शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीचा तगादा सुरु

By admin | Updated: January 13, 2016 02:31 IST

कसेतरी कर्ज घेऊन शेतकरी शेती करीत आहेत. त्यातही निसर्गाच्या माराने यंदाचे धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले.

शेतकरी संकटात : परतफेडीवरून वाढली चिंतामुंडीकोटा : कसेतरी कर्ज घेऊन शेतकरी शेती करीत आहेत. त्यातही निसर्गाच्या माराने यंदाचे धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. जवळ होते नव्हते ते लावूनही हाती काहीच आले नसल्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. असे असतानाही बँकांकडून मात्र वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. आता जवळ काहीच नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. तिरोडा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करने हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. पण शेती करने शेतकऱ्यांना परवडण्यासारखे राहिले नाही. पण वडीलांची परंपरा सुरु ठेवावी लागते असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. अशातच मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी याचे दर गगनाला भिडले आहेत. नेहमीच निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ याप्रकारे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.भारत देश कृषिप्रधान देश आहे. गोंदिया व भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आजही कित्येक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना वरथेंबी पावसावरच शेती करावी लागते. त्यातही बंँकांकडून कर्ज घेऊन शेती करावी लागत असल्याचे चित्र आहे. यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिला. त्यात रोगराईने धान पिकाची नासाडी झाली. ज्या शेतकऱ्याकडे हलके धान होते. त्यांनी कापनी व मळणी करुन दिवाळीचा सण तोंडावर येताच व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करुन आपली दिवाळी साजरी केली.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान कमी भावात घेऊन त्यांची लूबाडणूक करुन दिशाभूल केली. पण गरजवंतांना अक्कल नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झाली. पर्यायाने बँकेकडून किंवा सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर शेतकऱ्यांकडून केली जात नाही. त्यातल्या त्यात मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व वर्षभरातील संसाराचा गाडा चालविणे फार कठिण झाले आहे. रात्रंदिवस काबाळकष्ट करुनही यावेळी पोटासाठी भाकर मिळणे कठिण झाले आहे. नेहमीच शेतकरी घामाचे थेंब गाळून परिश्रम करीत असतो. पण वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच येत नाही. शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्जाची उचल केली आहे. पण परतफेड करावी अशी या चिंतेत सापडला आहे. असे असतानाही बँकांकडून वसुलीचा तगादा सुरु झालेला दिसत आहे. अशावेळी काय वसुली देणार? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या सर्वच बाबीला कंटाळून शेतकरी शेवटी आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. शेतकऱ्यांच्या समस्या आणखी जटील झाल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. पण अशावेळी ना नेता, ना पुढारी कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. मग गरीब शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला दिसत आहे. अच्छे दिनाच्या ऐवजी शेतकऱ्यांना बुरे दिन पाहण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)