शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:34 IST

गोंदिया : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना ...

गोंदिया : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व भविष्यातील उपाययोजना करण्यात यावी. यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन सोमवारी (दि. ६) तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची पावसाअभावी रोवणी होऊ शकली नाही. तसेच पिकांना वेळोवेळी लागणारा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, यावर्षी धानाच्या उत्पादनावर मोठा परिणाम पडून शेतकरी आर्थिक संकटात सापडणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने आता जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे. तसेच शेतकऱ्यांना बोनसची उर्वरित रक्कम व रब्बी धानाचे चुकारे अविलंब देण्यात यावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान त्वरित देण्यात यावे, जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना बोअरवेल व विहिरीतून पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कृषिपंपासाठी २४ तास वीज देण्यात यावी व शेतकऱ्यांचे वीज जोडणी न कापता त्यांचे बिल माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, धनेंद्र अटरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, नरेंद्र तुरकर, मनोज मेंढे, देवचंद नागपुरे, अर्जुन नागपुरे, सत्यम बहेकार, बंडू मानकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.