शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीचा तगादा सुरु

By admin | Updated: January 13, 2016 02:31 IST

कसेतरी कर्ज घेऊन शेतकरी शेती करीत आहेत. त्यातही निसर्गाच्या माराने यंदाचे धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले.

शेतकरी संकटात : परतफेडीवरून वाढली चिंतामुंडीकोटा : कसेतरी कर्ज घेऊन शेतकरी शेती करीत आहेत. त्यातही निसर्गाच्या माराने यंदाचे धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. जवळ होते नव्हते ते लावूनही हाती काहीच आले नसल्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. असे असतानाही बँकांकडून मात्र वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. आता जवळ काहीच नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. तिरोडा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करने हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. पण शेती करने शेतकऱ्यांना परवडण्यासारखे राहिले नाही. पण वडीलांची परंपरा सुरु ठेवावी लागते असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. अशातच मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी याचे दर गगनाला भिडले आहेत. नेहमीच निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ याप्रकारे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.भारत देश कृषिप्रधान देश आहे. गोंदिया व भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दोन्ही जिल्हे भाताच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आजही कित्येक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना वरथेंबी पावसावरच शेती करावी लागते. त्यातही बंँकांकडून कर्ज घेऊन शेती करावी लागत असल्याचे चित्र आहे. यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिला. त्यात रोगराईने धान पिकाची नासाडी झाली. ज्या शेतकऱ्याकडे हलके धान होते. त्यांनी कापनी व मळणी करुन दिवाळीचा सण तोंडावर येताच व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करुन आपली दिवाळी साजरी केली.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान कमी भावात घेऊन त्यांची लूबाडणूक करुन दिशाभूल केली. पण गरजवंतांना अक्कल नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झाली. पर्यायाने बँकेकडून किंवा सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर शेतकऱ्यांकडून केली जात नाही. त्यातल्या त्यात मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व वर्षभरातील संसाराचा गाडा चालविणे फार कठिण झाले आहे. रात्रंदिवस काबाळकष्ट करुनही यावेळी पोटासाठी भाकर मिळणे कठिण झाले आहे. नेहमीच शेतकरी घामाचे थेंब गाळून परिश्रम करीत असतो. पण वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच येत नाही. शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्जाची उचल केली आहे. पण परतफेड करावी अशी या चिंतेत सापडला आहे. असे असतानाही बँकांकडून वसुलीचा तगादा सुरु झालेला दिसत आहे. अशावेळी काय वसुली देणार? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या सर्वच बाबीला कंटाळून शेतकरी शेवटी आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. शेतकऱ्यांच्या समस्या आणखी जटील झाल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. पण अशावेळी ना नेता, ना पुढारी कोणीही शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. मग गरीब शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला दिसत आहे. अच्छे दिनाच्या ऐवजी शेतकऱ्यांना बुरे दिन पाहण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)