडेवारी पाहिली तर ती नक्कीच रोहयोच्या संदर्भात उदासिन आहे. रोहयोच्या कामावर सतत ९० दिवस काम करणाºया मजुरांना कामगारांचा दर्जा दिला जातो.त्याचे लाभही देण्यात येतात. परंतु कामच न दिल्यामुळे कामगार कायद्याच्या लाभापासून मजूर वंचित आहेत.

टॅग्स :Labourकामगार