शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

तमिळनाडूच्या धर्तीवर निर्णय घ्यावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

गोंदिया : वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी नीटची परीक्षा न देताही बारावीचे गुण ग्राह्य धरून प्रवेश देण्याचा धक्कादायक निर्णय तमिळनाडू ...

गोंदिया : वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी नीटची परीक्षा न देताही बारावीचे गुण ग्राह्य धरून प्रवेश देण्याचा धक्कादायक निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला आहे. या निर्णामुळे महाराष्ट्रात नीट देणारे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी प्रतिक्रीया विद्यार्थी व पालकांमधून उमटत आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट ही परीक्षा घेतली जाते; परंतु तमिळनाडू सरकारने या प्रवेश परीक्षा विरोधात विधेयक सादर करून ही परीक्षा न देता वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता इतर राज्य याच कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतील. या परीक्षेसंदर्भात अनेकदा वादही झाले आहेत. दोनवेळा ही परीक्षा बंदही झाली होती तेव्हा राज्यांनी सीईटीच्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासात प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नीट परीक्षा सुरू करण्यात आली. नीटच्या माध्यमातून ३० टक्के तर सीईटीच्या माध्यमातून ७० टक्के वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा भरल्या जातात. या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

.....................................

काय आहे तमिळनाडू सरकारचा निर्णय?

एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पालक व विद्यार्थ्यांचा रोष पाहून तमिळनाडू सरकारने नीट परीक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक विधानसभेत मांडले. ते संमतही झाले. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीटची गरज नाही, असा त्या विधेयकाचा अर्थ आहे. सरकारी शाळेतील ७.५ टक्के विद्यार्थ्यांना प्राधान्य व बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

.....................

शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ

१) राज्यातही याच धर्तीवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सोय करण्याची गरज आहे. हुशार विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तमिळनाडू सरकारच्या निर्णयासारखा निर्णय महाराष्ट्र सरकारनेदेखील घ्यायला हवा.

- राजू पटले, आमगाव.

..........

तमिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय संभ्रमात टाकणारा आहे. देशातील सर्वच विद्यार्थ्यांची गुणवत्ता माेजण्यासाठी नीटची परीक्षा घेणे आवश्यक आहे. हुशार विद्यार्थ्याला स्पर्धेत टिकूनच यश मिळवायचे असते.

- संतोष चंद्रिकापुरे, किडंगीपार

..............

विद्यार्थी म्हणतात तयारीचाच खर्च मोठा

नीटच्या परीक्षेची भीती विद्यार्थ्यांमध्ये असते. आपण ही परीक्षा उत्तीर्ण करू का? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो. याच्या तयारीसाठी क्लासचा खर्च उचलणे सामान्यांना अवघड आहे.

-भाविनी पाऊलझगडे, विद्यार्थिनी.

.......

नीटचा अभ्यासक्रम अवघड आहे. या अभ्यासक्रमाची तयारी करताना क्लास करावाच लागतो. परंतु क्लासला लागणारा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य हतबल होतात. त्यात अभ्यासक्रम अवघड असल्याने अनेकांना नापास होण्याची भीती असते. १२ वीच्या गुणांवरही प्रवेश देण्याची सोय करावी.

- त्रिवेणी शेंडे, विद्यार्थिनी.