शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

शेतीसाठी विद्युत पुरवठा करण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST

बाेंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी (चान्ना) येथील शेतकऱ्यांनी शेतामधील मोटारपंपाला वीजजोडणी व्हावी म्हणून वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्ज ...

बाेंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी (चान्ना) येथील शेतकऱ्यांनी शेतामधील मोटारपंपाला वीजजोडणी व्हावी म्हणून वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्ज केला. वीजजोडणीसाठी आवश्यक असलेले डिमांड सुद्धा शेतकऱ्यांनी भरले. मात्र तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटूनही महावितरणनेे विद्युतपुरवठा सुरू केला नाही. परिणामी शेतकऱ्यांना शेतीला सिंचन करण्या पासून वंचित राहावे लागत आहे. महावितरणने याची त्वरित दखल घेऊन वीजपुरवठा न केल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा एकनाथ शहारे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.

बाक्टी येथील आठ शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत शेतामध्ये विहिरी खोदल्या विहिरीत बोअरवेल खोदून पाण्याचा संचित साठा निर्माण झाला. गावातील जमीन कोरडवाहू आहे. मुबलक प्रमाणात जलसिंचनाच्या सोयी नसल्यामुळे बारमाही पिके घेता येत नाही. शेती हाच एकमेव व्यवसाय गावकऱ्यांचा आहे. अख्ख्या कुटुंबाचा प्रपंच शेतीवर अवलंबून आहे. कर्जबाजारी होऊन शेतामध्ये पाण्याची सोय करतो. पैशाची जुळवाजुळव करुन वीज जोडणीसाठी आवश्यक रकमेचा डिमांड वीज वितरण कंपनीमध्ये जमा करतो. कृषी जोडणीसाठी आवश्यक रकमेचा डिमांड वीज वितरण कंपनीमध्ये जमा करतो. कृषी जोडणीसाठी वीज कंपनीने तत्पर राहणे गरजेचे असताना संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहे. दोन वर्षांपासून डिमांड भरून सुद्धा शेतामध्ये वीज जोडणीसाठी कमालीची दिरंगाई केली जात असल्याचा आरोप बाक्टी येथील आठ शेतकऱ्यांनी केला आहे.

बॉक्स....

शेतकऱ्यांनी जगायचे कसे?

शेतीमधून बारमाही पिके घेण्यासाठी शेतात पाण्याची सोय केली. विद्युत विभागाच्या नाकर्तेपणामुळे आजतागायत वीज जोडणी झाली नाही. शेतामध्ये मुबलक पाण्याची सोय असताना सुद्धा मनाजोगे उत्पादन घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांचा वाली कोण आहे, पाणी असून, पिके घेता येत नाही. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था दूर होणार कशी, येत्या आठ दिवसांत वीज जोडणी झाली नाही तर आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा एकनाथ शहारे या शेतकऱ्यांनी दिला.

बॉक्स.....

निविदा निघाल्या नाही

नव्याने वीजजोडणीच्या कामाचे निविदा काढाव्या लागतात. या कामाचे टेंडर निघाले नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नव्याने वीजजोडणी कनेक्शन देण्यास विलंब होत आहे.

- अमित शहारे, उपविभागीय अभियंता, वीज वितरण कंपनी, अर्जुनी मोरगाव