शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५६ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 01:04 IST

राज्य सरकारतर्फे केलेल्या कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेंतर्गत येणाऱ्या विविध सहकारी संस्थाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे बंद केले आहे.

३० जून २०१६ पर्यंतचे कर्ज माफ : दीड लाख रुपये कर्जाची मर्यादालोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारतर्फे केलेल्या कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेंतर्गत येणाऱ्या विविध सहकारी संस्थाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे बंद केले आहे. परंतु कर्जमाफीचा लाभ ३० जून २०१६ पर्यंतच कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ६२ टक्के शेतकऱ्यांनाच या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांकडून जिल्हामध्यवर्ती बँक सक्तीने वसुली करीत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थानी सन २००९ नंतर २ जून २०१७ पर्यंत ९१ हजार ३४६ अल्प, मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांना ३२६ कोटी ५३ लाख रूपये कर्ज वाटप केले. या कर्जाचा अहवाल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शासनाला पाठविला आहे. यात ७२ हजार ४६७ अल्प व मध्यम शेतकऱ्यांनी २५४ कोटी १७ लाख रूपयाचे कर्ज घेतले. या कर्ज घेणाऱ्या २८ हजार १७१ शेतकऱ्यांनी ८४ कोटी २५ लाख रूपयाचे कर्ज भरले आहे. परंतु २४ जून रोजी सरकारने ३० जून २०१६ पर्यंतची कर्जमाफी केली आहे. यामुळे ९१ हजार ३४६ कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी ५६ हजार ५५७ शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. २९० कोटी १७ लाख रूपये कर्ज माफ केले जाणार आहे. सन २०१६-१७ व सन २०१७-१८ मध्ये २ जून पर्यंत ५१ हजार ५४२ मोठे, मध्यम व अल्प भूधारकांना १८३ कोटी ६४ लाख ६७ हजार रूपयाचे कर्ज विविध सहकारी संस्थांमार्फत देण्यात आले आहे. यात ४८ हजार ३३५ लघु व मध्यम शेतकऱ्यांचा समावेश आहे. लघु व मध्यम शेतकऱ्यांना १५१ कोटी ६३ लाख ९९ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ३५ हजार शेतकरी राहणार वंचित४शासनाने ३० जून २०१६ पर्यंतच्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने गोंदिया जिल्ह्यातील ३४ हजार ७९० शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच दबून राहतील. ९१ हजार ३४६ शेतकऱ्यांनी ३२६ कोटी ५३ लाख रूपयाचे कर्ज घेतले. परंतु ५६ हजार ५५७ शेतकऱ्यांचे २९० कोटी १७ लाख कर्ज माफ होणार आहे. ३४ हजार ७९० शेतकऱ्यांचे ३६ कोटी ३६ लाख रूपये कर्जमुक्तीच्या नियमात बसणार नाहीत. त्यामुळे ते कर्जमाफी पासून वंचीत राहणार आहेत.राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे. ३० जून २०१६ पर्यंतच्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. -व्ही.आर.वासनिक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया