शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

कर्जवसुलीचा तगादा सुरु

By admin | Updated: January 13, 2016 02:31 IST

कसेतरी कर्ज घेऊन शेतकरी शेती करीत आहेत. त्यातही निसर्गाच्या माराने यंदाचे धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले.

शेतकरी संकटात : परतफेडीवरून वाढली चिंतामुंडीकोटा : कसेतरी कर्ज घेऊन शेतकरी शेती करीत आहेत. त्यातही निसर्गाच्या माराने यंदाचे धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. जवळ होते नव्हते ते लावूनही हाती काहीच आले नसल्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. असे असतानाही बँकांकडून मात्र वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. आता जवळ काहीच नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. तिरोडा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करने हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. पण शेती करने शेतकऱ्यांना परवडण्यासारखे राहिले नाही. पण वडीलांची परंपरा सुरु ठेवावी लागते असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. अशातच मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी याचे दर गगनाला भिडले आहेत. नेहमीच निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ याप्रकारे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.भारत देश कृषिप्रधान देश आहे. गोंदिया व भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आजही कित्येक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना वरथेंबी पावसावरच शेती करावी लागते. त्यातही बंँकांकडून कर्ज घेऊन शेती करावी लागत असल्याचे चित्र आहे. यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिला. त्यात रोगराईने धान पिकाची नासाडी झाली. ज्या शेतकऱ्याकडे हलके धान होते. त्यांनी कापनी व मळणी करुन दिवाळीचा सण तोंडावर येताच व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करुन आपली दिवाळी साजरी केली.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान कमी भावात घेऊन त्यांची लूबाडणूक करुन दिशाभूल केली. पण गरजवंतांना अक्कल नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झाली. पर्यायाने बँकेकडून किंवा सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर शेतकऱ्यांकडून केली जात नाही. त्यातल्या त्यात मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व वर्षभरातील संसाराचा गाडा चालविणे फार कठिण झाले आहे. रात्रंदिवस काबाळकष्ट करुनही यावेळी पोटासाठी भाकर मिळणे कठिण झाले आहे. नेहमीच शेतकरी घामाचे थेंब गाळून परिश्रम करीत असतो. पण वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच येत नाही. शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्जाची उचल केली आहे. पण परतफेड करावी अशी या चिंतेत सापडला आहे. असे असतानाही बँकांकडून वसुलीचा तगादा सुरु झालेला दिसत आहे. अशावेळी काय वसुली देणार? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या सर्वच बाबीला कंटाळून शेतकरी शेवटी आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. शेतकऱ्यांच्या समस्या आणखी जटील झाल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. पण अशावेळी ना नेता, ना पुढारी कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. मग गरीब शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला दिसत आहे. अच्छे दिनाच्या ऐवजी शेतकऱ्यांना बुरे दिन पाहण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)