शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मृतांच्या आकडेवारीत तालुका शंभरीच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून अवघ्या देशात कहर करणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यात कमी प्रमाणात का ...

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून अवघ्या देशात कहर करणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यात कमी प्रमाणात का असेना मात्र आजही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बाधितांसह कोरोनाने जीव जाणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. तालुका मृतांचा आकडा शंभरीच्या घरात आहे. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक ९९ रुग्णांचा जीव गेल्याची नोंद आहे. यामुळे सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट असलेल्या गोंदिया तालुक्यातील धोका कायम आहे.

२५ मार्चपासून देशात लॉकडाऊन झाल्यानंतर जिल्ह्यातील पहिला रुग्ण २७ मार्च रोजी गोंदिया शहरात आढळून आला होता. त्यानंतर काही काळ सुटकेचा गेल्यानंतर झपाट्याने रुग्ण वाढ झाली व बघता-बघता आता बाधितांची संख्या १३,८९१ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के असल्याने आतापर्यंत १३,४५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी (दि. ९) जिल्ह्यात २५८ रुग्ण क्रियाशील होते. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोनाची दुसरी बाजू तेवढीच गंभीर आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १७९ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासाठी गंभीर असतानाच जिल्हावासीयांसाठीही तेवढीच धक्कादायक आहे. कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाल्यापासून गोंदिया शहर व तालुका कोरोना हॉटस्पॉट कायम आहे. परिणामी मृतांच्या आकडेवारीतही गोंदिया तालुका आघाडीवर असून आतापर्यंत ९९ रुग्णांचा जीव गेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी प्रमाणात का असेना मात्र धोका अद्यापही टळलेला नाही.

-------

सालेकसा तालुक्यात मृत्यू दर कमी

आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील कोरोना महामारीतील कामगिरी प्रशंसनीय दिसून येत आहे. तालुक्यात ६३६ कोरोनाबाधित आढळले आले असून आजघडीला फक्त १७ क्रियाशील रुग्ण आहेत. शिवाय सर्वांत कमी फक्त ३ रुग्णांचा जीव गेला आहे. त्यानंतर सडक-अर्जुनी तालुक्यात ५ रुग्णांचा जीव गेल्याची नोंद आहे.

----------------------------

लसीनंतरही उपाययोजनांची गरज

कोरोना लस निर्माण करण्यात भारताला मोठे यश आले आहे. त्यातच आता येत्या १६ तारखेनंतर टप्प्याटप्प्याने लसीकरणाला सुरुवात होत आहे. मात्र, त्यानंतरही कोरोना पूर्णपणे संपणार नसल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच लसीकरणानंतरही प्रत्येकाला तेवढेच सजग राहून उपाययोजनांचे पालन करण्याची गरज राहणार आहे.