शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

कर्जवसुलीचा तगादा सुरु

By admin | Updated: January 13, 2016 02:31 IST

कसेतरी कर्ज घेऊन शेतकरी शेती करीत आहेत. त्यातही निसर्गाच्या माराने यंदाचे धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले.

शेतकरी संकटात : परतफेडीवरून वाढली चिंतामुंडीकोटा : कसेतरी कर्ज घेऊन शेतकरी शेती करीत आहेत. त्यातही निसर्गाच्या माराने यंदाचे धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. जवळ होते नव्हते ते लावूनही हाती काहीच आले नसल्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. असे असतानाही बँकांकडून मात्र वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. आता जवळ काहीच नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. तिरोडा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करने हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. पण शेती करने शेतकऱ्यांना परवडण्यासारखे राहिले नाही. पण वडीलांची परंपरा सुरु ठेवावी लागते असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. अशातच मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी याचे दर गगनाला भिडले आहेत. नेहमीच निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ याप्रकारे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.भारत देश कृषिप्रधान देश आहे. गोंदिया व भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आजही कित्येक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना वरथेंबी पावसावरच शेती करावी लागते. त्यातही बंँकांकडून कर्ज घेऊन शेती करावी लागत असल्याचे चित्र आहे. यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिला. त्यात रोगराईने धान पिकाची नासाडी झाली. ज्या शेतकऱ्याकडे हलके धान होते. त्यांनी कापनी व मळणी करुन दिवाळीचा सण तोंडावर येताच व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करुन आपली दिवाळी साजरी केली.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान कमी भावात घेऊन त्यांची लूबाडणूक करुन दिशाभूल केली. पण गरजवंतांना अक्कल नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झाली. पर्यायाने बँकेकडून किंवा सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर शेतकऱ्यांकडून केली जात नाही. त्यातल्या त्यात मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व वर्षभरातील संसाराचा गाडा चालविणे फार कठिण झाले आहे. रात्रंदिवस काबाळकष्ट करुनही यावेळी पोटासाठी भाकर मिळणे कठिण झाले आहे. नेहमीच शेतकरी घामाचे थेंब गाळून परिश्रम करीत असतो. पण वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच येत नाही. शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्जाची उचल केली आहे. पण परतफेड करावी अशी या चिंतेत सापडला आहे. असे असतानाही बँकांकडून वसुलीचा तगादा सुरु झालेला दिसत आहे. अशावेळी काय वसुली देणार? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या सर्वच बाबीला कंटाळून शेतकरी शेवटी आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. शेतकऱ्यांच्या समस्या आणखी जटील झाल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. पण अशावेळी ना नेता, ना पुढारी कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. मग गरीब शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला दिसत आहे. अच्छे दिनाच्या ऐवजी शेतकऱ्यांना बुरे दिन पाहण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)