शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तमिळनाडूच्या धर्तीवर निर्णय घ्यावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

गोंदिया : वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी नीटची परीक्षा न देताही बारावीचे गुण ग्राह्य धरून प्रवेश देण्याचा धक्कादायक निर्णय तमिळनाडू ...

गोंदिया : वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी नीटची परीक्षा न देताही बारावीचे गुण ग्राह्य धरून प्रवेश देण्याचा धक्कादायक निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला आहे. या निर्णामुळे महाराष्ट्रात नीट देणारे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी प्रतिक्रीया विद्यार्थी व पालकांमधून उमटत आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट ही परीक्षा घेतली जाते; परंतु तमिळनाडू सरकारने या प्रवेश परीक्षा विरोधात विधेयक सादर करून ही परीक्षा न देता वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता इतर राज्य याच कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतील. या परीक्षेसंदर्भात अनेकदा वादही झाले आहेत. दोनवेळा ही परीक्षा बंदही झाली होती तेव्हा राज्यांनी सीईटीच्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासात प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नीट परीक्षा सुरू करण्यात आली. नीटच्या माध्यमातून ३० टक्के तर सीईटीच्या माध्यमातून ७० टक्के वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा भरल्या जातात. या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

.....................................

काय आहे तमिळनाडू सरकारचा निर्णय?

एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पालक व विद्यार्थ्यांचा रोष पाहून तमिळनाडू सरकारने नीट परीक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक विधानसभेत मांडले. ते संमतही झाले. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीटची गरज नाही, असा त्या विधेयकाचा अर्थ आहे. सरकारी शाळेतील ७.५ टक्के विद्यार्थ्यांना प्राधान्य व बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

.....................

शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ

१) राज्यातही याच धर्तीवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सोय करण्याची गरज आहे. हुशार विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तमिळनाडू सरकारच्या निर्णयासारखा निर्णय महाराष्ट्र सरकारनेदेखील घ्यायला हवा.

- राजू पटले, आमगाव.

..........

तमिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय संभ्रमात टाकणारा आहे. देशातील सर्वच विद्यार्थ्यांची गुणवत्ता माेजण्यासाठी नीटची परीक्षा घेणे आवश्यक आहे. हुशार विद्यार्थ्याला स्पर्धेत टिकूनच यश मिळवायचे असते.

- संतोष चंद्रिकापुरे, किडंगीपार

..............

विद्यार्थी म्हणतात तयारीचाच खर्च मोठा

नीटच्या परीक्षेची भीती विद्यार्थ्यांमध्ये असते. आपण ही परीक्षा उत्तीर्ण करू का? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो. याच्या तयारीसाठी क्लासचा खर्च उचलणे सामान्यांना अवघड आहे.

-भाविनी पाऊलझगडे, विद्यार्थिनी.

.......

नीटचा अभ्यासक्रम अवघड आहे. या अभ्यासक्रमाची तयारी करताना क्लास करावाच लागतो. परंतु क्लासला लागणारा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य हतबल होतात. त्यात अभ्यासक्रम अवघड असल्याने अनेकांना नापास होण्याची भीती असते. १२ वीच्या गुणांवरही प्रवेश देण्याची सोय करावी.

- त्रिवेणी शेंडे, विद्यार्थिनी.