शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

न्यू इंडिया कंपनीला विमा नाकारणे भोवले

By admin | Updated: August 29, 2015 01:49 IST

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा अपघात नसून आत्महत्या आहे, असे सांगत विमा दावा नाकारणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार..

ग्राहक मंचचा निर्णय : एक लाखाची भरपाई देण्याचा आदेशगोंदिया : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा अपघात नसून आत्महत्या आहे, असे सांगत विमा दावा नाकारणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. ३० दिवसांच्या आत एक लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.टोलाराम संतुलाल लांजेवार रा.नवेगाव-धापेवाडा (ता. गोंदिया) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांचे वडील संतुलाल महादू लांजेवार यांच्या मालकीची नवेगाव येथे शेतजमीन आहे. पायी रस्ता ओलांडत असताना २ आॅगस्ट २०१२ रोजी त्यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. त्यामुळे टोलाराम यांनी न्यू इंडिया विमा कंपनीकडे संपूर्ण कागदपत्रांसह शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा अर्ज केला. तसेच वेळोवेळी मागितलेल्या दस्तवेजांची पूर्तता केली. परंतु विमा कंपनीने सदर दाव्याबाबत मंजूर-नामंजूर कळविले नव्हते. त्यामुळे त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली.मंचामार्फत सदर विमा कंपनीला नोटीस बजावण्यात आली. कंपनीने लेखी जबाबात शेतकऱ्याचा मृत्यू अपघाती नसून आत्महत्या आहे. त्यांनी तलाठी प्रमाणपत्र, ६-ड फेरफार, एफआयआर, अपघाताचे स्पष्टीकरण आदी दस्तावेज सादर न केल्यामुळे २८ मार्च २०१४ रोजी विमा दावा फेटाळल्याचे नमूद केले. मात्र तक्रारकर्ते टोलाराम लांजेवार यांनी सर्वच कागदपत्रे सादर केले होते. त्यांचे वकील अ‍ॅड. उदय क्षीरसागर यांनी आपल्या युक्तिवादात, कंपनीने दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याचे कळविले नाही. तसेच विमा कंपनीने कसलेही कागदपत्रे मागितले नाही. त्याबाबतचा पुरावा मंचासमोर सादर केला नाही, ही सेवेतील त्रुटी असल्याचे सांगत प्रकरण मंजूर करण्यात यावे, असे म्हटले. तर विमा कंपनीच्या वकील बघेले यांनी तक्रारकर्त्याने दावा उशीरा दाखल केल्याने, ६-ड फेरफार व एफआयआर दिला नाही म्हणून कंपनीने दावा नाकारल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याची त्यावेळची मानसिक स्थिती व कागदपत्रांची जुळवाजुळव तसेच घरातील एकमेव सज्ञान व्यक्ती या बाबींचा विचार करता विमा दावा दाखल करण्यासाठी विलंब लागणे, हे संयुक्तिक कारण ठरले. त्यामुळे राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ९० दिवसांनंतरही विमा दावा दाखल केला जावू शकतो व तो मंजूर होण्यास पात्र आहे, असे मत ग्राहक मंचाचे मांडले.ग्राहक तक्रार न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी तक्रारकर्ते लांजेवार यांची तक्रार मान्य करीत न्यू इंडिया विमा कंपनीला वडिलांच्या अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने, शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले.