शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जि.प.च्या ६० शाळांत डिजिटल ‘अंधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:48 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी या उद्देशातून यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

९३६ शाळा झाल्या डिजिटल ११२ शाळा डिजिटलच्या मार्गावर १९३ शाळांत विद्युतच नाहीनरेश रहिले गोंदियाप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी या उद्देशातून यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या शाळा शासनाच्या अनुदानातून नाही तर लोकसहभागातून डिजिटल करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १०४८ शाळांपैकी ९३६ शाळा डिजिटल झाल्या आहेत. परंतु जि.प.च्या फक्त ८७६ शाळांमध्येच विद्युत पुरवठा असताना उर्वरीत ६० शाळांमध्ये विद्युत नसताना त्या डिजिटल झाल्या कशा हा प्रश्न उपस्थित होत आहे. जि.प. शाळांच्या उत्थानासाठी सामाजिक ऐक्याची वातावरण निर्मीती झाली. त्यातून नागरिकांकडून मिळालेल्या वर्गणीतून व अदानी समूहाकडून ३० अश्या गोंदिया जिल्ह्यातील जि.प.च्या ९३६ शाळा डिजीटल झाल्या आहेत. विज्ञान युगात विद्यार्थ्यांना पाठिवरचे ओझे कमी हवे तसेच त्यांना एका क्लीकवर सर्व अभ्यासक्रमाची माहिती मिळावी यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न सरकारने पाहिले. यासाठी ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजीटल शाळा, एबीएल (कृतीयुक्त अध्यापन), आयएसओ शाळा बनविणे, सीएसआर (कार्पोरेट सोशल रिसपॉन्सीब्लीटी), पीएसआर ( पब्लिीक सोशल रिसपॉन्सीब्लीटी) असे विविध उपक्रमातून जि.प.च्या शाळा व त्यातील विद्यार्थ्यांना हायटेक बनविण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. त्यामुळे या उपक्रमाला सुरूवात जिल्ह्यात करण्यात आली. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात ९३६ डिजीटल शाळा तयार करण्यात आल्या. शंभर टक्के जि.प.च्या शाळा डिजीटल व्हायला फक्त ११२ शाळा बाकी आहेत. विद्युत अभावी मागील ७-८ वर्षापासून जि.प. शाळाना दिलेले संगणक संच धुळखात पडले आहेत. आमगाव तालुक्यात १९ शाळांमध्ये ३९ संगणक संच, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १८ शाळांमध्ये ४४ संच, देवरी तालुक्यातील १७ शाळांमध्ये ४६ संच, गोंदिया तालुक्यातील २७ शाळांमध्ये १०० संच, गोरेगाव तालुक्यातील २६ शाळांमध्ये ४७ संच, सालेकसा तालुक्यातील १७ शाळांमध्ये ४६ संच, सडक अर्जुनी तालुक्यातील २० शाळांमध्ये ३६ संच, तिरोडा तालुक्यातील २१ शाळांमध्ये ६४ संच बंद आहेत. जिल्ह्यातील एकूण उच्च माध्यमिक असलेल्या १६५ शाळांमध्ये ४२२ संच देण्यात आले. मात्र यातील बहुतांश शाळांतील संगणक संच बंद आहेत. अनेक शाळा डिजीटल झाल्या त्या शाळांमध्ये विद्युत पुरवठा नाही. काही ठिकाणी विद्युत पुरवठा असला तरी त्या ठिकाणचा पुरवठा खंडीत आहे. २१ शाळांमध्ये विद्युत कनेक्शनच नाही. १७२ शाळांमध्ये कनेक्शन असून पुरवठा खंडीत आहे. फक्त ८७६ शाळांमध्ये विद्युत पुरवठा असताना शाळा ९३६ शाळा डिजीटल असल्याचे शिक्षण विभाग दाखवत आहे. म्हणजेच विद्युत पुरवठा नसल्याने अंधार असलेल्या शाळाही डिजीटल झाल्या आहेत. राज्यात क्रमांक एकमध्ये येण्यासाठी तर ही स्पर्धा तर नाही ना अशी चर्चा आहे. ११२ शाळांची तयारी जोमातजिल्हा परिषदेच्या १०४८ पैकी ९३६ शाळा डिजीटल झाल्या आहेत. परंतु ११२ शाळा आजही डिजीटल झाल्या नाहीत. त्या शाळा डिजीटल करण्यासाठी शर्यतीचे शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. विद्युत बिलामुळे पंचाईतशाळा विकासासाठी शासन सादिलवार राशी देते. परंतु ही राशी अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे वर्षभरात शाळा चालविण्यासाठी लागणारा खर्च मुख्याध्यापकांना नाईलाजास्तव आपल्या खिशातून द्यावा लागतो. शासन देत असलेली सादिलवार राशी एका महिन्याच्या खर्चापूर्ती आर्हे. ५-७ वर्षापासून शाळांना सादिलवार राशी मिळाली नसल्याची ओरड आहे. एका शाळेला महिन्याभराचा विद्युत बिलाचा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. विद्युत विभाग ही या शाळांना विद्युत बिल व्यावसायीक बिल म्हणून अधिकचे देतो. गृह वापरासाठी जे विद्युत बिलाचे दर आहेत. ते दर शाळांना दिल्यास विद्युत बिलाचा भरना सहजरित्या होऊ शकेल. परंतु व्यावसायीक दराने विद्युत बिल देण्यात येत असल्यामुळे अनेक शाळांतील विद्युत बिल भरल्या जात नाही. परिणामी त्या शाळांतील विद्युत पुरवठा खंडीत केला जातो.