शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जिल्ह्याने पार केला २.५० लाख लसीकरणाचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमाने राबविली जात असून याचे फलित असे की, जिल्ह्याने लसीकरणाचा अडीच ...

गोंदिया : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमाने राबविली जात असून याचे फलित असे की, जिल्ह्याने लसीकरणाचा अडीच लाखांचा टप्पा पार केला असून सोमवारपर्यंत (दि.३१) जिल्ह्यात २५१३४१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये युवा व वृद्धांचा समावेश असलेल्या ४५-६० वयोगटातील नागरिकच टॉपवर असून त्यांची संख्या १०७४५९ एवढी आहे.

मागील वर्षी देशात कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हा त्याने चांगलाच कहर केला होता. तेव्हा कोरोनावर मात करण्यासाठी कोणतेही औषध हाती आले नव्हते. मात्र, सन २०२१ मध्ये दोन लसी तयार करण्यात आल्या व त्यांच्या लसीकरणाला १६ जानेवारीपासून अवघ्या देशातच सुरुवात झाली आहे. त्यात एप्रिल महिना जिल्ह्यासाठी काळ ठरला असून दुसऱ्या लाटेने शेकडोंच्या संख्येत नागरिकांचा जीव घेतला. अशात तज्ज्ञांनी कोरोनाला पुढे मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच उपाय असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, अवघ्या देशातच लसीकरणासाठी चळवळच उभारण्यात आली असून जिल्ह्यातही जास्तीत जास्त लसीकरणासाठी धडपड सुरू आहे. यासाठी शहरी भागापासून ते ग्रामीण भागातही नागरिकांच्या सोयीसाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. जेणेकरून लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे व अशात त्यांना कसलाही त्रास होऊ नये याची दखल घेतली जात आहे. विशेष म्हणजे, त्याचे फलितही आता दिसू लागले असून सोमवारपर्यंत (दि.३१) जिल्ह्यात २५१३४१ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे, लसीकरणाच्या या मोहिमेत ४५-६० वर्षे वयोगटातील युवा व वृद्धांचेच जास्त प्रमाण दिसून येत असून सुरूवातीपासूनच ते टॉपवर आहेत. यामध्ये ८६२७५ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून २११८४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यानंतर ६० वर्षे वयोगटातील नागरिकांचा गट असून यातील ८२५०४ नागरिकांनी लसीचा डोस घेतला आहे.

----------------------------------

लसीला घेऊन नागरिकांत भ्रम

कोरोनाला मात देण्यात लस यशस्वी ठरली असून लस सर्वांसाठीच सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, लसीला घेऊन आजही कित्येकांत भ्रम व भीती दिसून येत आहे. हा प्रकार ग्रामीण भागात दिसून येत असतानाच शहरातील नागरिकांचाही यात समावेश आहे. हेच कारण आहे की, गावागावांत व शहरातील प्रत्येकच भागात लसीकरणासाठी केंद्र असूनही नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. यामुळेच लसीकरणाची टक्केवारी आहे त्या प्रमाणात कमीच आहे. नागरिकांनी भ्रम काढून लस घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

-----------------------------

१८-४४ वयोगटाचे लसीकरण करा

शासनाने जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला आहे. मात्र, असे असतानाच १८-४४ हा महत्त्वपूर्ण वयोगट लसीकरणापासून दूर ठेवला आहे. तरुण व युवा वर्गाचा समावेश असलेला हा गट घरकाम तसेच नोकरी व व्यवसायानिमित्त घराबाहेर असतो व नागरिकांच्या संपर्कात राहतो. अशात त्यांना सुरक्षित करण्याच्या दृष्टीने त्यांचे लसीकरण करण्याची गरज आहे. विशेष म्हणजेच,पालकांनाही याची चिंता सतावत आहे. म्हणूच आता सर्वांचे लसीकरण करावयाचे असतानाच १८-४४ गटाचे लसीकरण पुन्हा सुरू करा अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.