शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विद्युत रोहित्र जळाल्याने रबी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

वीज वितरण विभागाने या ठिकाणी दुसरे ट्रान्सफाॅर्मर लावले; परंतु ते ट्रान्सफाॅर्मर १२ तासच चालते. त्यामध्ये बिघाड आले. त्यामुळे वीज ...

वीज वितरण विभागाने या ठिकाणी दुसरे ट्रान्सफाॅर्मर लावले; परंतु ते ट्रान्सफाॅर्मर १२ तासच चालते. त्यामध्ये बिघाड आले. त्यामुळे वीज वितरण विभागाने नवीन ट्रान्सफाॅर्मर आणून लावले; पण तो ही ट्रान्सफाॅर्मर फक्त २४ तास चालून बंद पडले. त्यामुळे वीज वितरण विभागाबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. कोसमतोंडी परिसरातील बोळुंदा शेतशिवारात कोसमतोंडी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी या शेतशिवारात उन्हाळी धानाची लागवड केली आहे. वीज कनेक्शन असणाऱ्या शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणासुद्धा केला; पण वीज वितरण विभागाचे हलगर्जीपणामुळे लाइन वेळेवर राहत नाही. त्यामुळे उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. त्यातच मागील आठ दिवसापासून विद्युत ट्रान्सफाॅर्मर जळाल्याने वीज वितरण विभागाने दोनदा दुसरे ट्रान्सफाॅर्मर बसविले; पण ते ही ट्रान्सफाॅर्मर एक १२ तास व दुसरे २४ तास सुरू राहून बंद पडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक सुकलेले आहे. मागील आठ दिवसांपासून विजेचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे उभे पीक करपत आहे. याला जबाबदार वीज वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आहेत.

वीज वितरण विभाग शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करीत नसून आठ दिवसांपासून बंद पडलेल्या ट्रान्सफाॅर्मरच्या जागी नवीन ट्रान्सफाॅर्मर न लावता नादुरुस्त व जुने ट्रान्सफाॅर्मर लावून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पिकाचे नुकसान होत आहे आणि हाती आलेले धान पीक नष्ट होत आहे. पूर्वीच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून वीज वितरण विभागाचे भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा होत नसल्याने धान व इतर पिकांचे नुकसान होत आहे. वीज बिलाचा भरणा भरणा वेळेवर भरूनसुद्धा शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करण्यात येत नाही. त्यामुळे वीज वितरण विभागाचे भोंगळ कारभारावर शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.