शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

जिल्ह्यात कोविशिल्ड लसीलाच डिमांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST

गोंदिया : कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाचा आता जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिसत आहे. यासाठी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात केंद्र वाढवून लसीकरण ...

गोंदिया : कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाचा आता जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिसत आहे. यासाठी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात केंद्र वाढवून लसीकरण केले जात आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोनच लसी दिल्या जात आहेत. यातही कोविशिल्ड लसीलाच नागरिकांची डिमांड दिसत असून, आतापर्यंत १,४३,१५१ नागरिकांनी कोविशिल्ड लसीचेच डोस घेतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २,१६,०२५ नागरिकांनी लस घेतली आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतातच तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे शस्त्र हाती आले आहे. मात्र, लसीकरणाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. आता पुढे कोरोना आपले पाय पसरू नये, यासाठी जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने शासन लसीकरणावर जोर देत असून, जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरण करणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार, आता जिल्ह्यातही लसीकरणासाठी व्यापक मोहीम छेडण्यात आली असून, लसीकरण केंद्रांची वाढ व जनजागृती केली जात आहे.

त्यानुसार, आता लसीकरणाला घेऊन नागरिकांच्या मनातील भीती व शंकाही कमी झाल्या असून, ते लसीकरणासाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे. मात्र, खास बाब अशी की, जिल्ह्यात कोविशिल्ड लसीलाच नागरिकांची जास्त पसंती दिसत आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची बुधवारपर्यंतची आकडेवारी बघितल्यास २,१६,०२५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १,४३,१५१ नागरिकांनी कोविशिल्ड हीच लस घेतली असल्याचे दिसत आहे, तर ७२,८७४ नागरिकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे.

--------------------------------------

१.६८ लाख नागरिकांनी घेतला पहिला डोस

जिल्ह्यात कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरणावर जोर दिला जात असतानाच, आता नागरिकांनाही लसीचे फायदे दिसून येत असल्याने तेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत. असे असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत १,६८,०२८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ४७,९९७ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लस अत्यंत सुरक्षित असल्याने नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी शासन प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

-------------------------------------

१८ - ४४ वर्गालाही लस द्या

मध्यंतरी १८ वर्षांपासून पुढे वर्गासाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच या वर्गाचे लसीकरण थांबविण्यात आले. विशेष म्हणजे, १८ ते ४४ या वर्गांतील तरुण व युवा कामानिमित्त घराबाहेर पडत असल्याने, त्यांनाही सुरक्षा कवचाची अधिक गरज आहे. करिता आता १८ ते ४४ वर्गांचे लसीकरण सुरू करावे, अशी मागणीही जोर धरत आहे.