शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

धानाचा बोनस त्वरित जमा करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

गोंदिया : खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाला ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्याचे शासनाने घोषित केले होते. मात्र, आता ८ ...

गोंदिया : खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाला ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्याचे शासनाने घोषित केले होते. मात्र, आता ८ महिने होत असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा झालेली नाही. धानाचा बोनस त्वरित जमा करा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शासनाच्या माध्यमातून सन २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या धानाला ७०० रुपये बोनस घोषित करण्यात आला होता. मात्र, तो अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. रबी धानाची ६५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली असून, सुमारे २८.५० लक्ष क्विंटल धान उत्पादन अपेक्षित असून आतापर्यंत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात बेभाव धान विकावे लागत आहे. धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत ११०० धडक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या असून, शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज घेऊन काम पूर्ण केले. मात्र, त्यांना पैसे देण्यात आले नाही. जिल्ह्यात २०२० पर्यंत ६९ धान खरेदी केंद्र होते. नव्याने ४२ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, ज्या केंद्रांना मंजुरी दिली, त्यांना खरेदीचे आदेश देण्यात आले नाही किंवा ज्यांच्याकडे गोदाम उपलब्ध नाही, अशा केंद्रांना मंजुरी का देण्यात आली, असा प्रश्न करत भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

तसेच २५ मेपर्यंत सर्व धान खरेदी केंद्रे सुरू न झाल्यास गुरुवारी (दि.२७) धरणे आंदोलन करणार, असा इशारा दिला होता. त्यानुसार, भाजपच्या वतीने गुरुवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष केशव मानकर, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, आमदार विजय रहांगडाले, आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, भेरसिंग नागपुरे, रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, दीपक कदम, सुनील केलनका, संजय मुरकुटे, बंटी पंचबुद्धे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------------

या आहेत आंदोलनातील मागण्या

रबी हंगामातील धान पिकाची खरेदी केंद्रांवर प्रत्यक्षात खरेदी करा, खरीप हंगामातील ७०० रुपये बोनस द्या, धडक सिंचन विहिरी योजनेचे पैसे द्या, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी द्या, तसेच शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी द्या या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.