शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

शेतीसाठी विद्युत पुरवठा करण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST

बाेंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी (चान्ना) येथील शेतकऱ्यांनी शेतामधील मोटारपंपाला वीजजोडणी व्हावी म्हणून वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्ज ...

बाेंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी (चान्ना) येथील शेतकऱ्यांनी शेतामधील मोटारपंपाला वीजजोडणी व्हावी म्हणून वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्ज केला. वीजजोडणीसाठी आवश्यक असलेले डिमांड सुद्धा शेतकऱ्यांनी भरले. मात्र तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटूनही महावितरणनेे विद्युतपुरवठा सुरू केला नाही. परिणामी शेतकऱ्यांना शेतीला सिंचन करण्या पासून वंचित राहावे लागत आहे. महावितरणने याची त्वरित दखल घेऊन वीजपुरवठा न केल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा एकनाथ शहारे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.

बाक्टी येथील आठ शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत शेतामध्ये विहिरी खोदल्या विहिरीत बोअरवेल खोदून पाण्याचा संचित साठा निर्माण झाला. गावातील जमीन कोरडवाहू आहे. मुबलक प्रमाणात जलसिंचनाच्या सोयी नसल्यामुळे बारमाही पिके घेता येत नाही. शेती हाच एकमेव व्यवसाय गावकऱ्यांचा आहे. अख्ख्या कुटुंबाचा प्रपंच शेतीवर अवलंबून आहे. कर्जबाजारी होऊन शेतामध्ये पाण्याची सोय करतो. पैशाची जुळवाजुळव करुन वीज जोडणीसाठी आवश्यक रकमेचा डिमांड वीज वितरण कंपनीमध्ये जमा करतो. कृषी जोडणीसाठी आवश्यक रकमेचा डिमांड वीज वितरण कंपनीमध्ये जमा करतो. कृषी जोडणीसाठी वीज कंपनीने तत्पर राहणे गरजेचे असताना संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहे. दोन वर्षांपासून डिमांड भरून सुद्धा शेतामध्ये वीज जोडणीसाठी कमालीची दिरंगाई केली जात असल्याचा आरोप बाक्टी येथील आठ शेतकऱ्यांनी केला आहे.

बॉक्स....

शेतकऱ्यांनी जगायचे कसे?

शेतीमधून बारमाही पिके घेण्यासाठी शेतात पाण्याची सोय केली. विद्युत विभागाच्या नाकर्तेपणामुळे आजतागायत वीज जोडणी झाली नाही. शेतामध्ये मुबलक पाण्याची सोय असताना सुद्धा मनाजोगे उत्पादन घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांचा वाली कोण आहे, पाणी असून, पिके घेता येत नाही. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था दूर होणार कशी, येत्या आठ दिवसांत वीज जोडणी झाली नाही तर आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा एकनाथ शहारे या शेतकऱ्यांनी दिला.

बॉक्स.....

निविदा निघाल्या नाही

नव्याने वीजजोडणीच्या कामाचे निविदा काढाव्या लागतात. या कामाचे टेंडर निघाले नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नव्याने वीजजोडणी कनेक्शन देण्यास विलंब होत आहे.

- अमित शहारे, उपविभागीय अभियंता, वीज वितरण कंपनी, अर्जुनी मोरगाव