शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

४९ हजार क्विंटल बियाणे, तर ९८ हजार मेट्रिक टन खतांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:30 IST

गोंदिया : ‘धान का कटोरा’ म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता खरिपाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. जिल्ह्यात खरीप ...

गोंदिया : ‘धान का कटोरा’ म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता खरिपाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १८६४३१ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यामुळे यंदा खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ४८९६० क्विंटल बियाणे, तर ९७७०४ मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे.

जिल्ह्यात धान हेच शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जात असल्याने जिल्ह्याला धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानशेती करतो. यंदा जिल्ह्यात १८६४३१ एवढे खरिपाचे क्षेत्र असून यात धानाची लागवड केली जाते. त्यादृष्टीने कृषी विभागाला बियाणे व खतांचे नियोजन करावे लागते. त्यानुसार, यंदा कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ४८९६० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे, तर शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतांसाठी ९७७०४ मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, मागणी करण्यात आलेल्या ४८९६० क्विंटल बियाणांतील २३३६७ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. म्हणजेच, मागणीच्या तुलनेत अर्धाच पुरवठा करण्यात आल्याचे दिसते. त्याचप्रकारे ९७७०४ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. मात्र यात फक्त ८१३२ मेट्रिक टन खतांचाच पुरवठा करण्यात आला आहे. तरी मागील १५८५७ मेट्रिक टन साठा शिल्लक असल्याने सध्या २३९८९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.

---------------------------------------

शेतकऱ्यांची सुरू झाली धावपळ

येत्या ७ जूनपासून मान्सून लागणार असून कधीही पाऊस आपली हजेरी लावणार, अशी चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. अशात शेतकरी खरिपाच्या हंगामासाठी सज्ज झाला असून खत व बियाणांची जुळवाजुळ‌व करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने कृषी विभागाकडूनही तयारी केली आहे.