शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जिल्ह्याचा पारा @ ४२.२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

गोंदिया : नवतपा लागताच आतापर्यंत ४० डिग्रीच्या आत असलेला पारा आता चांगलाच वर चढू लागला आहे. बुधवारपासून बघितले असता, ...

गोंदिया : नवतपा लागताच आतापर्यंत ४० डिग्रीच्या आत असलेला पारा आता चांगलाच वर चढू लागला आहे. बुधवारपासून बघितले असता, जिल्ह्यातील पारा ४२ डिग्रीच्या घरात पोहोचला आहे. येत्या २ जूनपर्यंत नवतपा असल्याने आणखी दोन दिवस जिल्हावासीयांना हा उकाडा सहन करावा लागणार असल्याचे दिसते.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसाने हजेरी लावल्याने मे-हिटचा त्रास जाणवला नव्हता. तोपर्यंत पाराही ३८-३९ डिग्रीपर्यंतच पोहोचला होता. मात्र मंगळवारपासून (दि.२५) नवतपा लागला व बघता-बघता पारा ४० डिग्रीच्या पार गेला असून, आता दररोज ४२ डिग्रीवर जाऊन थांबला आहे. आठवडाभरापासूनच ही स्थिती असून, यामुळे नवतपा आता आपल्या रंगात आल्याचे दिसत आहे. उन्हाळ्यातील सर्वाधिक उकाड्याचे हे ९ दिवस असल्याचे बोलले जात असून, त्याची प्रचिती आता दिसून येत आहे. सोमवारीही जिल्ह्यातील तापमान बघितले असता, ४२.२ डिग्रीएवढे नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने यंदा नवतपातही ढगा‌ळ वातावरण व पाऊस सांगत तापमान सामान्य राहणार, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तसे काही झाले नसून, उलट नवतपा लागताच पारा वेगाने चढला व आता थेट ४२ डिग्रीवर जाऊनच थांबल्याचे दिसत आहे. मात्र अचानकच झालेल्या या तापमान वाढीमुळे जिल्हावासीयांचा जीव कासावीस झाला आहे. अशात कधी पाऊस पडतो व या उकाड्यापासून एकदाची सुटका मिळते, अशीच सर्वांची इच्छा आहे.

------------------------------

एसी व कुलरही झाले फेल

आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान ३८-३९ डिग्रीपर्यंतच गेले होते. त्यातही ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत नव्हता. मात्र आता अचानक तापमान ४२.२ पर्यंत गेल्याने जिल्हावासीयांना हा उकाडा असह्य होत आहे. विशेष म्हणजे, आता एसी व कुलरही फेल ठरत असल्याचे नागरिक बोलत आहेत. यावर आता एकच उपाय असून, पावसाने हजेरी लावली तरच यापासून सुटका होणार आहे.