शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या आकडेवारीत तालुका शंभरीच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून अवघ्या देशात कहर करणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यात कमी प्रमाणात का ...

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून अवघ्या देशात कहर करणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यात कमी प्रमाणात का असेना मात्र आजही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बाधितांसह कोरोनाने जीव जाणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. तालुका मृतांचा आकडा शंभरीच्या घरात आहे. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक ९९ रुग्णांचा जीव गेल्याची नोंद आहे. यामुळे सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट असलेल्या गोंदिया तालुक्यातील धोका कायम आहे.

२५ मार्चपासून देशात लॉकडाऊन झाल्यानंतर जिल्ह्यातील पहिला रुग्ण २७ मार्च रोजी गोंदिया शहरात आढळून आला होता. त्यानंतर काही काळ सुटकेचा गेल्यानंतर झपाट्याने रुग्ण वाढ झाली व बघता-बघता आता बाधितांची संख्या १३,८९१ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के असल्याने आतापर्यंत १३,४५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी (दि. ९) जिल्ह्यात २५८ रुग्ण क्रियाशील होते. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोनाची दुसरी बाजू तेवढीच गंभीर आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १७९ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासाठी गंभीर असतानाच जिल्हावासीयांसाठीही तेवढीच धक्कादायक आहे. कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाल्यापासून गोंदिया शहर व तालुका कोरोना हॉटस्पॉट कायम आहे. परिणामी मृतांच्या आकडेवारीतही गोंदिया तालुका आघाडीवर असून आतापर्यंत ९९ रुग्णांचा जीव गेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी प्रमाणात का असेना मात्र धोका अद्यापही टळलेला नाही.

-------

सालेकसा तालुक्यात मृत्यू दर कमी

आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील कोरोना महामारीतील कामगिरी प्रशंसनीय दिसून येत आहे. तालुक्यात ६३६ कोरोनाबाधित आढळले आले असून आजघडीला फक्त १७ क्रियाशील रुग्ण आहेत. शिवाय सर्वांत कमी फक्त ३ रुग्णांचा जीव गेला आहे. त्यानंतर सडक-अर्जुनी तालुक्यात ५ रुग्णांचा जीव गेल्याची नोंद आहे.

----------------------------

लसीनंतरही उपाययोजनांची गरज

कोरोना लस निर्माण करण्यात भारताला मोठे यश आले आहे. त्यातच आता येत्या १६ तारखेनंतर टप्प्याटप्प्याने लसीकरणाला सुरुवात होत आहे. मात्र, त्यानंतरही कोरोना पूर्णपणे संपणार नसल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच लसीकरणानंतरही प्रत्येकाला तेवढेच सजग राहून उपाययोजनांचे पालन करण्याची गरज राहणार आहे.