शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

देहदान हेच श्रेष्ठदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 01:21 IST

जीवन कितीही सुंदर असले तरी, मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे माणसाने जिवंतपणी परोपकाराची भावना जोपासून मनुष्य धर्माचे पालन केले असले तरी,

राजकुमार बडोलेंसह ३५ कार्यकर्त्यांचा संकल्प गोंदिया : जीवन कितीही सुंदर असले तरी, मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे माणसाने जिवंतपणी परोपकाराची भावना जोपासून मनुष्य धर्माचे पालन केले असले तरी, मरणोपरांत अनेकांना जीवन देण्यासाठी देह खर्ची घालणे, ही अनुभूती वेगळीच आहे. आज अनेक रुग्णांना मानवी शरिराच्या अवयवांची आवश्यकता असते. परंतु कधी आर्थिक परिस्थिती तर कधी उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांचे वेळेवर उपचार होत नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने मरणोपरांत देहाचे दान केल्यास निश्चितच मानवी जन्म सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. देहदान हे श्रेष्ठदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ते त्यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित वैद्यकीय महाविद्यालय व पीपल्स रु लर इन्वायरमेंट यांच्या संयुक्तवतीने आयोजित अवयव व देहदान संकल्प शिबिरात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माजी विधान परिषद सदस्य केशवराव मानकर, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. च्या पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, भाजपा जिल्हा महामंत्री भाऊराव उके, नामदार बडोले यांच्या पत्नी शारदा बडोले, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जि.प.चे समाज कल्याण अधिकारी रामटेके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, न.प. सदस्य भरत क्षत्रिय, जयंत शुक्ला, राहुल जोशी, हिदायत शेख यांच्यासह मोठ्या संख्येत मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना बडोले यांनी, आजघडीला देशात रुग्णांना अनेकदा अवयवांची आवश्यकता असते. मात्र अजुनही या विषयावर जनजागृती न झाल्याने मरणोपरांत देहदानाची संकल्पनाही केवळ संकल्पनाच ठरत आहे. यामुळे अनेकदा मानवी अवयवांच्या तस्करींचे प्रकरणही पुढे आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने मरणोपरांत देहदान करण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. यावेळी विनोद अग्रवाल, डॉ. केविलया, केशवराव मानकर यांनी या विषयावर समायोचित विचार व्यक्त केले. विशेष म्हणजे स्वत: नामदार बडोलेंसह ३५ नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मरणोपरांत देहदान करण्याचा संकल्प घेतला आहे. संचालन धनजंय वैद्य यांनी केले. आभार बसंत गणवीर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महेश ठवरे, बागळे, अंजू वैद्य, निलिमा पुरी, पोर्णिमा गोंडाने, योगेश राऊत, संदीप डोंगरे, गौतम गणवीर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)