शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

By admin | Updated: May 17, 2017 00:10 IST

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दोन दिवसापूर्वी दाखल झालेल्या महिलेवर बालाजी नर्सिंग होम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.

कुटुुंबीयांचा आरोप : केएमजे हॉस्पिटलमधील आठवड्यातील दुसरी घटना लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दोन दिवसापूर्वी दाखल झालेल्या महिलेवर बालाजी नर्सिंग होम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान तिची प्रकृती बिघडल्याने पुन्हा बालाजी नर्सिंग होम येथे तिला दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती आटोक्याबाहेर असल्याचे सांगून बालाजी नर्सिंग होम येथील डॉक्टरांनी तिला केएमजे नर्सिंग होम येथे हलविण्याचा सल्ला दिला. केएमजे नर्सिंग होममध्ये दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.१५) दुपारी १२ वाजताची आहे. मुस्कान योगेश समुद्रे (३१) रा. गोंदिया असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेवरुन केएमजे रुग्णालयात मृताच्या कुटुंबीयांनी चांगलाच संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे केएमजे नर्सिंग होमचे मुख्य डॉक्टर जायस्वाल यांनी सदर महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास चक्क नाकारले. यावरुन सदर महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला, असा आरोप करण्यात आला आहे. सविस्तर असे की, मुस्कान योगेश समुद्रे या महिलेला दोन अपत्य असल्यामुळे १२ मे रोजी बालाजी नर्सिंग होममध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. दोन दिवसानंतर मुस्कानला नर्सिंग होममधून सुट्टी देण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या पोटात दुखने सुरु झाल्याने तिला पुन्हा बालाजी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यातच तिची प्रकृती चिंताजनक असल्याने बालाजी नर्सिंग होमच्या डॉक्टरांनी तिला केएमजे रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यावरुन कुटुंबीयांनी वेळ वाया न घालविता त्वरित मुस्कानला केएमजे नर्सिंग होममध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान तिचा केएमजे रुग्णालयात मृत्यू झाला. यावर मृताच्या कुटुंबीयांनी केएमजे नर्सिंग होमच्या मुख्य डॉक्टराला मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता त्यांनी चक्क नकार दिला. यावरुन रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, पोलिसांना पाचारण करुन परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुस्कान योेगेश समुद्रे या महिलेच्या मृत्यूला डॉक्टरांची लापरवाही आणि उपचारादरम्यान झालेली चुकच जबाबदार आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.